मुंबई

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली अदानीसाठी पुन्हा सवलत धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विशेष हेतू कंपनीस भाडेपट्टा कराराच्या मुद्रांक शुल्क माफ

धारावी पुनर्विकासाची निविदा जाहिर केल्यापासून अनेक विशेष अटी आणि नियमात दुरुस्ती करत अनेक सवलती राज्य सरकारकडून अदानी कंपनीसाठी जाहिर केल्या. इतकेच नव्हे तर अदानीने धारावीच्या पुनर्विकासासाठी एखाद्या मागणी प्रशासनासमोर ठेवल्यास त्यास सात दिवसाच्या आत किंवा विहित कालावधीत संबधित प्रशासनाने मान्यता देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच मिठागरांच्या जमिनी, मदर डेअरीची …

Read More »

मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे आदेश, नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे

राज्यात मागील काही दिवसात घडलेल्या विविध दुर्घटना आणि त्यात झालेले नागरिकांचे मृत्यू हे अतिशय दुर्दैवी आहेत. नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करावे, असे आदेश मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले. रेल्वे प्रवासात होणाऱ्या दुर्घटना टाळण्याकरिता प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्याची सूचना त्यांनी केली. मुंबईत …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, डोंगरांवरील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी धोरण तयार करा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या कामांचा घेतला आढावा

मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये डोंगरांवर बऱ्याच झोपडपट्ट्या आहेत. अशा झोपडपट्ट्या पावसाळ्याच्या दिवसात भूस्खलन तसेच दरड कोसळल्यास धोकादायक ठरतात. डोंगरांवरील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत पात्र झोपडपट्टी धारकांचे त्यांच्या सध्याच्या निवासाच्या नजिकच पुनर्वसन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला म्हाडाच्या प्रकल्पांचा व प्रस्तावित नियमावलींचा आढावा बीडीडी चाळीच्या सदनिकांचे हस्तांतरणाचे नियोजन

विकास नियंत्रण नियमावली ३३ (७) अंतर्गत प्रस्तावित सुधारणा यासह म्हाडाच्या विविध अधिनियम अंतर्गत प्रस्तावित सुधारणांचा तसेच म्हाडा मार्फत राबविण्यात येणाऱ्या बीडीडी चाळ व इतर प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, नगर विकास …

Read More »

एमएमआरमध्ये एकात्मिक बस वाहतुकीसाठी टास्क फोर्स बेस्टचे महाव्यवस्थापक टास्क फोर्सचे अध्यक्ष

महाराष्ट्र सरकारने मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) साठी एकात्मिक बस वाहतूक योजना तयार करण्यासाठी १२ सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना केली आहे. त्याचा उद्देश प्रवाशांना एकाच तिकीट प्रणालीद्वारे अखंड प्रवास अनुभव प्रदान करणे आहे. महाव्यवस्थापक बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि वितरण लिमिटेड (पश्चिम), मुंबई यांना टास्क फोर्सचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. हे टास्क …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, अदानीला आणखी १३ लाख चौरस फूट जागेचा TDR देण्याचा घाट भाजपा युती सरकार पंतप्रधानांच्या मित्रासाठी सरेंडर, म्हाडाने बांधलेल्या इमारतींचा फायदाही अदानीलाच?

अदानीचा एक लाख कोटी रुपयांचा धारावी विनाश महाघोटाळा दिवसेंदिवस रौद्ररूप धारण करत आहे. या महाघोटाळ्याचा नवा अध्याय म्हणजे, अदानी सरकार अदानीला तब्बल १३.३९ लाख चौरस फूट विक्रीयोग्य क्षेत्र (sale incentive area) TDR स्वरूपात गिफ्ट देऊ इच्छित आहे. ते पण अशा पुनर्वसन घरांसाठी/ गाळ्यांसाठी, जे अदानीने बांधलेले देखील नाहीत, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा …

Read More »

मुंब्रा ते दिवा दरम्यान चालत्या ट्रेनमधून पडून ४ जणांचा मृत्यू तर ७ ते ८ जण जखमी जखमींना तात्काळ रूग्णालयात राज्य सरकारकडून

सोमवारी सकाळी ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ चालत्या ट्रेनमधून अनेक प्रवासी पडल्याने किमान पाच जणांचा मृत्यू झाला आणि सात ते आठ जण जखमी झाले, अशी माहिती मध्य रेल्वेच्या प्रवक्त्याने दिली. या घटनेचे कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात सुरु करण्यात आल्याचे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून कसाराला जाणारी ट्रेन दिवा-मुंब्रा …

Read More »

वर्षा गायकवाड यांची खोचक टीका,… अदानीला भस्म्या रोग डोनाल्ड ट्रम्पचा फोन येताच नरेंदर सरेंडर तर अदानी साठी मोदींचा फोन येताच देवेंदर सरेंडर

मुंबईतील जमिनी लुटण्याचा भस्म्या रोग अदानीला जडला असून संपूर्ण मुंबई त्यांना गिळायची आहे आणि त्यासाठी भाजपा सरकार स्थानिकांचा विरोध डावलून अदानीला जमिनी देत सुटले आहे. कुर्ला मदर डेअरीची जमीन पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असताना केवळ अदानीच्या आग्रहाखातर ती हस्तांतरित करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयाला जनतेचा तीव्र विरोध असतानाही या सरेंडर सरकारने …

Read More »

मुंबईसह राज्यातील या जिल्ह्यांमध्ये २४ तासात पडला इतका पाऊस राज्यात काल मुंबई शहर जिल्ह्यात सर्वाधिक ४१ मिमी पाऊस

राज्यात मागील २४ तासांमध्ये (८ जून रोजी सकाळपर्यंत ) मुंबई शहर जिल्ह्यात सर्वाधिक ४१ मिमी पाऊस झाला आहे. तर रायगड २०.८ मिमी, धाराशिव १३.८ मिमी, ठाणे ७.९ मिमी, रत्नागिरी जिल्ह्यात ६.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. राज्यात कालपासून आज ८ जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे …

Read More »

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा फॉर्म-२ भरण्यासाठी ७ जूनपर्यंत मुदतवाढ दुपारी १२.३० वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत

इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये पहिल्या फेरीसाठी अर्ज भरण्यासाठी २६ मे ते ५ जून २०२५ हा कालावधी विद्यार्थ्यांना देण्यात आला होता. या कालावधीमध्ये ५ जून २०२५ पर्यंत ११,२९,९२४ विद्यार्थ्यांनी आपले फॉर्म पूर्ण (भाग १ व भाग २) भरले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन नोंदणी करून प्रवेश अर्जाचा भाग …

Read More »