मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या महसूली यंत्रणेत महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या तहसीलदार, नायब तहसीलदारांनी आपल्या विविध मागण्यासंदर्भात बेमुदत काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले. तसेच ८ मार्च २०२१ रोजीपासून काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा तहसीलदार संघटनेने दिला असून मागण्यांवर तोडगा न निघाल्यास आंदोलनाचा निर्वाणीचा इशारा दिला. तहसीलदार संघटनेच्या या इशाऱ्याची महसूल मंत्री बाळासाहेब थोरात …
Read More »भराडी देवीच्या साक्षीने मुख्यमंत्र्यांनी दिले कोकणवासीयांना हे वचन कोकणातील युवकांनी शेतीची कास धरावी
मुंबई-मालवण : प्रतिनिधी शेती ही शाश्वत आहे. कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांनी फक्त दोन घास दिले नाहीत तर अर्थव्यवस्थेला बळ देण्याचे कामही केले. याचा विचार करून कोकणातील युवकांनी शेतीच्या व्यवसायाकडे वळावे. शासनाने सुरू केलेल्या विकेल ते पिकेल या योजनेच्या माध्यमातून कोकणवासियांनी कोकण सुजलाम सुफलाम करावा असे आवाहन करत भराडी देवीच्या साक्षीने मी सांगतोय कोकणचा विकास …
Read More »आघाडी सरकारच्या गुन्हेगारीकरणा विरोधात २० हजार सभा घेणार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी महाआघाडी सरकारच्या काळात झालेल्या राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरोधात राज्यात छोट्या सभांद्वारे व्यापक जनजागृती करण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतला असल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, उपाध्यक्ष सुनील कर्जतकर, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक …
Read More »विधानसभेत पटोलेंंच्या सूचनेने फडणवीसांना झाली मदत महाविकास आघाडीलाच आणले अडचणीत
मुंबईः विशेष प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी अनिल अंबानी यांच्या घराजवळ जीलेटीनच्या कांड्यानी भरलेली स्कॉरपीओ गाडी आढळली. त्या गाडीच्या मालकाचा आज मृतदेह मुंब्रा रेती बंदर येथे सकाळी आढळून आल्याने या प्रकरणातील गुढ वाढल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित करत याप्रकरणाचा तपास एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपविण्याची मागणी विधानसभेत केली. …
Read More »ओबीसी- मराठा आरक्षणाप्रश्नी सरकारच्या भूमिकेची फडणवीसांनी केली पोलखोल चर्चा करून पुढील भूमिका ठरविण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन
मुंबईः प्रतिनिधी ओबीसी बहुल पाच जिल्ह्यात झालेल्या निवडणूकाच सर्वोच्च न्यायालयाने रद्द बातल केल्याने ओबीसी आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासाठी आरक्षणाच्या टक्केवारीत वाढ करण्याची भूमिका मांडत आहे तर दुसऱ्याबाजूला ओबीसी आरक्षण प्रकरणात ५० टक्के मध्ये आरक्षण बसविण्याचे शपथ पत्र न्यायालयात सादर केल्याने ओबीसींचे आरक्षण धोक्यात आल्याचा …
Read More »चार दिवसानंतर राठोडांचा राजीनामा राज्यपालांकडे गेला…आणि मंजूर ही वनमंत्री संजय राठोडांचा राज्यपालांकडून राजीनामा मंजूर
मुंबईः प्रतिनिधी बीडच्या पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यां मंजूर केल्याची माहिती राजभवनाकडून कळविण्यात आली. संजय राठोड यांच्यासोबतचे पूजा चव्हाण हिचे अनेक फोटो समाज माध्यमात व्हायरल झाले. तसेच पूजा चव्हाण बरोबरील मोबाईल फोनवरील संभाषण व्हायरल झाले. त्यामुळे चव्हाण हिच्या आत्महत्याप्रकरणी …
Read More »जळगांवच्या त्या प्रकरणात चौकशी अंती तथ्य नसल्याचा निर्वाळा गृहमंत्री अनिल देशमुख यांची विधानसभेत माहिती
मुंबई: प्रतिनिधी पोलिस आणि इतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत महिला वसतीगृहातील तरूणींना कपडे काढून नाचविल्याच्या एका वृत्तामुळे विधिमंडळाच्या सभागृहात भाजपाच्या सदस्यांनी चांगलेच लावून धरले. त्यावर अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सहा महिला उच्च अधिकाऱ्यांची समिती स्थापन करून चौकशीचे आदेश दिले. त्या चौकशी समितीचा अहवाल आज विधिमंडळात मांडताना असा कोणताही प्रकार तेथील वसतीगृहात …
Read More »मंत्रालयातून इमारतींचे भोगवटा प्रमाणपत्रे देण्याचे नवे उद्योग भाजपा नेते आमदार ॲड. आशिष शेलार यांचा आरोप
मुंबई: प्रतिनिधी मुंबई महापालिकेने नाकारल्या नंतर मंत्रालयातून नगर विकास विभागाने भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे नवे उद्योग सुरु केलेत. मुंबई महापालिकेच्या अधिकारावर का गदा आणली जातेय? असा सवाल करीत भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी बांद्रा येथील एक असे प्रकरणच आज सभागृहात उघड केले. विधानसभेत आज पुरवणी मागण्यांवरील चर्चेला सुरुवात करताना भाजपा …
Read More »कोविड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी ३१ मार्चपर्यंत एसओपी लागू उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोविड सेंटरमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत एसओपी (मानक कार्यप्रणाली) तयार करुन लागू करण्यात येईल. ही एसओपी राज्यातील सर्व कोविड सेंटरसाठी बंधनकारक असेल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी विधानसभेत केली. औरंगाबाद शहरातल्या रुग्णालयात डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग झाल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला त्यावेळी उपमुख्यमंत्री …
Read More »नाना पटोलेंना देवेंद्र फडणवीसांचे आव्हान राम मंदिर निधी संकलनावरून काँग्रेस-भाजपामध्ये खडाजंगी
मुंबईः विशेष प्रतिनिधी अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठी काही जणांकडून निधी संकलनाचे काम करण्यात येत आहे. मात्र निधी न दिल्यास धमकाविण्याचे प्रकार सुरु असून सकाळीच कुलकर्णी व्यक्तीने येवून यासंदर्भातील माहिती दिली. त्यामुळे राम मंदिरासाठी निधी गोळा करण्याचा ठेका यांना कोणी दिला असा सवाल काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी करत अशांवर कारवाई …
Read More »
Marathi e-Batmya