Breaking News

इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या नियमित कॅप फेरी-१ चे वेळापत्रक जाहीर ८ मे पर्यंत सात लाख ७४ हजार ९१८ विद्यार्थ्यांची नोंदणी

राज्यातील इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी नियमित कॅप फेरी-1 चे वेळापत्रक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. ८ मे रोजी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-1 आणि भाग-२ भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, ८ मे २०२६ …

Read More »

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदी सुवेंदू अधिकारी यांची निवड केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सुवेंदू अधिकारी यांचे नावावर शिक्कामोर्तब

भाजपा नेते सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे पुढील मुख्यमंत्री असतील आणि राज्यात सरकारचे नेतृत्व करणारे ते पहिले भाजप नेते ठरतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी भाजपचे ज्येष्ठ नेते सुवेंदू अधिकारी यांची पश्चिम बंगालमधील भाजप विधिमंडळ पक्षाचे नवनिर्वाचित नेते म्हणून औपचारिकपणे घोषणा केली. या घोषणेनंतर बिस्वा बांगला कन्व्हेन्शन सेंटरमध्ये नवनिर्वाचित …

Read More »

अखेर टीव्हीकेच्या विजय थलपती यांना राज्यपालांकडून सत्ता स्थापनेचे निमंत्रण उद्या होणार शपथविधी, ११८ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र सादर

शुक्रवारी संध्याकाळी चेन्नई येथील लोक भवनात राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची भेट घेतल्यानंतर, तामिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) चे प्रमुख विजय थलपती शनिवारी सकाळी ११ वाजता तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. विजय यांनी राज्यपालांना बहुमताचा आकडा असलेल्या ११८ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र सादर केले, ज्यानंतर त्यांना सरकार स्थापन करण्याची परवानगी मिळाली. काँग्रेस, विदुथलाई चिरुथैगल …

Read More »

“मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने”अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची संधी १५ मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” अंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांसाठी बिहार राज्यातील बोधगया येथे तीर्थदर्शन यात्रा आयोजित करण्यात येत आहे. या यात्रेसाठी इच्छुक व पात्र ज्येष्ठ नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले असून दि. १५ मे २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मुंबई उपनगर सहाय्यक आयुक्त रविकिरण पाटील …

Read More »

सरकारचा मोठा निर्णय, जिल्हा सहकारी बँकांमध्ये स्थानिक तरुणांसाठी ७०% आरक्षण ३१ जिल्हा सहकारी बँकांना आदेश लागू

महाराष्ट्र सरकारने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या (डीसीसी बँका) भरती प्रक्रियेत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सहकार, विपणन आणि वस्त्रोद्योग विभागाने जारी केलेल्या सरकारी निर्णयानुसार, आता ७० टक्के पदे संबंधित जिल्ह्याचे रहिवासी असलेल्या उमेदवारांसाठी राखीव असतील. हा सरकारी आदेश राज्यातील सर्व ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना लागू होईल. …

Read More »

संजय शिरसाट यांची चौकशीची मागणी, निदा खानला एमआयएमचा आसरा इम्तियाज जलील यांच्यासह नगरसेवकांची चौकशी करावी

नाशिकमधील बहुचर्चित असलेले टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला काल रात्री छत्रपती संभाजीनगर मधून अटक करण्यात आली. तिला एमआयएमच्या नगरसेवकाने आसरा दिल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दरम्यान, मंत्री संजय शिरसाट यांनी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्यासह त्यांच्या नगरसेवकांची चौकशी करावी अशी मागणी केली. मंत्री संजय …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, इंडियन ऑइलच्या सीएसआरमधून जे. जे. रुग्णालयाला मिळणार अत्याधुनिक ब्रॉन्कोस्कोप प्रणाली मुख्यमंत्री यांच्या पुढाकारातून श्वसनविकारांच्या निदानाला मिळणार गती

राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवांना अधिक सक्षम आणि आधुनिक करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड च्या  सीएसआर उपक्रमांतर्गत मुंबईतील सर जे.जे.हॉस्पीटी येथे अत्याधुनिक हाय-डेफिनिशन व्हिडिओ ब्रॉन्कोस्कोप प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून सर्वसामान्य …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, एल निनोच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर पूर्ण करा भूजल पातळी वाढविण्यासाठी कामे करण्याचे निर्देश

एल निनोच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण तसेच जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गतची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावीत. तसेच भूजल पातळी कमी झालेल्या ठिकाणी प्राधान्याने कामे करून तेथील भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी मृद व जलसंधारण विभागाचा  आढावा घेतला. यावेळी …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, २००२ च्या गुजरात दंगलीप्रमाणे देशभर दंगली घडवण्याचे भाजपाचे षडयंत्र पश्चिम बंगालमधील दंगली या त्याची सुरुवात, डिलिमिटेशन कमिटीत कोणत्या निवृत्त न्यायाधिशाला घ्यायचे त्यांचे नावही सुनिश्चित

भारतभरात दंगली घडवून आणण्याचे कारस्थान भारतीय जनता पक्षाकडून सुरु आहे, त्यासाठी प्रशिक्षण हाती घेतल्याची माहिती आहे. पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालापासूनच धार्मिक तेढ निर्माण करण्याची प्रक्रिया सुरु केलेली आहे. २००२ मध्ये गुजरातमध्ये जशा दंगली घडवून आणल्या होत्या, त्याच पद्धतीने देशभर दंगली करुन २०२९ च्या निवडणुका जिंकायच्या हे षडयंत्र आधीपासूनच रचले असून विधानसभा निवडणुकीनंतर …

Read More »

आशिष गुप्ता यांचे मत, मोठ्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीत संघभावना, संयम आणि सातत्यपूर्ण काम आवश्यक सायबर सुरक्षा, डेटा एन्क्रिप्शन आणि गोपनीयतेला सर्वोच्च प्राधान्य

शासन अथवा खासगी कोणताही नाविन्यपूर्ण प्रकल्प राबविताना सायबर सुरक्षा, डेटा एन्क्रिप्शन आणि गोपनीयतेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असून नाविन्यपूर्ण प्रकल्पावर काम करणा-या टीममध्ये संघभावना, संयम आणि सातत्यपूर्ण काम करणे आवश्यक असल्याचे मत निवृत्त आयपीएस अधिकारी आशिष गुप्ता यांनी व्यक्त केले. मंत्रालयातील परिषद सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक वारी २.०’ उपक्रमांतर्गत ‘इम्प्लिमेंटेशन ऑफ लार्ज आयटी …

Read More »