मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व प्रफुल पटेल यांची अहमदाबाद येथे अमित शहा यांच्यासोबत कोणतीही भेट झाली नाही ही अफवा पसरवून संभ्रम निर्माण करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. गेले दोन दिवस ट्वीटरवर बातम्या पसरवण्यात आल्या आणि दिव्यभास्करमध्ये …
Read More »अर्थचक्राला थांबा न देता लवकरच राज्यात लॉकडाऊन मंत्रालय, शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश बंदीचेही निर्देश
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून आज झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत, अशा सूचना देण्यात आल्या. यासंदर्भात आज आयोजित या महत्वाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे तसेच …
Read More »मुंबईत राहणार नाईट कर्फ्यू महानगरपालिकेकडून ट्विटद्वारे माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यात रात्रीची जमाव बंदी आदेश उद्यापासून रविवारपासून लागू होत आहे. मात्र मुंबईत आज ६ हजारहून अधिक रूग्ण आढळून आल्याने मुंबईतही जमावबंदीबरोबरच नाईट कर्फ्यु लागू करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने ट्विटरवरून दिली. तसेच रात्रो ८ ते सकाळी ७ वाजेपर्यत सर्व मॉल बंद राहणार असून तशी कल्पना सदर आस्थापनांना …
Read More »वाढत्या बाधितांच्या पार्श्वभूमीवर हे नवे नियम तर कार्यालयात प्रवेश बंदी मिशन बिगीन अंतर्गत अंतर्गत आदेश जारी
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोना बाधित संख्येच्या पार्शवभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार नवे निर्बंध जनतेसाठी लागू करण्यात आले असून यातील काही नियम १५ एप्रिल तर काही नियम ३० एप्रिल पर्यत लागू राहणार आहेत. त्याचबरोबर पहिल्यांदाच शासकिय कार्यालयात गर्दी होवू नये …
Read More »वाझेचे सारेच मालक चिंतेत: तो अहवाल मात्र नवाब मलिकांनीच फोडला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेना-राष्ट्रवादीला टोला
नागपूर: प्रतिनिधी सचिन वाझे प्रकरणामुळे जेवढी बदनामी महाराष्ट्राची झाली, तेवढी कोणत्याही प्रकरणाने झालेली नाही. पोलिस दलातील बदल्या, त्यासाठी पैसे घेणे, हप्ते वसुलीचे टार्गेट देणे यातून एक सिंडीकेट राज वाझेंच्या भरवशावर चालविण्यात आले. त्यामुळेच सचिन वाझेंचे सारे मालक आज चिंतेत आहेत, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना राष्ट्रवादीला लगावत पोलिस बदल्यांच्या रॅकेटचा तो …
Read More »भाजपाच्या आरोपांच्या खळखळाटाला मविआकडून थंडपणाने बांध मुख्य सचिवांच्या अहवालाने सुरुवात
मुंबई: विशेष प्रतिनिधी अँटालिया प्रकरणात मनसुख हिरेन यांचा मृत्यूदेह आढळून आल्यापासून राज्यातील राजकिय वातावरण सातत्याने तापत राहिले असून कधी निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे तर कधी परमबीर सिंग यांचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि आता पोलिस दलाच्या बदल्यांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचारप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अहवालावरून सातत्याने महाराष्ट्र कधी नव्हे …
Read More »एटीएसला दिलेला DVR परमबीर सिंग यांच्या कार्यालयाने परत का मागून घेतला? काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा सवाल
मुंबई: प्रतिनिधी परमबीरसिंह पोलीस आयुक्त असताना त्यांच्या कार्यालयातून मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यालयाचा DVR गायब झाला असून एनआयए याची चौकशी का करत नाही? गेल्या १८ दिवसापासून एनआयएने सचिन वाझे यांच्या एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याचा जबाब घेतला नाही, हे आश्चर्याचे आहे. सदर डीव्हीआर गायब करण्यामागे परमबीरसिंह यांचा हात आहे का, याची चौकशी एनआयएने करावी आणि एनआयए करत नसेल …
Read More »लॉकडाऊन तुर्तास…. मात्र राज्यात परवा रविवारपासून रात्रीची जमावबंदी रुग्णसंख्या कमी करण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सूचना
मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने काल ३५ हजाराचा आणि आज ३६ हजार रुग्ण संख्येचा टप्पा पार केला असताना या वाढत्या संख्येला रोखण्यासाठी गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्याच्यादृष्टीने काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात परवा रविवार २८ मार्च २०२१ रात्रीची जमावबंदी आदेश लागू करण्याच्या सूचना …
Read More »महिला वन अधिकारी आत्महत्या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
मुंबई : प्रतिनिधी हरीसाल, ता. धारणी (जि. अमरावती) येथे कार्यरत वन परिक्षेत्र अधिकारी श्रीमती दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस जबाबदार अधिकाऱ्यावर त्वरित गुन्हे दाखल करून निलंबित करावे, अशी मागणी महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. श्रीमती दिपाली चव्हाण यांनी स्वत:च्या रिव्हॉल्वरने गोळ्या घालुन २५ मार्च, …
Read More »फडणवीसांचा पलटवार, तो अहवाल कुंटेंनी नव्हे आव्हाड, मलिकांनी लिहिला गुन्हा घडण्याच्या शक्यतेचाही फोन टॅपिंगच्या कायद्यात समावेश
मुंबई: प्रतिनिधी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काल जो अहवाल दिला, तो त्यांनी तयारच केलेला नाही. मी त्यांना ओळखतो, ते सरळमार्गी आहेत. हा अहवाल कदाचित जितेंद्र आव्हाड किंवा नवाब मलिक यांनी तयार केला असावा आणि त्यावर मुख्य सचिवांनी स्वाक्षरी केली असावी, असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते …
Read More »
Marathi e-Batmya