मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ७ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून राज्याच्या आयटी आणि सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव चंद्रा रस्तोगी यांची नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या प्रकल्प संचालक पदी नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर डॉ.एच.मोडक यांची सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपसचिव पदी नियुक्ती करण्यात आली. डॉ.संदिप राठोड यांची हाफकिन बायो-फार्मा कार्पोरेशनच्या …
Read More »राऊत म्हणाले फडणवीसांना “कुंडल्या घेऊन बसलोय”, हि धमकीच होती ना शिवसेनेचा पलटवार
मुंबई: प्रतिनिधी वर्षपूर्तीनिमित्त दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विरोधकांना धमकी दिल्याचा आरोप आज विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस करत आहेत. मला वाटत नाही की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असं कुठेही बोलले. मात्र फडणवीसांना जर ही धमकीची भाषा वाटत असेल तर देवेंद्र फडणवीस हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सरकारविरोधात बोलणाऱ्यांच्या कुंडल्या …
Read More »मुख्यमंत्री ठाकरेंची वक्तव्ये प्रतिक्रिया द्यायच्या लायकीची नाहीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा टोला
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालेले आहे. त्यांना पाच वर्षे सरकार चालवायचं आहे. त्यांनी ते जरूर चालवाव आमची काही आडकाठी नाही. मात्रमहाविकास आघाडीचं सरकार हे सगळ्या बाबतीत अपयशी ठरलेलं आहे. राज्याच्या इतिहासात धमकावणारे मुख्यमंत्री कधीही पाहिलेले नाहीत. याच्यामागे हात धुवून लागू, त्याची खिचडी करू, याचा …
Read More »ठाकरे सरकारने वैयक्तिक सुडाने पेटून महापालिकेला तोंडघशी पाडले भाजपा नेते अॅड. आशिष शेलार यांची टीका
मुंबईः प्रतिनिधी कु-हेतू, वैयक्तिक सुडबुध्दीचे राजकारण महाराष्ट्रात गेल्यावर्षभर सुरु आहे. यावर आता मुंबई उच्च न्यायालयाने जणू शिक्का मोर्तबच केले. ठाकरे सरकारने, वैयक्तिक सुडाने पेटून मुंबई महापालिकेला तोंडघशी पाडल्याचा आरोप भाजपाचे माजी मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केला. आता कंगणा रनौत यांना नुकसान भरपाई द्यावी लागली तर…? कंगणा यांच्या विरोधात उभ्या …
Read More »कंगनाला द्यायची नुकसानभरपाई व वकिलांची फी मुख्यमंत्री ठाकरेंच्या खिशातून द्या आ. अतुल भातखळकर यांची मागणी
मुंबई : प्रतिनिधी कंगना राणावतच्या घरावरील कारवाई बेकायदेशीर असल्याचा निर्णय देत उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला जोरदार चपराक लगावली आहे. मुंबई महानगरपालिकेकडून सूडबुद्धीने करण्यात आलेल्या कारवाईचा बोलविता धनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच होते, त्यामुळे ‘उखाड दिया’ म्हणणाऱ्यांनाच उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयाद्वारे ‘उखाड दिया हैं’ अशी टीका भाजपचे मुंबई प्रभारी व कांदिवली …
Read More »बोगस क्रीडा प्रमाणपत्राद्वारे सरकारी नोकरीचा फायदा उचलणाऱ्यांना चाप लावणार नवीन नियमावली आणणार क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यामध्ये बोगस प्रमाणपत्राच्या आधारे खेळाडू दाखवून शासकीय सेवेचा लाभ घेतल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. असे प्रकार भविष्यात होणार नाहीत यासाठी नवीन नियमावली आणणार असल्याचे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. राज्यातील क्रीडा विभागाचा विभागनिहाय आढावा बैठकीचे मंत्रालयात आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी …
Read More »ED चे आदेश प्रताप सरनाईक हाजीर हो.. क्वारंटाईन कालावधी संपल्यावर हजर राहा
मुंबईः प्रतिनिधी एमएमआरडीतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर मंगळवारी कारवाई करत त्यांच्या मुलाला ताब्यात घेतले. त्यानंतर आता प्रताप सरनाईक यांनाही ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून क्वारंटाईन कालावधी संपल्यावर हजर राहण्याचे आदेश बजाविण्यात आले. मुंबई बाहेरुन आल्यामुळे सरनाईक यांनी स्वःताला क्वारंटाईन करून घेतले. दरम्यान, आपण …
Read More »अजित दादांचे विठ्ठलाला साकडे, लस लवकर येऊ दे, अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते श्री विठ्ठलाची पूजा संपन्न
पंढरपूर : प्रतिनिधी कोरोना विषाणूवरील लस लवकर येऊ दे आणि अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सौ. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे …
Read More »मोदींची नवी घोषणा,” वन नेशन, वन इलेक्शन”…व्हिडिओ पाह्यला विसरू नका संविधान दिनाचे औचित्य साधत पंतप्रधानांची घोषणा
मुंबईः प्रतिनिधी देशात सतत कोणत्या ना कोणत्या भागात निवडणूका सुरु असतात. त्यामुळे सुरु असलेल्या विकास कामांमध्ये अडथळा निर्माण होतो. तसेच नागरिक म्हणून त्याचा त्रास ही होतो. त्यामुळे वन नेशन-वन इलेक्शन अर्थात एक देश एक निवडणूकी संकल्पना राबविण्याचा विचार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जाहीर केले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ …
Read More »मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले पोलिसांना हे वचन २६/११ ही काळजावरची जखम असल्याने पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी सदैव कटिबद्ध
मुंबई : प्रतिनिधी सण, उत्सव असो वा सभा असो जमलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आमचे पोलीस चोवीस तास कर्तव्य बजावत असतात. स्वत:च्या कुटुंबातील, घरातील सुख दु:ख बाजूला ठेवून जनतेच्या सुख दु:खात सामिल होणाऱ्या आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे. पोलीस विभागाच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन सदैव कटिबद्ध असून त्यांच्यासाठी जे जे करणे शक्य …
Read More »
Marathi e-Batmya