युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) द्वारे होणारे व्यवहार देशात सातत्याने वाढत आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या मते, ऑक्टोबरमध्ये सलग तिसऱ्या महिन्यात युपीआय व्यवहारांची संख्या १००० कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. वाढत्या युपीआय व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने आता युपीआयद्वारे पेमेंट करण्यासाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. आरबीआयच्या नवीन …
Read More »हिरे, दागिने उद्योगाला प्रोत्साहन देण्याचे राज्य शासनाचे धोरण हिरे उद्योग गुजरातेत स्थलांतर होत असल्याच्या बातमीत तथ्य नाही-मंत्री उदय सामंत
मुंबईतील हिरे उद्योग गुजरातमध्ये स्थलांतर होत असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. हिरे आणि दागिने उद्योगाला प्रोत्साहन देण्याचेच राज्य शासनाचे धोरण आहे. त्यामुळेच देशातील सर्वात मोठे ज्वेलरी पार्क आपण नवी मुंबई येथे करत आहोत. तसेच राज्यात मुंबई शिवाय इतर ठिकाणी या उद्योगाच्या वाढीसाठी काय करता येईल, यासंदर्भात समिती नेमून दोन महिन्यात …
Read More »आजपर्यंतचा जीएसटी संकलनात दुसरा उच्चांक ऑक्टोबरमध्ये १.७२ लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन
गेल्या महिन्यात व्यवसाय आघाडीवर सरकारसाठी एक मोठी दिलासादायक बातमी होती. ऑक्टोबर महिन्यात सरकारने १.७२ लाख कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) जमा केला. हा आकडा वार्षिक आधारावर सुमारे १३ टक्के अधिक आहे आणि आजपर्यंतचे दुसरे सर्वोच्च संकलन होते. यापूर्वी एप्रिल २०२३ मध्ये जीएसटीची विक्रमी रक्कम जमा झाली होती. अर्थ …
Read More »तिमाहीत नफा घटूनही ऑइलकडून लाभांश जाहीर प्रति शेअर इतका देणार लाभांश
भारतातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने आपल्या भागधारकांसाठी लाभांश जाहीर केला आहे. इंडियन ऑइल प्रति शेअर ५ रुपये अंतरिम लाभांश देणार आहे. इंडियन ऑइलने आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल मंगळवारी जाहीर केले.नफा आणि उत्पन्नात घट होऊनही कंपनीने लाभांश जाहीर केला. इंडियन ऑइलने सप्टेंबर तिमाहीत …
Read More »गॅस सिलिंडरच्या दरात नोव्हेंबरच्या पहिल्यादिवशी ‘इतक्या’ रुपयांची वाढ दिवाळीपूर्वी गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतीने खाद्यपदार्थाचे वाढणार दर
व्यवसायिक वापरासाठी वापरण्यात येणारा कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या दरात जबरदस्त वाढ केली आहे. कमर्शियल गॅस सिलिंडर चे दर आता १०१. ०५ रुपयांनी वाढले आहेत. हे नवे दर बुधवारी १ नोव्हेंबर, २०२३ पासून लागू होत आहे. अर्थात, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका बसला असून हॉटेल व्यव्यसायीक आपल्या खाद्यपदार्थाच्या दाराच्या किमतीमध्ये वाढ …
Read More »देशातील सर्वात मोठा लक्झरी शॉपिंग मॉल जिओ वर्ल्ड प्लाझा १ नोव्हेंबरपासून सुरू ज्वेलर्स कार्टियर आणि बुल्गारी, फॅशन हाउस लुई व्हिटॉन, डायर आणि गुच्ची सारखे ब्रँड
रिलायन्स इंडस्ट्रीज देशातील पहिला मोठा लक्झरी मॉल सुरू करणार आहे. १ नोव्हेंबर रोजी जिओ वर्ल्ड प्लाझा मॉल उघडल्यानंतर भारतातील लक्झरी खरेदीचा अनुभव पूर्वीपेक्षा चांगला होईल. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये असलेला हा मॉल लक्झरी शॉपिंगमध्ये महत्त्वाचा टप्पा ठरेल. या मॉलमध्ये जगप्रसिद्ध ज्वेलर्स कार्टियर आणि बुल्गारी, फॅशन हाउस लुई व्हिटॉन, डायर आणि …
Read More »मुकेश अंबानींना पाच दिवसांत तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी ४०० कोटी मागितले
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यांना पाच दिवसांत तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याआधी त्याला शुक्रवार आणि शनिवारी सलग दोन धमकीचे मेल पाठवण्यात आले होते. पोलिसांनी सांगितले की अंबानी यांना सोमवारी एका ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात …
Read More »दिवाळीनिमित्त सूट, १.३२ लाखाची स्कूटर ८६ हजारांना ५००० रूपयांची अतिरिक्त सवलत
इलेक्ट्रिक दुचाकी बनवणारी कंपनी एथर एनर्जीने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सवलतीची योजना आणली आहे. कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर Ather 450s स्वस्तात उपलब्ध आहे. कंपनी Ather 450s वर ५००० रुपयांची अतिरिक्त सणाची सवलत आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर ८६०५० रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत उपलब्ध असेल. या इलेक्ट्रिक स्कूटरची मूळ किंमत १.३२ लाख रुपये असली तरी सणासुदीच्या …
Read More »निवडणूक आणि सणासुदीच्या काळात डाळ, तांदूळ महागले डाळी ३८ टक्क्यांनी महाग तर तांदूळही महागला
सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर ५ टक्क्यांच्या आसपास आला असला, तरी खाद्यपदार्थांच्या किमतीतील वाढ थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. एका वर्षात तूर डाळ जवळपास ३८ टक्क्यांनी महागली आहे. किरकोळ बाजारात तूर डाळीचा भाव १५० रुपये किलोच्या पुढे गेला आहे. त्यामुळे तांदूळ, गहू, मैद्याच्या दरातही सातत्याने वाढ होत आहे. महागड्या साखरेमुळे साखरेचा …
Read More »बंगाल सरकार टाटा मोटर्सला देणार ७६६ कोटींची भरपाई सिंगूरमध्ये कार नॅनो कार उत्पादनासाठी गुंतवणूक केली होती
टाटा मोटर्सने पश्चिम बंगाल सरकारकडून नुकसानभरपाईचा खटला जिंकला आहे. टाटा मोटर्सने मंगळवारी सांगितले की सिंगूर-नॅनो प्रकल्प प्रकरणात पश्चिम बंगाल औद्योगिक विकास महामंडळाकडून व्याजासह ७६६ कोटी रुपये वसूल करण्यासाठी लवादाच्या समितीने आपल्या बाजूने निर्णय दिला आहे. टाटा मोटर्सने सोमवारी एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली. टाटा मोटर्सने सिंगूर, पश्चिम बंगालमध्ये ऑटोमोबाईल …
Read More »
Marathi e-Batmya