Breaking News

आदिती तटकरे यांचे आवाहन, ईकेवायसीच्या नावाखाली खोट्या आमिषांना बळी पडू नका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ईकेवायसी मध्ये दुरुस्ती करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ईकेवायसी (EKYC) करून देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले असून, महिलांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले. पुढे बोलताना मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, संगीतविश्वावर ८ दशके अधिराज्य गाजवणारा चिरतरुण आवाज हरपला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची श्रद्धांजली

आपल्या जादुई आवाजाने तब्बल ८ दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. २० हून अधिक भाषांमध्ये १२ हजारांहून अधिक गाणी गाण्याचा विश्वविक्रम त्यांनी केला असून प्रत्येक वयातील व्यक्तीला आवडतील अशी गाणी त्यांनी गायली आहेत. आशाताईंच्या निधनाने जगाला भुरळ घालणारा चिरतरुण आवाज हरपला …

Read More »

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू मदत आणि उपचाराला मिळणार गती, आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर करता येणार

राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य अधिक वेगात मिळणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची अद्यावत ऑनलाईन प्रणाली सुरू होणार आहे. या प्रणालीमुळे अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन ८ तासांत पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर …

Read More »

आशा भोसले यांचा स्वर कायमचा शांत, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना शोक उद्या होणार अंत्यसंस्कार

ख्यातनाम आयकॉनिक पार्श्वगायिका आशा भोसले यांचे आज रविवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी शोक व्यक्त करत श्रध्दांजली वाहिली जो भी है बस यही एक पल है’ हे गीत त्यांच्या जीवनाचे तत्वज्ञान होते’ …

Read More »

इराण आणि अमेरिका दरम्यानची पाकिस्तानातील चर्चा ठरली अखेर अपयशी २१ तास मॅरेथॉन चर्चा कोणत्याही कराराविना संपली

इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यातील अत्यंत महत्त्वाच्या चर्चेचा उद्देश दोन आठवड्यांच्या नाजूक शस्त्रसंधीला कायमस्वरूपी बनवणे हा होता. त्याऐवजी, सुमारे २१ तास चाललेली ही मॅरेथॉन चर्चा युद्ध करणाऱ्या पक्षांमध्ये कोणताही करार न होता संपली. पाकिस्तानच्या राजधानीत झालेली ही चर्चा, १९७९ च्या इस्लामिक क्रांती आणि तेहरानमधील अमेरिकन दूतावास संकटानंतर इराण आणि अमेरिका …

Read More »

पंतप्रधान मोदी यांची आयकॉनिक पार्श्वगायिका आशाताई भोसले यांना श्रद्धांजली आशा भोसले यांची गाणी अब्जावधी भारतीयांच्या जीवनात कायम वाजत राहिल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मुंबईत वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालेल्या दिग्गज गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली. शोक व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले की, त्यांची गाणी ‘अब्जावधी भारतीयांच्या जीवनात कायम वाजत राहतील.’ भारतातील सर्वात ख्यातनाम आणि अष्टपैलू आवाजांपैकी एक असलेल्या आशा भोसले जी यांच्या निधनाने अतिशय दुःख झाले. त्यांच्या …

Read More »

पार्श्वगायिका आशा भोसले, यांचा आवाज अखेर कायमचा शांत ब्रीच कँडी रूग्णालयात वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम पार्श्वगायिका आणि आपल्या अमोघ वाणीने सर्व रसिकांच्या मनाला भूरळ घालणाऱ्या आशा भोसले यांचे रविवार, १२ एप्रिल २०२६ रोजी मुंबईत निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. आशा भोसले यांना शनिवारी संध्याकाळी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या वृत्ताला दुजोरा देताना आशा भोसले यांचे पुत्र आनंद …

Read More »

प्रकल्पग्रस्तांना न्यायाचा नवा उजेड; वारसांना स्वतंत्र हक्काने पुनर्वसन लाभाचा मार्ग मोकळा मंत्री मकरंद जाधव पाटील यांचा ऐतिहासिक निर्णय; हजारो कुटुंबांच्या आयुष्यात दिलासादायक बदल

राज्यातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन प्रक्रियेत दीर्घकाळ भेडसावत असलेल्या अन्यायकारक अडचणींना अखेर पूर्णविराम मिळणार असून, मूळ जमीनधारकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना स्वतंत्र हक्काने पुनर्वसन लाभ मिळावा यासाठी शासनाने स्पष्ट आणि सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद जाधव – पाटील यांच्या पुढाकारातून झालेल्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो प्रकल्पग्रस्त …

Read More »

महसूल सेवेसाठी अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीवर बंधने, तीन वर्ष पुन्हा मूळ विभागात जावे लागणार प्रतिनियुक्तीसाठी नवी नियमावली जाहीर, शेतकरी व जनतेसाठी महसूलमंत्र्यांचा निर्णय

महसूल विभागातील राजपत्रित अधिकारी वारंवार आणि दीर्घकाळ इतर विभाग किंवा महामंडळांमध्ये प्रतिनियुक्तीवर जात असल्याने मूळ विभागातील कामकाजावर परिणाम होतो. यापुढे महसूल विभागातील अधिकाऱ्याला एकदा प्रतिनियुक्ती पूर्ण केल्यानंतर पुन्हा प्रतिनियुक्तीवर जाण्यापूर्वी मूळ विभागात किमान ३ वर्षे सेवा देणे बंधनकारक असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा …

Read More »

आता भारतीयांच्या स्वयंपाकघरासाठी पाण्यावर चालणारा स्टोव्ह पण सर्वसामान्यांना न परवडणारा

भारतातील एक नवीन हायड्रोजन कुकिंग स्टोव्ह एलपीजी सिलिंडर पूर्णपणे काढून टाकून स्वयंपाकघराच्या कार्यपद्धतीचा पुनर्विचार करत आहे. प्रति युनिट सुमारे १,५०,००० रुपये किंमत असलेली ही प्लग-अँड-यूज प्रणाली ग्रीन हायड्रोजनवर चालते आणि घरगुती तसेच व्यावसायिक वापरासाठी डिझाइन केलेली आहे. साठवलेल्या गॅसवर अवलंबून असलेल्या पारंपरिक स्टोव्हच्या विपरीत, हा स्टोव्ह इंधन म्हणून हायड्रोजनचा वापर …

Read More »