नवी दिल्ली येथे २३ जानेवारीपासून आंतरराष्ट्रीय लोकशाही व निवडणूक व्यवस्थापन परिषद (आयआयसीडीईएम) सुरू झाली आहे. या परिषदेसाठी जगभरातील आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचे आगमन झाले असून, ३२ देशांतील ७१ प्रतिनिधी नवी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. ही तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद २१ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान भारत मंडपम, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात …
Read More »वर्षा गायकवाड यांचा सवाल, मुंबईतील कंपन्यांशी करार करण्यासाठी ‘दावोस’ कशाला ? दावोसमध्ये आतापर्यंत केलेल्या सर्व गुंतवणूकविषयी करारांची श्वेतपत्रिका काढा
महाराष्ट्रात मोठी आर्थिक गुंतवणूक आणण्यासाठी दावोसला जाणे ही भाजपा महायुती सरकार व फडणवीस यांची इव्हेंटबाजी आहे. यावर्षीही ही इव्हेंटबाजी सुरुच असून ज्या कंपन्यांशी करार करण्यात आले त्यातील काही कंपन्या मुंबईतील आहेत. मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार करण्याची गरजच काय? या कंपन्यांशी मुंबईतच करार करता आले नसते का? असा सवाल करून …
Read More »रईस शेख यांची माहिती, अल्पसंख्याक प्रशिक्षण संस्थेला कारभार अखेर मार्गी रखडलेल्या ११ पदांना उच्चस्तरीय समितीची मंजुरी
दिड वर्षापूर्वी राज्यात स्थापन झालेल्या अल्पसंख्याक प्रशिक्षण व संशोधन संस्थेचा (मार्टी) कारभार मनुष्यबळाअभावी रखडला होता. आपण केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे उच्चस्तरीय समितीने या संस्थेसाठीच्या मान्य ११ पदांना नुकतीच मंजुरी दिली असून नव्या वर्षात संस्थेचा कारभार गतीमान व्हावा, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केली. यासदंर्भात आमदार रईस …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, ज्ञान, तंत्रज्ञान, विदेशी गुंतवणूक मिळविण्यासाठी दावोस दौरा तिसऱ्या मुंबईतील रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा, एक लाख कोटींची गुंतवणूक येणार
स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीच्या निमित्ताने करण्यात येणारा दावोस दौरा हा भारतात आणि पर्यायाने महाराष्ट्रात ज्ञान, तंत्रज्ञान आणि विदेशी गुंतवणूक मिळविण्यासाठीचा महत्वाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या मुंबईतील पहिले शहर म्हणून रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा करण्यात आली. आज प्रामुख्याने धोरणात्मक असे सामंजस्य …
Read More »झोमॅटोच्या सीईओ पदावरून दीपेंद्र गोयल पाय उतार, धिंडसा यांच्यावर जबाबदारी अंतर्गत मूळ कंपनी एटर्नलच्या उच्च व्यवस्थापनात बदल
झोमॅटो या फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मची मूळ कंपनी असलेल्या एटर्नलने बुधवारी उच्च व्यवस्थापनात बदलाची घोषणा केली, ज्यात संस्थापक दीपेंद्र गोयल यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक पदावरून पायउतार झाले आहेत. गोयल आता उपाध्यक्षपदाची भूमिका स्वीकारतील आणि कंपनीच्या संचालक मंडळावर संचालक म्हणून कायम राहतील. ब्लिंकिटचे सीईओ अलबिंदर सिंग धिंडसा यांची नवीन …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांनी दावोसमधून अनुभवला पहिल्या आंतरराष्ट्रीय सायकलिंग ‘ग्रँड टूर’चा थरार ऑनलाईन पद्धतीने अनुभवला देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा अनुभव
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी आणि भारतीय क्रीडा विश्वात नवा इतिहास घडवणारी ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेला सुरूवात झाली. देशातील ही पहिलीच आंतरराष्टीय ‘ग्रँड टूर’ सायकल स्पर्धा असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथील आपल्या व्यग्र कार्यक्रमातून वेळ काढून स्पर्धेचे थेट प्रक्षेपण पाहिले. ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ला …
Read More »भाजपाला अखेर नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळाला, बिहारचे नितीन नबीन यांच्याकडे धुरा जे पी नड्डा यांना अखेर मिळाला पर्याय
भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) कार्याध्यक्ष नितीन नबीन यांची पक्षाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे. पक्षाचे राष्ट्रीय निवडणूक अधिकारी, डॉ. के. लक्ष्मण यांनी आज नवी दिल्लीतील भाजपा मुख्यालयात ‘संगठन पर्व’ कार्यक्रमात नितीन नबीन यांच्या नियुक्तीची घोषणा केली आणि त्यांना निवडणुकीचे प्रमाणपत्र सुपूर्द केले. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी …
Read More »राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाचे केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांसमोर सादरीकरण पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी मांडली राज्य शासनाची भूमिका
महाराष्ट्रातील नद्यांना प्रदूषणाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी राज्य सरकारने ऐतिहासिक पुढाकार घेत ‘राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्याची महत्त्वपूर्ण संकल्पना मांडली होती. राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन यासंदर्भातील प्रस्तावाचे सादरीकरण …
Read More »२००५ साली चर्चा होती ‘शिवसेना संपली.’… यावर शिवसेनेचे वरिष्ठ नेते स्व. प्रमोद नवलकर यांचा लेख मोरारजी नावाच्या एका गांधीवाद्याने शिवसेना संपवण्याची घोषणा करून एका शिवसैनिकाला माहीमच्या नाक्यावर चिरडले
२००५ साली बाळासाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रमोद महाजन आणि मनोहर जोशी यांनी त्यांना ‘मातोश्री’वर जाऊन सकाळीच शुभेच्छा दिल्या. त्यावेळी एक अतिशय सुंदर छायाचित्र स्वतः उद्धव ठाकरे यांनी काढले. यावर स्व. प्रमोद नवलकर यांनी शिवसेनेवर हृदयस्पर्शी लेख लिहिला… शिवसेना अभेद्य ! काहीजण रोज उठल्याबरोबर घोषणा करायची, ‘शिवसेना संपली’ आणि झोपताना प्रार्थना करायाची …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, नरेंद्र मोदींकडून राजमाता अहिल्याबाई होळकर व धनगर समाजाचा अपमान हिंदुच्या अस्मितेवर घाला घालणारे हे कसले हिंदुत्ववादी ?
राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी न्याय, धर्म आणि लोककल्याणासाठी राज्य केले, हिंदु धर्मासाठी पवित्र अशा काशी विश्वनाथ आणि सोमनाथ मंदिरांसह अनेक मंदिरांची पुनर्बांधणी केली. स्वतःला हिंदु धर्माचे रक्षक समजणाऱ्या नरेंद्र मोदी व योगी आदित्यनाथ यांनी मात्र आज अहिल्याबाईंनी काशीत बांधलेला पवित्र मणिकर्णिका घाट उद्धवस्थ केला, हा तमाम हिंदू तसेच धनगर समाजाचा …
Read More »
Marathi e-Batmya