Editor

केंद्र सरकारकडून या बचत योजनांवर मिळते इतके व्याज बचत योजनांच्या व्याज रकमेत वाढ होण्याची शक्यता

केंद्राने FY२५ च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) छोट्या बचत योजनांच्या व्याजदरांमध्ये सुधारणा केली नाही. पोस्ट ऑफिस योजनांमध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), सुकन्या समृद्धी योजना (SSY), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), मुदत ठेवी, पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS) आणि बरेच योजनांचा समाविष्ट आहे. ८ मार्च रोजी जारी केलेल्या ज्ञापनात, वित्त …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचा इशारा, विधानसभा निवडणुकीत सूज उतरणार उद्धव ठाकरे आणि विरोधकांवर साधला निशाणा

विरोधी पक्षाने केलेल्या आरोपांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. त्यामुळे विरोधी पक्षाने सभागृहात चर्चेची तयारी ठेवावी. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर बोलून केवळ हंगामा करण्यापेक्षा विरोधकांनी सभागृहात बोलावे. आम्ही त्याला उत्तर देऊ, असे आव्हान बुधवारी सत्ताधारी पक्षाच्यावतीने विरोधकांना देण्यात आले. सत्ताधरी पक्षावर घोटाळ्यांचे आरोप करणाऱ्या विरोधकांचे घोटाळे बाहेर काढण्याचा आणि खोट्या नॅरेटिव्हचा …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटे नॅरेटीव्ह, तर अजित पवार यांची ग्वाही उत्तरे आमच्याकडे विरोधकांच्या पत्रातील मुद्यावरून सरकारची तयारी

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशाला उद्या सकाळपासून सुरुवात होणार आहे. राज्य सरकारचे हे शेवटचे पावसाळी अधिवेशन ठरणार आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. त्यानंतर सह्याद्री येथील चहापानाच्या कार्यक्रमानंतर राज्य सरकारच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी राज्य …

Read More »

अखिलेश यादव यांचा ओम बिर्लांना खोचक शुभेच्छा, सभागृह तुम्ही चालवावे, पण उलट घडू नये लोकसभा अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर अखिलेश यादव यांची प्रतिक्रिया

१८ व्या लोकसभेच्या अध्यक्ष पदी ओम बिर्ला यांची निवड झाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ओम बिर्ला यांना लोकसभा अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर नेऊन विराजमान केले. त्यानंतर सत्ताधारी पक्षाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओम बिर्ला यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर अखिलेश यादव यांनी शुभेच्छा पर भाषण देताना लोकसभा …

Read More »

अंबादास दानवे यांचा खोचक टोला, बेजबाबदार वागणाऱ्या महायुती सरकारला बाय बाय… महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत अंबादास दानवे यांचा निर्धार

शेतकरी व जनतेच्या प्रश्नांकडे राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री बेजबाबदारपणे वागत आहेत. सामाजिक प्रश्नांकडे दुर्लक्ष करून राजकीय वातावरण तापवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. एकप्रकारे राज्याला अधोगतीकडे नेण्याच काम महायुती सरकार करत असून या पावसाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारणार असून महायुती सरकारला बाय बाय करणार असल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन, धोकादायक इमारतींबाबत धोरण ठरविणार ‘दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुक्त मुंबई’ हे आमचे लक्ष्य

मुंबई शहरातील दरडप्रवण क्षेत्रात सेफ्टी नेट बसवून ही क्षेत्रे अधिक संरक्षित करणे आणि तेथील नागरिकांच्या जीविताची काळजी घेणे हे आमचे प्राधान्य असून दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुक्त मुंबई बनविण्याचे आमचे लक्ष्य आहे. याचबरोबर म्हाडा, महानगरपालिका, एमआयडीसी यासह इतर शासकीय यंत्रणांच्या सहकार्याने धोकादायक इमारतींबाबत धोरण ठरविणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …

Read More »

राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडीने केले हे ठराव आरक्षणाच्या संदर्भात ११ महत्वपूर्ण ठराव

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात जिल्हास्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजण करण्यात आले आहे. या कार्यक्रमातून पक्षाने दिलेले ११ ठराव मांडण्याचे आणि त्या ठरवाचे बॅनर शहरातील मुख्य चौकात लावण्याचे निर्देश पक्षाच्या वतीने देण्यात आले आहेत. या ठरवामध्ये आरक्षणाच्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीची भूमिका …

Read More »

लोकसभा अध्यक्ष पदी विराजमान होताच ओम बिर्लांकडून आणीबाणी विरोधात ठराव विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी

१८ व्या लोकसभा अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी लोकसभा अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी आवाजी मतदान घेण्यात आले. या आवाजी मतदानात भाजपाचे खासदार तथा माजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा विजय झाला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ओम बिर्ला यांच्या बाकाजवळ जात त्यांना अध्यक्ष पदाच्या …

Read More »

मुंबई उच्च न्यायालयाने हिजाब प्रकरणी याचिका फेटाळून लावली ९ विद्यार्थ्यींनी दाखल केलेली याचिका फेटाळली

मुंबई उच्च न्यायालयाने २६ जून रोजी शहरातील एका महाविद्यालयातील नऊ महिला विद्यार्थिनींनी हिजाब, बुरखा आणि नकाबवर बंदी घालण्यासाठी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायमूर्ती ए.एस. चांदूरकर आणि राजेश पाटील यांच्या खंडपीठाने महाविद्यालयाने घेतलेल्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले आणि विज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय आणि तृतीय वर्षात …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची टीका,… महाघोटाळेबाज सरकारचा चहा घेणं हा जनतेचा अपमान शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी; वीज बील माफी द्यावी

राज्यातील बळीराजा दुष्काळ, पाणी टंचाई, नैसर्गिक आपत्ती, वाढता कर्जाचा बोजा, पिकविमा कंपन्यांकडून होणारी फसवणूक यामुळे पिचला आहे. महायुतीच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्याबरोबरच संपूर्ण वीजबील माफी करावी, अशी मागणी आम्ही वारंवार केली. तरी देखील संवेदना गमावलेल्या सरकारने केवळ घोषणाबाजी करून शेतकऱ्यांची फसवणूक …

Read More »