रविवारी होणाऱ्या TET परीक्षेचा पेपर ठाण्यात लीक झाल्याने सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत असून भाजपा महायुती सरकारला एक परिक्षाही घेता येत नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे. पेपर फुटीच्या घटनांमुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन झाली आहे. या पेपरफुटीच्या रॅकेटच्या मुळापर्यंत जाऊन मास्टरमाईंडच्या मुसक्या आवळा. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करण्याऱ्यांना अशी …
Read More »केतन अग्रवालच्या हत्येनंतर सिया गोयल, चेतन चौधरीने फोनमधील चॅट केले डिलीट पोलिसांकडून दोघांचे फोन फॉरेन्सिक लॅबला पाठविले
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवाल यांची हत्या झाली; त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी १८ जून रोजी झालेल्या हत्येपूर्वी आणि केतन अग्रवाल यांना लोहगड किल्ल्यावरून खाली ढकलून त्याची हत्या केल्यानंतर, असे दोन्ही वेळी आपापल्या मोबाईलमधील चॅट्स (संवाद) डिलीट केले. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानेच त्यांनी …
Read More »उदय सामंत यांची माहिती, केईएम रुग्णालयाच्या नामांतराबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान दिली माहिती
मुंबईतील ऐतिहासिक केईएम (किंग एडवर्ड मेमोरियल) रुग्णालयाचे नाव बदलण्याबाबत राज्य शासनाकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. सदस्य सचिन अहिर, प्रवीण दरेकर, अनिल परब, बच्चू कडू, प्रसाद लाड यांनी उपप्रश्न उपस्थित केले होते. मंत्री उदय …
Read More »राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी इच्छुक शिक्षकांनी ऑनलाइन स्व-नामांकन सादर करण्याचे आवाहन १० जुलै पर्यंत स्व-नामांकन अर्ज सादर करता येणार
केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार- २०२६ साठी ऑनलाइन स्व-नामांकन प्रक्रियेस प्रारंभ झाला असून राज्यातील पात्र शिक्षकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे. शिक्षण संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी स्व-नामांकन प्रक्रिया दि. १५ जून २०२६ पासून सुरू झाली आहे. राज्यातील शासकीय, स्थानिक …
Read More »अन्न सुरक्षेबाबत एफएसएसएआयचे कडक निर्देश नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा अन्न हाताळणीसाठी फक्त फूड-ग्रेड व गंजरोधक उपकरणे वापरणे बंधनकारक
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना अन्न सुरक्षा नियमांची काटेकोर व प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. अन्न हाताळणी, प्रक्रिया आणि पॅकिंग करताना केवळ फूड-ग्रेड, विषमुक्त आणि गंजरोधक सुरी, ब्लेड; तसेच इतर कापण्याची उपकरणे वापरणे बंधनकारक असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. एफएसएसएआयने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार, काही अन्न व्यवसायांमध्ये …
Read More »इयत्ता १० व १२ वी च्या परीक्षांचे प्रवेशपत्र उपलब्ध जुलै महिन्यात होणाऱ्या परिक्षेसाठी प्रवेश पत्र तयार
इयत्ता १० व इयत्ता १२ वी च्या जुन – जुलै २०२६ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने ८ जून २०२६ पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रवेशपत्र महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर Admit Card या लिंकद्वारे डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत. जून- जुलै २०२६ परीक्षेसाठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशपत्रे प्रिंट काढून विद्यार्थ्यांना …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, सिंगापूर-हाँगकाँगच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्यात येणार धारावीत उभारला जाणार देशातील पहिला मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट हब
सिंगापूर आणि हाँगकाँगमधील आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्यात यावा. मात्र, हा प्रकल्प राबविताना धारावीतील नागरिक, त्यांची उपजीविका आणि स्थानिक वैशिष्ट्ये यांना केंद्रस्थानी ठेवण्यात यावे. ठरलेल्या कालावधीतच प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात धारावी पुनर्विकास प्रकल्पाची आढावा बैठक …
Read More »नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल १ वर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण अत्यंत उत्साहात पार पडले. हा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अलौकिक नेतृत्व आणि देदिप्यमान वारशाला वाहिलेली आदरांजली असून, तो महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवतो. …
Read More »आशिष शेलार यांची ग्वाही, आरे परिसरात भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी जंगल निर्माण करणार आरे परिसरात ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविण्यात येणाऱ्या ‘हरित महाराष्ट्र – ३०० कोटी वृक्षारोपण’ मोहिमेअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर वृक्षारोपणाचा संकल्प करण्यात आला असून याअंतर्गत आरे परिसरातील तब्बल ८० एकर रिक्त जागेत ५ लाख झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. आरेला कागदावर जंगल म्हणून ओळख मिळाली होती; आता ती केवळ नोंदीपुरती न ठेवता प्रत्यक्षात हिरवाईने बहरलेले, समृद्ध आणि भविष्यातील पिढ्यांसाठी …
Read More »शिवेंद्रराजे भोसले यांचे निर्देश, एअर इंडिया इमारतीची संरचनात्मक तपासणी करा १५ ऑगस्टपासून इमारत वापरात आणण्याचे नियोजन
एअर इंडियाच्या इमारतीत शासकीय कार्यालयांचे स्थलांतर करण्यापूर्वी इमारतीची सखोल संरचनात्मक तपासणी करण्यात यावी. तसेच आवश्यक दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतरच अंतर्गत सजावट आणि इतर विकासकामे हाती घेण्यात यावीत, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बुधवारी दिले. एअर इंडिया इमारतीची दुरुस्ती तसेच रंगरंगोटी करून इमारत येत्या १५ ऑगस्टपासून वापरत आणण्याचे …
Read More »
Marathi e-Batmya