फोन टॅपिंग प्रकरणात पोलिस महासंचालक पदाचा तात्पुरता कार्यभार असलेले संजय पांडे यांनी आपला अहवाल दिल्यानंतर आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर राज्य सरकारने गुन्हा दाखल केला. त्यानंतर आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पूर्णवेळ पोलिस महासंचालक पदावर राजीव सेठ यांची नियुक्ती राज्य सरकारने केली. त्यामुळे नाराज झालेल्या संजय पांडे यांनी सुट्टीवर जाण्याची …
Read More »लोकांवर पाळत ठेवण्याचे गुजरात मॉडेल फडणवीसांनी महाराष्ट्रात राबवले रश्मी शुक्ला या तर फक्त प्यादं, त्यांना आदेश देणा-या मुख्य सुत्रधारांचा शोध घेतला पाहिजेः अतुल लोंढे
फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील विरोधी पक्षांच्या नेत्यांचे बेकायदेशीर फोन टॅपिंग झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. फडणवीस सरकारच्या काळात लोकांवर पाळत ठेवण्याचे गुजरात मॉडेल महाराष्ट्रात राबवले जात होते. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. पण रश्मी शुक्ला या एक प्यादं आहेत त्यांना फोन टॅपिंगचे …
Read More »शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना राज्यातील भाजपा नेते गप्प कसे? छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींनी जाहीर माफी मागावी
छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करत रामदास स्वामी नसते तर शिवाजीला कोण विचारले असते? असे वादग्रस्त विधान करुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत असून जगभरात त्यांचा मोठा नावलौकिक आहे. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलेल्या कोश्यारी यांनी छत्रपतींचा …
Read More »उदयनराजें म्हणाले की, राज्यपालांच्या त्या वक्तव्याने… राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्यावर उदयनराजेंची प्रतिक्रिया
औरंगाबादेत काल आयोजित कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी रामदास स्वामींशिवाय शिवाजीला कोण विचारेल? असे खळबळजनक वक्तव्य केल्याने राज्यात नव्याने वादंग निर्माण झाले. यापार्श्वभूमीवर विविधस्तरातून राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ प्रतिक्रिया उमटत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट १६ वे वंशज छत्रपती उदयन राजे भोसले यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली असून छत्रपती शिवाजी …
Read More »मोदींचा आंतरराष्ट्रीय प्रभाव घटला ? अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी केंद्राचे चार मंत्री पोलंड-युक्रेन सीमेवरील घटनेनंतर मोदी सरकारचा निर्णय
मागील सात वर्षापासून केंद्रात सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आंतरराष्ट्रीयस्तरावर मोठा दबदबा असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र रशियाने युक्रेनवर केलेल्या लष्करी कारवाईमुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेन-पोलंड सीमेवर झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी अखेर मोदी सरकारमधील चार मंत्र्यांना पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदींचा प्रभाव घटला …
Read More »आर्थिक निर्बंधामुळे रशियाच्या आर्थिक अडचणीत वाढ: व्याज दरात मोठी वाढ रशियाच्या मध्यवर्ती बँकेने वाढविले व्याज दर
युक्रेनवर केलेल्या चढाईमुळे संबध जगभरातून रशियाच्या विरोधात वातावरण निर्मिती होत असून अनेक देशांकडून रशियावर आर्थिक निर्बंध लादण्यात येत आहेत. त्यामुळे रशियाच्या आर्थिक अडचणीत वाढ होत आहे. तसेच रशियाचे प्रमुख चलन असलेल्या रूबलचा दरही डॉलरच्या तुलनेत नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. या आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी म्हणून रशियन मध्यवर्ती बँकेने व्याज दर …
Read More »राज्यपाल कोश्यारी म्हणाले, समर्थाशिवाय शिवाजीला कोण विचारेल ? औरंगाबादेतील समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात केले वक्तव्य
मागील अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू कोण होते यावरून महाराष्ट्रात वाद निर्माण झाला होता. तसेच त्यावेळी शिवाजी महाराज यांचे गुरू समर्थ रामदास स्वामी किंवा दादाजो कोंडदेव नव्हते तर तर दस्तुरखुद्द राजमाता जीजाऊ याच होत्या यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर महाराष्ट्रात समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराज यांचे गुरु होते …
Read More »मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, “होय, आमचीही मुले इंग्रजीत शिकली पण घरात…” स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या सूचनेमुळे माझी मुले मराठीत बोलू लागली
कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत साजरा करण्यात येणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज आयोजित सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले की, बाळासाहेब असताना आमच्यावर टीका झाली की बाळासाहेब मराठी मराठी करतात आणि त्यांची मुलं इंग्रजी माध्यमात शिकतात. होय माझी दोन्ही मुलं इंग्रजी माध्यमात शिकली. परंतु त्यावेळी मला बाळासाहेबांनी बोलावून सांगितले …
Read More »दक्षिण मुंबईचा बंद पडलेला वीज पुरवठा पुन्हा कसा सुरु झाला? वाचा सविस्तर ट्रॉम्बे वीजनिर्मिती केंद्रातील संच अतिरिक्त भारामुळे पडले होते बंद
तांत्रिक बिघाडामुळे रविवारी (दि.२७) दक्षिण मुंबईतील खंडित झालेला वीजपुरवठा महापारेषणच्या प्रयत्नांमुळे तात्काळ पूर्ववत करण्यात आला. दुरुस्तीची कामे अवघ्या पाऊण ते एक तासात पूर्ण करण्यात आली. मेट्रो रेल्वेच्या कामामुळे काही वीजवाहिन्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्याचदरम्यान पर्यायी वीज वाहिन्यांत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. ट्रॉम्बे येथील मुख्य ग्रहण केंद्रामधून …
Read More »युक्रेनला एलोन मस्कची अशीही मदत इंटरनेट सुविधा शाबूत राखण्यासाठी सॅटेलाईटची दिली थेट मदत
मागील तीन चार दिवसांपासून युक्रेनवर रशियाने लष्करी कारवाई सुरु करत युक्रेनला बेचिराख करण्याचे काम रशियाकडून सुरु आहे. रशिया करत असलेल्या हल्ल्याने युक्रेनमधील इंटरनेट सुविधा आणि त्याचा डाटा सुरक्षिततेच्यादृष्टीने असलेल्या गोष्टीही उध्दवस्त होत आहेत. यापार्श्वभूमीवर एलोन मस्कने शक्तिशाली रशियाच्या विरोधात पाऊल उचलत युक्रेनला आपल्या कंपनीच्या स्पेसएक्स कंपनीने स्टारलिंक ही आपली अत्याधुनिक …
Read More »
Marathi e-Batmya