थायलंडला जाताय पण व्हिसा नाही, आता त्याची गरजच नाही थायलंड सरकारचा निर्णय

आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी थायलंडने भारत आणि तैवानच्या नागरिकांसाठी व्हिसा मुक्त प्रवेशाची घोषणा केली आहे. भारतीय १० नोव्हेंबर २०२३ ते १० मे २०२४ पर्यंत व्हिसाशिवाय थायलंडला भेट देऊ शकतात आणि तेथे ३० दिवस राहू शकतात. पर्यटन हंगामापूर्वी घेतलेल्या या निर्णयामुळे थायलंडमध्ये अधिक पर्यटक आकर्षित होतील अशी अपेक्षा आहे.

थाई सरकारचे प्रवक्ते चाय वॉचरोंके म्हणाले की या योजनेमुळे अतिरिक्त १.४ दशलक्ष पर्यटक येतील. यातून १.५ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे १२ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळेल. पंतप्रधान श्रेथा थाविसिन म्हणाल्या, आम्ही भारत आणि तैवानच्या नागरिकांना व्हिसा मुक्त प्रवेश देऊ. कारण त्यांच्या अनेक लोकांना थायलंडला जायला आवडते.

आतापर्यंत भारतीय आणि तैवानच्या पर्यटकांना इमिग्रेशन चेकपॉईंटवर १५ दिवसांच्या व्हिसासाठी अर्ज करावा लागत होता. यापूर्वी सप्टेंबरमध्ये चिनी नागरिकांसाठी व्हिसा मुक्त प्रवेशाची घोषणाही केली होती. २०१९ मध्ये बहुतेक लोक चीनमधून थायलंडला भेट देण्यासाठी आले. थायलंडमध्ये आलेल्या विक्रमी ३९ दशलक्ष पर्यटकांपैकी ११ दशलक्ष पर्यटक चीनमधून आले.

यावर्षी जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान थायलंडमध्ये २२ दशलक्ष पर्यटक आले. या पर्यटकांकडून थायलंडला २५.६७ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे २.१ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला. त्यापैकी सुमारे दहा लाख रशियन पर्यटक होते. जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान १२ लाख भारतीयांनी थायलंडला भेट दिली. थायलंडमध्ये जाण्याच्या बाबतीत भारत मलेशिया, चीन आणि दक्षिण कोरियानंतर चौथ्या क्रमांकावर आहे. थायलंडचे पर्यटन क्षेत्र त्याच्या एकूण जीडीपीमध्ये सुमारे २० टक्के योगदान देते.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, उद्योग परवानग्यांमध्ये सुलभतेसोबत महाराष्ट्रात वीजदरातही घट होणार १३ परवानग्याही लवकरच कमी करण्यासाठी प्रयत्न

महाराष्ट्रात उद्योग सुलभतेसाठी परवानगी प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आले असून ३३ परवानग्यांपैकी २० परवानग्या स्व-प्रमाणनावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *