Breaking News

भंडारा रुग्णालय आग प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तात्काळ चौकशीचे आदेश मृत बालकांच्या कुटुंबियांना ५ लाखाची मदत

मुंबई : प्रतिनिधी भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक …

Read More »

१० फुलं उमलण्याआधीच कोमेजली भंडारामधील घटनेवरून राज्यभरात हळहळ

भंडारा : प्रतिनिधी येथील शासकिय रूग्णालयातील लहान मुलांच्या वार्डाला आग लागून झालेल्या दुर्घटनेत १० बालकांचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली. यातीन ३ बालकांचा आगीत होरपळून तर ७ जणांचा धुराने गुदमरून मृत्यू झाला.  ही आग पहाटे २ वाजता लागली. एका नर्सने सदर वार्डाचा दरवाजा उघडला असता आतमध्ये धुरांचे लोळ पसरल्याचे दिसून …

Read More »

आता सर्वोच्च न्यायालयानेही दिली गुटखा व्यापाऱ्यांवर या कलमाखाली कारवाईला परवानगी गुटखाबंदी संदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

मुंबई : प्रतिनिधी अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदी सोबत फक्त भारतीय दंड संहितेचे कलम १८८ लागू होते,असा निर्णय उच्च न्यायालय ,खंडपीठ औरंगाबाद यांनी दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री  डॉ राजेंद्र शिंगणे यांनी स्वतः पुढाकार घेऊन व पाठपुरावा केला व  राज्य सरकारतर्फे अन्न सुरक्षा व मानदे …

Read More »

कोरोना : अॅक्टीव्ह आणि बाधित मृतकांच्या संख्येत फक्त अठराशेचे अंतर ३ हजार ६९३ नवे बाधित, २ हजार ८९० बरे झाले तर ७३ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील नव्या कोरोना बाधितांच्या संख्येवर आरोग्य विभागाने नियंत्रण मिळविण्यात बऱ्यापैकी यश मिळविले असले तरी मृतकांच्या संख्येवर म्हणावे तसे नियंत्रण मिळविता आले नाही. त्यामुळे आता अॅक्टीव्ह रूग्णांच्या संख्येत आणि मृतकांच्या संख्येत फक्त १ हजार ८६८ चे अंतर राहीले असून अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ५१ हजार ८३८ इतकी तर मृतकांची …

Read More »

प्रकल्पग्रस्तांनी थांबविले मुख्यमंत्रीही थांबले आणि जाणून घेतल्या व्यथा गोसीखुर्द धरणाच्या कामाची पाहणी करून परततांना

नागपूर: प्रतिनिधी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून आपल्या व्यथा मांडण्यासाठी वाट पाहणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आनंदाचा धक्का बसला जेव्हा अचानक मुख्यमंत्र्यांचा ताफा त्यांच्याजवळून जाताना थांबला आणि खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गाडीतून उतरून शेतकऱ्यांत मिसळले तसेच त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. आज दुपारी नागपूर दौऱ्यात गोसीखुर्द धरणाच्या कामाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घोडाझरी शाखा कालवा …

Read More »

मंत्री चव्हाणांचा सूचक प्रश्न, विनायक मेटे कोणत्या पक्षाचे आहेत? मराठा आरक्षणप्रकरणी झालेल्या बैठकीनंतर चव्हाणांचे वक्तव्य

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सध्या न्यायालयीन लढाई सुरु आहे. त्याचबरोबर मराठा समाजाच्या नेत्यांची बैठक घेत काल चर्चाही झाली. त्यावेळी मराठा समाजाचे नेते विनायक मेटे हे उपस्थित होते. मात्र ते कोणत्या पक्षाचे आहेत? असे सूचक उत्तर देत त्यांचे धोरण कोणत्या पक्षाच्या कार्यलयात ठरविले जाते जगजाहीरच असल्याचा टोला …

Read More »

मराठा आरक्षणप्रश्नी आता केंद्रातील भाजपानेही सहकार्य करावे मंत्री अशोक चव्हाण यांचे आवाहन

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील मराठा आरक्षण प्रकरणी आता भाजपाच्या केंद्र सरकारनेही मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त सर्वोच्च न्यायालयात जर केंद्राने मदत केली तर हा प्रश्न निश्चितच मदत होईल अशी अपेक्षा मराठा आरक्षण प्रश्नी नियुक्त मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज व्यक्त करत भाजपालाही यात सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. मंत्रालयातील …

Read More »

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला ही आंनददायी बाब - छगन भुजबळ

मुंबई : प्रतिनिधी ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक शहरात होणार असल्याची घोषणा आज अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केली आहे. नाशिकला हा बहुमान मिळाल्याने आपल्यासाठी अतिशय आनंददायी बाब असल्याची प्रतिक्रिया राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री …

Read More »

ना तुला ना मला घाल तिसऱ्याला असे होवू नये यासाठी चर्चा सुरुय तिघांचे सरकार चालवत असताना काही विषय कधीही निघू शकतात- अजित पवार

मुंबई: प्रतिनिधी हे तीन पक्षांचे सरकार आहे. किमान समान कार्यक्रम आम्ही तिघांनी ठरवला आहे. त्यामुळे तिघांचे सरकार चालवत असताना काही विषय कधीही निघू शकतात. याबाबत एकत्र बसून चर्चा करून योग्यपद्धतीने मार्ग काढू असे सांगतानाच यासंदर्भात आज आमची बैठक आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना दिली. …

Read More »

कोरोना : मुंबईतील मृतकांच्या संख्येत चांगलीच घट ३ हजार ७२९ नवे बाधित, ३ हजार ३५० बरे झाले तर ७२ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील मृतकांची संख्या आता चांगल्यापैकी नियंत्रणात आल्याचे दिसून येत असून एखाद्या दुसऱ्या दिवसांचा अपवाद वगळता मुंबईत सातत्याने एक अंकी मृतकांची संख्या अर्थात १० च्या आत सातत्याने नोंदविण्यात येत आहे. तसेच बाधित आढळून येणाऱ्यांची संख्याही एक हजाराच्या आत आढळून येत आहे. आज ३,३५०  रुग्ण …

Read More »