मुंबई : प्रतिनिधी जिल्हा परिषद क्षेत्रात महिला व बालकल्याण समित्यांमार्फत जिल्हा परिषद उत्पन्नातून राबविल्या जाणाऱ्या योजनेंतर्गत आता तालुकास्तरावर शिकणाऱ्या मुलींसाठी शिक्षणाची व्यवस्था असलेल्या गावी राहण्याकरिता ७ हजार रुपये व जिल्ह्याच्या ठिकाणी राहण्यासाठी १० हजार रुपये एकरकमी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. याशिवाय मुलींना …
Read More »मुंबईतील शेतकरी आंदोलनात शरद पवारांसह आघाडीचे नेते राहणार उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी २३, २४, २५ जानेवारी रोजी आझाद मैदान येथे होणाऱ्या शेतकरी आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारसाहेब हे २५ जानेवारी रोजी सहभागी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. या शेतकरी आंदोलनाला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात सर्वाधिक ३ हजार २७६ ग्रामपंचायती जिंकल्या भाजप महाराष्ट्रात २० टक्केही नाही- जयंत पाटील
मुंबईः प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात सर्वात जास्त म्हणजे ३ हजार २७६ ग्रामपंचायती जिंकल्या असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली. १३ हजार २९५ ग्रामपंचायतींच्या निवडणूका पार पडल्या. यामध्ये ३ हजार २७६ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी विजयी झाली आहे. तर काँग्रेस – …
Read More »अर्णब गोस्वामीला तात्काळ अटक करा ! गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटून केली काँग्रेसने केली मागणी
मुंबई: प्रतिनिधी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅट मधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषतः पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. या कारवाईची माहिती अर्णब गोस्वामीना घटनेच्या तीन दिवस आधीच होती असे या संभाषणातून स्पष्ट दिसत …
Read More »न्यायालयाचा चंद्रकांत पाटील यांना दिलासा मात्र आव्हान कायम निवडणूक शपथपत्राबाबतची याचिका न्यायालयाने निकाली काढली
मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीत खोटे शपथपत्र सादर केल्याप्रकरणी पुणे न्यायालयात दाखल करण्यात आलेली चंद्रकांत पाटील यांच्या विरोधातील याचिका निकाली काढल्याने पाटील यांना दिलासा मिळाला. मात्र न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात सत्र न्यायालयात लवकरच आव्हान देणार असल्याची माहिती याचिकाकर्त्ये डॉ. अभिषेक हरिदास यांनी दिली. चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणूकी दरम्यान आणि विधान …
Read More »तांडवचे निमित्त…मात्र ५ वर्षातील राजकिय घटनांचा इतिहास तत्कालीन परिस्थितीवर भाष्य करणारी वेबसीरीज
२०१४ साली झालेल्या देशातील सत्तांतरानंतर भाजपाचा दबदबा संपूर्ण देशभरात वाढला. तर दुसऱ्याबाजूला केंद्रातील भाजपा सरकारकडून लोकशाहीवादी लोकांच्या व्यक्ती स्वातंत्र्यांवर गदा येण्यास सुरुवात झाली. तसेच संपूर्ण सामाजिक जीवनाला वळण देणाऱ्या गोवंश हत्या, पाकिस्तानच्या अनुशंगाने सुरु झालेल्या राजकारणाच्या माध्यमातून देशात मुस्लिम विरोधी वातावरणाला मिळणारे खतपाणी आदी मुळे देशात पहिल्यांदाच मोदी भक्त विरूध्द …
Read More »आठवड्यातील या चार दिवशी होणार कोरोना लसीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला लसीकरणाचा आढावा
मुंबई : प्रतिनिधी राज्यात मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी होणाऱ्या कोरोना लसीकरणाचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. आठवड्यातील चार दिवस राज्यातील २८५ केंद्रांवर लसीकरण होणार असून ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवून आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यावेळी केले. वर्षा येथील समिती कक्षातून मुख्यमंत्र्यांनी …
Read More »खोटे आकडे देऊन दिशाभूल करण्यापेक्षा भाजपने पराभव मान्य करावा ४ हजारांहून अधिक ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा-बाळासाहेब थोरात
मुंबई : प्रतिनिधी राज्यात पार पडलेल्या १४ हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले असून राज्यातील चार हजारांहून अधिक ग्रामपंचायतीत काँग्रेस पक्षाने बहुमताने विजय मिळवला आहे. राज्याच्या सर्व भागातील ग्रामपंचायतीत महाराष्ट्र विकास आघाडीने ८० टक्के जागा मिळवून प्रचंड मोठा विजय मिळविला आहे. या निकालातून महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या एक वर्षाच्या …
Read More »कोरोना: ८ महिन्यानंतर पहिल्यांदाच आढळले आतपर्यंतचे सर्वात कमी बाधित १ हजार ९२४ नवे बाधित, ३ हजार ८५४ बरे झाले तर ३५ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी साधारणत: आठ महिन्यापूर्वी राज्यातील दैंनदिन कोरोना बाधितांची संख्या २ हजाराच्या आत आढळून येत असे. मात्र त्यांनंतर त्यानंतर या ८ महिन्यात सातत्याने संख्या वाढताना दिसत होती. परंतु पहिल्यादांच २ हजाराच्या आत अर्थात १९२४ इतके दैंनदिन रूग्ण आज आढळून आले. तर मागील २४ तासात आज ३,८५४ रुग्ण बरे होऊन घरी, …
Read More »सहा हजार ग्रामपंचायतींत भाजपाला बहुमत मिळेल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा दावा
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला असून सध्याच्या कलानुसार ६ हजारांपेक्षा अधिक ग्रामपंचायतींत भाजपा बहुमत मिळवेल, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी व्यक्त केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपाचे निवडणूक आघाडीचे संयोजक सुनील कर्जतकर, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख …
Read More »
Marathi e-Batmya