महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टेस्ला एक्सपीरियन्स सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला. जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार निर्माता टेस्लाने भारतीय बाजारात प्रवेश केला आहे. मुंबईत त्यांच्या पहिल्या एक्सपीरियन्स सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, …
Read More »मुंबईत १०६ ठिकाणी शिव आरती व शिव जल्लोष छत्रपती शिवाजी पार्कवर साजरा झाला जल्लोष
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन मिळाल्या बद्दलचा आनंद साजरा करण्यासाठी उद्या मुंबई भाजपातर्फे मुंबईत १०६ ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती व शिव जल्लोष साजरा करण्यात आला. तर आज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर जल्लोष करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेले …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबर मध्ये पहिल्या विमानाचे “टेक ऑफ” जगातील सर्वात जलद "बॅग क्लेम" प्रणाली होणार कार्यान्वित
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जगातील सर्वात जलद “बॅग क्लेम सिस्टीम” विकसित करण्यात यावी, हे या विमानतळावरील प्रमुख वैशिष्ट्य असावे, अशी सूचना आज मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना येथे दिली. सद्य:स्थितीत या विमानतळाचे ९४ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित सहा टक्के काम सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करून सप्टेंबरमध्येच पहिले प्रवासी विमान उडणार, याची …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कर्नाक पुलाचे सिंदूर नामकरण, काळ्या इतिहासाच्या खुणा पुसल्या ऐतिहासिक सिंदूर (कर्नाक) पुलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
दिडशे वर्षांपासून या पुलाला कर्नाक पूल म्हणून ओळख आहे. भारतीयांना फसविणारा आणि अत्याचार करणारा कर्नाक हा ब्रिटीश गव्हर्नर असल्याने त्याच्या काळ्या इतिहासाच्या खुणा पुसण्यासाठी कर्नाक पुलाचे सिंदूर नामकरण केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डी’ मेलो मार्गाला जोडणाऱ्या या सिंदूर (पूर्वीचे कर्नाक) …
Read More »पोलिसांच्या दडपशाहीला न जुमानता मीरा रोडमध्ये मनसे-शिवसेना उबाठाचा मोर्चा शिंदे गटाच्या प्रताप सरनाईक यांना मोर्चेकऱ्यांनी हाकलून लावले
मीरा भाईंदर येथे पोलिसांनी सुरुवातीला मोर्चाला परवानगी नाकारली असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि शिवसेना उबाठाच्य़ावतीने आज मीरा रोड येथे मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर भव्य मोर्चा काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. “मराठी माणूस गप्प बसणार नाही” हा संदेश देत हजारो मनसे आणि शिवसेना उबाठाचे कार्यकर्त्यांसह स्थानिक मराठी नागरिक रस्त्यावर उतरले. विशेष म्हणजे …
Read More »सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले, “गिरगावच्या शाळेतील शिक्षकांमुळे मी घडलो” शिक्षकांविषयी सरन्यायाधीश भूषण गवई यांची कृतज्ञता
देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज गिरगाव येथील चिकित्सक समूह शिरोळकर विद्यालयाला भेट देत आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण घेतलेल्या या विद्यालयात पुन्हा पाऊल ठेवतांना सरन्यायाधीश श्री. गवई यांनी आपली जडणघडण करणाऱ्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. या प्रसंगी राज्याचे कौशल्य विकास मंत्री व मुंबई शहर जिल्ह्याचे …
Read More »सरन्यायाधीश भूषण गवई यांची स्पष्टोक्ती, डॉ आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही प्रेरणादायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यापन कारकीर्दीस ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शासकीय महाविद्यालय येथे स्मृतिपटलाचे अनावरण
विविध विषयांचे अभ्यासक व तज्ञ असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्त्व विधीज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्रज्ञ असे बहुआयामी होते. शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाबरोबरच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही मोलाची आणि प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले. शासकीय विधी महाविद्यालय येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्राध्यापक आणि प्राचार्य, कारकीर्दीला …
Read More »दादासाहेब फाळके चित्रनगरीतील निकृष्ट कामाचे अखेर त्रयस्थ संस्थेमार्फत लेखापरीक्षण डेमोक्रॅटिक आरपीआयच्या आंदोलनाची दखल
मराठी भाषा दिनी मोठ्या दणक्यात खर्च करून सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी उदघाटन केलेल्या गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीतील स्टुडिओला अवकाळी पावसातच लागलेल्या गळती प्रकरणाचे त्रयस्थ संस्थेमार्फत लेखापरीक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. व्यवस्थापनाच्या या आदेशनानंतर या प्रकरणी आंदोलन करण्याचा इशारा देणाऱ्या डेमोक्रॅटीक आरपीआयने आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले. …
Read More »स्वतःला कोंडून रहात असलेल्या नवी मुंबईतील प्रोगामरची सीलने केली सुटका कुटुंबियांचा मृत्यू, मोठ्या भावाची आत्महत्या त्यामुळे कोंडून घेतले होते
नवी मुंबईतील एका ५५ वर्षीय व्यक्तीला गेल्या आठवड्यात त्याच्या अपार्टमेंटमध्ये तीन वर्षांहून अधिक काळ स्वतःला कोंडून ठेवल्यानंतर, आणि बाहेरील जगापासून पूर्णपणे अनभिज्ञ राहिलेल्या एकाची सुटका करण्यात आली. अनुप कुमार नायर असे या व्यक्तीचे नाव आहे. तो गंभीर नैराश्याने ग्रस्त होता आणि मानसिक आघात आणि नैराश्यामुळे त्याने स्वेच्छेने स्वतःला कोंडून घेतले …
Read More »धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली अदानीसाठी पुन्हा सवलत धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विशेष हेतू कंपनीस भाडेपट्टा कराराच्या मुद्रांक शुल्क माफ
धारावी पुनर्विकासाची निविदा जाहिर केल्यापासून अनेक विशेष अटी आणि नियमात दुरुस्ती करत अनेक सवलती राज्य सरकारकडून अदानी कंपनीसाठी जाहिर केल्या. इतकेच नव्हे तर अदानीने धारावीच्या पुनर्विकासासाठी एखाद्या मागणी प्रशासनासमोर ठेवल्यास त्यास सात दिवसाच्या आत किंवा विहित कालावधीत संबधित प्रशासनाने मान्यता देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच मिठागरांच्या जमिनी, मदर डेअरीची …
Read More »
Marathi e-Batmya