मुंबई

कुर्ला पश्चिमेच्या नौपाड्यात झाड कोसळून अंगावर पडल्याने आणखी एका व्यक्तीचा मृत्यू अंगावर झाड पडल्याने ६३ वर्षिय व्यक्तीचा मृत्यू

मुंबईतील मुसळधार पावसामुळे रविवारी आणखी एका व्यक्तीचा बळी गेला, जेव्हा एक झाड अंगावर कोसळल्याने एका ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) अधिकाऱ्यांनी दिली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही घटना दुपारी १२.४० च्या सुमारास कुर्ला पश्चिमच्या नौपाडा परिसरात घडली, जिथे युनूस कुंडावाला यांच्यावर झाड कोसळल्याने ते गंभीर जखमी झाले. …

Read More »

राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे आदेश, बाल संरक्षण व्यवस्थेचा सविस्तर अहवाल सादर करा १५ जुलै पर्यंत आढावा अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अध्यक्ष यांना बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) अधिनियम, २०१५ अंतर्गत जिल्ह्यातील बाल संरक्षण व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेऊन १५ जुलै, २०२६ पर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. बाल हक्क संरक्षण आयोगाने स्पष्ट केले आहे …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा सवाल, अक्कल शिकवू नये; रस्त्यावर उतरून भाजपा नेत्यांनी काय ‘दिवे’ लावले ? मुंबईकरांचे कोट्यवधी रुपये ‘पाण्यात’; मुंबईची ‘वाताहत’ होण्यास भाजपाच जबाबदार

बृहन्मुंबई महानगरपालिकेत भारतीय जनता पक्ष मागील ३० वर्षांपासून सत्तेत आहे, यात २५ वर्षे शिवसेनेसोबतची युती आणि ज्या काळात निवडणुका झाल्या नाहीत त्या काळात प्रशासकांमार्फतही भाजपाची सत्ता होती आणि आत्ताही बीएमसीमध्ये भाजपाचीच सत्ता आहे तरीही, मुंबईच्या दुर्दशेला आपण जबाबदार नाही असे भासवून जबाबदारी झटकण्याचे काम भाजपा करत आहे, परंतु मुंबईला लुटून …

Read More »

नालासोपारा, विक्रोळी रेल्वे ट्रॅकवर पाणी, मुसळधार पावसामुळे लोकल वाहतूक विलंबाने नवी मुंबईतही पावसाची दमदार हजेरी

काल मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने मुंबई शहर आणि उपनगरासह आजही चांगलाच मुसळधार हजेरी लावली. त्यामुळे शहरातील काही भागात पाणी साचल्याचे आणि रेल्वे स्थानकातही पावसाचे पाणी चांगलेच साचल्याचे चित्र पाह्यला मिळाले. विशेषतः नालासोपारा आणि विक्रोळी रेल्वे स्थानकात पावसाचे पाणी साचल्याचे चित्र पाह्यला मिळाले. त्याचा परिणाम रेल्वे वाहतूकीवर झाल्याचे पाह्यला मिळाले. तर …

Read More »

साकीनाका मॅनहोल दुर्घटनेवरून विधानसभेत गदारोळ अधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

मुंबईतील अंधेरीतील साकीनाका परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा झालेल्या दुःखद मृत्यूची घटनेने गुरुवारी विधानसभेत गदारोळ झाला. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी या घटनेला गंभीर शासकीय निष्काळजीपणा बळी म्हटले असून, जबाबदार अधिकारी आणि कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. विधानसभा सभागृहात या विषयावरील चर्चेदरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही प्रशासनाच्या …

Read More »

३० जूनपर्यंत एचएसआरपी नंबर प्लेट बसवा अन्यथा कारवाईला सामोरे जा १ जुलैपासून नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई

राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (एचएसआरपी) बसविण्यासाठी ३० जून २०२६ ही अंतिम मुदत असून, त्यानंतर १ जुलैपासून नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच एचएसआरपी न बसविलेल्या वाहनांची आरटीओमधील अनेक महत्वाची कामेही रोखण्यात येणार आहेत. एचएसआरपी …

Read More »

पालघर जिल्ह्याच्या विकासाला वेग- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, विमानतळ आणि सागरी सेतू प्रकल्पांची मुख्यमंत्री फडणवीसांनी केली पाहणी

राज्याच्या पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकासाला नवी गती देणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा प्रत्यक्ष आढावा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी वाढवण बंदर, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प, प्रस्तावित वाढवण आंतरराष्ट्रीय विमानतळ, नारिंगी खाडी पूल आणि उत्तन–विरार सागरी सेतू या महत्त्वाच्या प्रकल्पांच्या कामांची पाहणी करून संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना …

Read More »

मुंबईतील मोहरमच्या मिरवणूकीत विषाने भरलेल्या कॅप्सुलच्या माध्यमातून, मोठा घातापाताचा कट उंदिर मारण्याच्या विषाने भरलेली १४ हजार ९०० कॅप्सूल केली जप्त

मुंबई पोलिसांनी एका संशयिताकडून विष भरलेल्या १४,९०० कॅप्सूल जप्त करून मोहरमच्या मिरवणुकीला लक्ष्य करण्याचा कथित कट उधळून लावल्याचा दावा केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान विष भरलेल्या कॅप्सूल वाटून मोठी दुर्घटना घडवण्याची योजना आखली होती. या कॅप्सूलचे वितरण होण्यापूर्वीच पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आणि त्याच्या ताब्यातून १४,९०० विषारी कॅप्सूल …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा सवाल, पक्ष फोडण्यासारखे पेपर फुटीचेही पेव फुटले, सरकार नावाची व्यवस्था आहे की नाही? टीईटी पेपर फुटी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कडक शिक्षा करा

रविवारी होणाऱ्या TET परीक्षेचा पेपर ठाण्यात लीक झाल्याने सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत असून भाजपा महायुती सरकारला एक परिक्षाही घेता येत नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे. पेपर फुटीच्या घटनांमुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन झाली आहे. या पेपरफुटीच्या रॅकेटच्या मुळापर्यंत जाऊन मास्टरमाईंडच्या मुसक्या आवळा. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करण्याऱ्यांना अशी …

Read More »

केतन अग्रवालच्या हत्येनंतर सिया गोयल, चेतन चौधरीने फोनमधील चॅट केले डिलीट पोलिसांकडून दोघांचे फोन फॉरेन्सिक लॅबला पाठविले

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवाल यांची हत्या झाली; त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी १८ जून रोजी झालेल्या हत्येपूर्वी आणि केतन अग्रवाल यांना लोहगड किल्ल्यावरून खाली ढकलून त्याची हत्या केल्यानंतर, असे दोन्ही वेळी आपापल्या मोबाईलमधील चॅट्स (संवाद) डिलीट केले. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानेच त्यांनी …

Read More »