मुंबई

रुग्णालयाच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यावर शिंदे गटाच्या शिवसैनिकांचा पुन्हा एकदा हल्लाबोल दही हंडीच्या दिवशी जखमी गोविंदाला डिस्चार्ज देण्यावरून पालघरमधील रुग्णालयातील घटना

जखमी गोविंदाला डिस्चार्ज देण्यावरून पालघरच्या रुग्णालयात रात्री उशिरा शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांचा डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी संघर्ष अर्थात मारहाण केली. ज्यामुळे वाद विकोपाला गेला. रिलीफ हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये शिवसेना पालघर शहर प्रमुख राहुल घरात एका रुग्णालय कर्मचाऱ्याला मारहाण करताना दिसत आहेत, तर एक महिला कर्मचारी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत असताना तिला …

Read More »

संजय गांधी राष्ट्रीय उद्याना लगतच्या रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी हालचाली गतिमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न, पहिल्या टप्प्यात ४ हजार नागरिकांचे पुनर्वसन होणार

गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला गती देण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात ४ हजार रहिवाशांच्या पुनर्वसनाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सह्याद्री अतिथीगृहावर याबाबत आज उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत उद्यानाच्या हद्दीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा सविस्तर आढावा घेऊन, येथील नागरिकांच्या …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन, ‘नशामुक्त महाराष्ट्र’ला बळकटी देण्याचे काम दहीहंडीच्या उत्सवातून व्हावे वरळी, दादर, घाटकोपर येथे आयोजित विविध दहीहंडी उत्सवाना भेट

युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी, सक्षम आणि व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी योगदान द्यावे, यासाठी सामाजिक उपक्रमांना व्यापक लोकसहभागाची जोड देणे आवश्यक आहे. उत्साहाने भरलेल्या दहीहंडीच्या उत्सवामधून ‘नशामुक्त महाराष्ट्र’ या संकल्पनेला बळकटी देण्याचे काम व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी वरळी, दादर, घाटकोपर येथे आयोजित विविध दहीहंडी उत्सवांना …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, भाजपाने सेंच्युरी मिलची १३ हजार कोटींची जमीन कवडीमोल भावाने बिल्डरच्या घशात घातली सेंच्युरी मिलचा लीज प्रस्ताव ताबडतोब थांबवा आणि गिरणी कामगारांचे ऑनसाइट पुनर्वसन सुनिश्चित करा

मोदी सरकार सरकारने सत्तेत आल्यापासून देशाची सार्वजनिक संपत्ती खास उद्योगपतींच्या घशात घालण्याचा सपाटा लावला असून मुंबईतील धारावी, रेल्वे, मिठागरांच्या जमिनींपासून बीएमसीच्या मोक्याच्या भूखंड खास लोकांनाच विकले आहेत. २२ BEST डेपो, वरळी लॅबोरेटरी-प्लांट, मदर डेअरी, देवनार व मुलुंड डंपिंग ग्राउंड यांसारख्या सार्वजनिक जमिनी बहाल केल्यानंतर आता लोअर परळमधील सेंच्युरी मिलची जमीनही …

Read More »

दहिहंडीच्या उत्सवात पुण्यात एक महिलेचा मृत्यू मुंबई ठाण्यात ४२ गोविंदा जखमी जखमीना रूग्णालयात दाखल केले तर काहींना उपचार करून सोडून देण्यात आले

पुण्यात दहीहंडीच्या उत्सवादरम्यान एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि मुंबई व ठाण्यात किमान ४२ गोविंद जखमी झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. पुण्यात लाऊडस्पीकरला आधार देणारी तात्पुरती लोखंडी रचना अंगावर कोसळल्याने सलमा सलाउद्दीन पठाण यांचा मृत्यू झाला, तर मुंबई आणि ठाण्यातील कार्यक्रमांमध्ये मानवी मनोरे तयार करताना गोविंद जखमी झाले. …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, वांद्र्यातील अपघात प्रकरणी कार चालक महिलेला कठोर शिक्षा करा वांद्र्यात कार अपघातात मृत्यू पावलेल्या अंश गुप्ताच्या आई वडिलांची वर्षा गायकवाड यांनी घेतली सांत्वनपर भेट

वांद्रे पश्चिम येथे रविवारी एका कार अपघातात  ८ वर्षांच्या अंश गुप्ता या चिमुरड्याचा मृत्यू झाला. ही घटना मनाला वेदना देणारी आहे. या अपघाताची पोलीसांनी गंभीर दखल घेऊन कार चालक महिलेवर कठोर शिक्षा होईल अशी कारवाई करावी तसेच पीडित कुटुंबाला आर्थिक मदतीसह न्याय मिळावा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड …

Read More »

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आश्वासन, मुंबईतील लोकल फेऱ्यांची संख्या २०३० पर्यंत ३,५०० पर्यंत वाढविणार मुंबई-सावंतवाडी एक्स्प्रेसचा शुभारंभ, गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना मोठी भेट

मुंबईतील विद्यमान रेल्वे व्यवस्था विश्वासार्ह असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तिचे उन्नयन करण्यात येणार आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेची क्षमता वाढविण्यासाठी सुमारे १८ हजार कोटी रुपयांची विविध कामे सुरू आहेत. सध्या दररोज धावणाऱ्या सुमारे ३ हजार २०० लोकल फेऱ्या आधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणातून २०३० पर्यंत ३ हजार ५०० पर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, मुंबईत १० टक्के पाणी कपात असताना टँकरला पाणी मिळते कुठून? टँकर लॉबीला कोणाचा आशिर्वाद?

मुंबईतील काही सोसायट्यांना दहा टक्के पाणी कपातीचा फटका बसत आहे आणि या सोसायटीमधील नागरिकांना पाण्याचे टँकर बोलावावे लागतात. एखाद्या भागात विकास झाला नसेल, पाण्याची पाइपलाइन पोहोचली नसेल, पाण्याचे डेडिकेटेड स्त्रोत नसतील, तर टँकरने पाणी पुरवठा करणे हे समजू शकते परंतु पाणी कपात असताना या टँकरला पाणी कोठून मिळते, या टँकर …

Read More »

आ. रईस शेख यांची मागणी कूपर आणि सायन रुग्णालयांत यंत्रांच्या खरेदी विलंबप्रकरणी विपिन शर्मा यांची चौकशी करा समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांचे पालिका आयुक्तांना पत्र

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कूपर आणि सायन रुग्णालयांसाठी क्ष-किरण यंत्रे खरेदी प्रकरणी दोन वर्षांच्या विलंबाकडे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी लक्ष वेधले. रोग निदानासाठी आवश्यक असलेल्या उपकरणांच्या अभावामुळे रुग्णांचा जीव धोक्यात आला असून अनेकांना खाजगी रुग्णालयांत महागड्या उपचारांचा आधार घ्यावा लागत आहे, असा आरोप आमदार रईस शेख यांनी केला. आमदार रईस …

Read More »

मुंबईतील ३९ बालगृहांतील ६०० हून अधिक भाऊ-बहिणी रक्षाबंधनानिमित्र एकत्र ‘टीम अवर चिल्ड्रन्स’चा अनोखा उपक्रम

मुंबई शहर आणि उपनगरातील विविध ३९ बालगृहांमध्ये राहणाऱ्या ६०० हून अधिक भाऊ-बहिणींना ‘टीम अवर चिल्ड्रन्स’ने रक्षाबंधनानिमित्त एकत्र आणले. सायन येथील श्री मानव सेवा संघ येथे रक्षाबंधन उत्साहात झाले. बालगृहांमध्ये आश्रय घेणाऱ्या बालकांसाठी हा सोहळा केवळ सण साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता, भावंडांमधील प्रेम, आपुलकी आणि कौटुंबिक जिव्हाळा अनुभवण्याचा अनोखा क्षण …

Read More »