पुणे येथील कथित जमीन अनियमिततेतील आरोपांची चौकशी करण्यासाठी महसूल, मुद्रांक व नोंदणी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची चौकशी समिती सरकारने स्थापन केली. यासंदर्भातील शासन आदेश आज जारी झाला असून, समितीला एक महिन्यात अहवाल द्यायचा असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. पुणे शहरातील मुंढवा …
Read More »विजय वडेट्टीवार यांची मागणी जमीन घोटाळा प्रकरणी अजित पवार यांनी राजीनामा द्यावा या घोटाळ्यातील अमेडिया कंपनीचे पार्टनर पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे
पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमिनीची खरेदी करण्यात आली,त्यावर स्टॅम्प ड्यूटी माफ करण्यात आली आणि पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांना यातील काहीच माहित नव्हते? या जमीन घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा झाला पाहिजे अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, एखाद …
Read More »तुकाराम मुंढे यांची माहिती ‘भाषिणी’ तंत्रज्ञानावर आधारित व्हॉईस नोटद्वारे तक्रार नोंदवण्याची सोय दिव्यांग कल्याण विभागाचा ‘एआय आधारित’ व्हाट्सॲप चॅटबॉट
दिव्यांग कल्याण विभागात दिव्यांग व्यक्तींसाठी एआय-आधारित व्हाट्सॲप चॅटबॉट 7821922775 क्रमांक कार्यान्वित आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी असणाऱ्या योजनांसह तक्रार निवारण व्यवस्था ‘एका क्लिकवर’ उपलब्ध करून देणे, हा या सेवेचा मुख्य उद्देश आहे. दिव्यांग व्यक्तींना योजनांची माहिती मिळवताना किंवा तक्रारी दाखल करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. या चॅटबॉटमध्ये …
Read More »दत्तात्रय भरणे यांची माहिती, बहुप्रतिक्षेत असलेली कृषी समृद्धी योजना राबवण्यास मान्यता बळीराजाच्या उन्नतीसाठी कृषीमंत्र्यांचे आश्वासक पाऊल, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा
कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निर्मितीसाठी गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी शासनाने निर्णय घेतला आहे. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र आणि ट्रॅक्टर चलित रुंद सरी वरंबा (बीबीएफ) …
Read More »जमिन व्यवहाराची माहिती नाही म्हणणारे अजित पवार संध्याकाळ होताच म्हणाले, व्यवहार रद्द पार्थ पवार याच्या महार वतन जमिन खरेदी प्रकरणी अजित पवार यांची आता सारवासारव
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी महार वतनाची जमिन खरेदी केली. त्यामुळे अजित पवार आणि त्यांचे सुपुत्र पार्थ चांगलेच अडचणीत आले. तसेच प्रकरण बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करण्याची घोषणा करत तथ्य असेल तर कारवाई करणार असल्याचे जाहिर केले. त्यानंतर वेगाने चक्र फिरली. काल या …
Read More »गांधीजींच्या सहकाऱ्याचे वंशज बेंजामिन हडसन यांनी हर्षवर्धन सपकाळ यांची घेतली सदिच्छा भेट रेजिनाल्ड रेनॉल्ड्स यांचे वंशज बेंजामिन हडसन यांनी घेतली भेट
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे जिवलग सहकारी व ब्रिटिश क्वेकर विचारवंत रेजिनाल्ड रेनॉल्ड्स यांचे वंशज बेंजामिन हडसन यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मुंबईतील टिळक भवन येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी गांधीवादी आणि क्वेकर परंपरेतील ऐतिहासिक संवाद, सांस्कृतिक वारसा आणि आजच्या सामाजिक, राजकीय संदर्भातील गांधी विचारांचे पुनर्मूल्यांकन या विषयांवर …
Read More »राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदी यांना सवाल, पार्थ पवार महार वतन जमिनप्रकरणी गप्प का? महार वतन जमिन खरेदीवरून राहुल गांधी यांचा मोदी यांना आवाहन
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी महार वतनाची १८०० कोटी रूपये किंमतीची पुणे येथील कोरेगांव पार्क येथील ४० एकर जमिन खरेदी प्रकरणामुळे चांगलेच अडचणीत आले. तसेच ही जमिनी ३०० कोटी रूपयांना खरेदी करून फक्त ५०० रूपयांची स्टॅम्प ड्युटी भरल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला. त्यामुळे राजकिय वर्तुळात एकच …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन, नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राला सर्वात पुढे ठेवा नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीचा गुन्हे सिद्धतेमध्ये चांगला उपयोग होत आहे. या कायद्यांच्या प्रत्येक घटकातील अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्राला देशात सर्वात पुढे ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत आयोजित बैठकीत दिले. ज्या घटकातील अंमलबजावणीमध्ये राज्य मागे आहे, अशा घटकाच्या अंमलबजावणीमध्ये पुढील काळात महाराष्ट्र देशात अन्य राज्यांच्या …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विश्वाला मार्गदर्शन करणारा भारत घडविण्यासाठी ‘वंदे मातरम्’चा संकल्प मंत्रालयात सामूहिक ‘वंदे मातरम’ गीताचे गायन
जात, पंथ, धर्म, भाषांचे भेद विसरून स्वातंत्र्यलढ्यात सर्वांनी वंदे मातरम् म्हटले होते. वंदे मातरम् हा स्वातंत्र्यलढ्याचा परवलीचा शब्द होता आणि क्रांतिकारकांचे घोषवाक्यही याच गीतातून तयार झाले. विश्वाला मार्गदर्शन करणारा भारत घडवण्यासाठी राष्ट्रभक्ती आणि एकात्मता आवश्यक आहे. यासाठी ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनाने संकल्प करूया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामुहिक …
Read More »ऐश्वर्या रॉय बच्चनला आयकर कर खटल्यात मिळाला विजय ४ कोटी रूपयांचा कर वाचला
आयकर अपीलीय न्यायाधिकरण (ITAT) मुंबईने ४ कोटी रुपयांच्या परवाना रद्द करण्याच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ऐश्वर्या राय बच्चन यांना त्यांच्या कर वादात महत्त्वपूर्ण कायदेशीर विजय मिळाला आहे. आयकर विभागाने २०२२-२३ च्या करमुक्त उत्पन्नाशी संबंधित खर्चाच्या तिच्या गणनेला आव्हान दिले तेव्हा हा प्रश्न निर्माण झाला. महसूल अपील फेटाळून लावण्याचा आणि परवाना रद्द …
Read More »
Marathi e-Batmya