मुंबई : प्रतिनिधी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर राज्यातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा घेण्याच्या अनुषंगाने राज्य सरकारने तयारी केली. तसेच कोरोनापासून विद्यार्थ्यांचा बचाव व्हावा यादृष्टीकोनातून या परिक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय सर्व विद्यापीठांनी घेतला. मात्र ऑनलाईनमधील तांत्रिक कारणामुळे अनेकांना परिक्षाच देता आली नसल्याने हवालदिल झालेल्या विद्यार्थ्यांना उच्च …
Read More »आता बिअर बार आणि रेस्टॉरंट सुरु केल्यानंतर हे नियम पाळावे लागणार पर्यटन विभागाकडून नियमावली जारी
मुंबई : प्रतिनिधी Missionbeginagain अंतर्गत अनलॉक-५ नुसार राज्यातील रेस्टॉरंट ५ ऑक्टोंबरपासून सुरु करण्यास राज्य सरकारने नुकतीच परवानगी देत यासंदर्भातील नियमावली जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार रेस्टॉरंट सुरु करण्यासंदर्भातील नियमावली राज्याच्या पर्यटन विभागाकडून आज जारी करण्यात आली. जाहीर करण्यात आलेली नियमावली खालील प्रमाणे.. बिअर बार, फुड कोर्ट, रेस्टॉरंट आदी गोष्टी …
Read More »सुशांतसिंग प्रकरणात महाराष्ट्राला बदनाम करणारा भाजपा उघडा पडला एसआयटी चौकशीची काँग्रेस मागणी
मुंबई : प्रतिनिधी सुशांतसिंग याने आत्महत्या केल्याचा अहवाल एम्समधील डॉ. सुधीर गुप्ता यांच्या पथकाने दिलेला असून मुंबई पोलीसांचे चारित्र्य उजळून निघाले आहे. त्यांनी केलेली चौकशी प्रामाणिक व योग्य दिशेनेच चालली होती. सर्वोच्च न्यायालयानेही मुंबई पोलीसांचा तपास योग्यच होता असे म्हटले होते. त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी करणारा भाजपा उघडा पडला आहे. महाराष्ट्राला …
Read More »मोदी धृतराष्ट्र झाले का? गांधी जयंती दिवशी युपीमध्ये लोकशाहीचे किळसवाणे वस्त्रहरण! काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिवशी उत्तर प्रदेश सरकारने सत्तेच्या धुंदीत लोकशाहीचे चालवलेले किळसवाणे वस्त्रहरण सर्व देश पहात आहे. महाभारतात देखील महिलेवर दुर्योधन, दु:शासन अत्याचार करत असताना धृतराष्ट्रासह सर्वजण हातावर हात धरून गप्प बसले होते. आज हाथरसमध्ये एका दलित परिवारातील मुलीवर बलात्कार करुन तीची हत्या झाली आणि ते …
Read More »पार्थच्या भूमिकेवर शरद पवार म्हणाले, एकाने काय दहाजणांनी जावे स्थगिती उठली पाहिजे ही राज्य सरकार आणि राष्ट्रवादीची भूमिका
पुणे : प्रतिनिधी राज्यातील मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्याविरोधात राज्य सरकारने याचिकाही दाखल केलेली असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी नुकतेच याप्रश्नी स्वतंत्रपणे सर्वोच्च न्यायालयात जाण्याची घोषणा केली. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले याप्रश्नी कोणीही न्यायालयात जावे. एकानेच काय …
Read More »रेमडेसिवीरचा काळाबाजार आणि गरिबांचे मृत्यू थांबवा! देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना सलग दुसऱ्या दिवशी पत्र
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात रेमडेसिवीरची प्रचंड टंचाई निर्माण झाली असून, परिणामी त्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. त्यामुळे गरिब रूग्णांचे अतोनात हाल होत असून, त्यांचे मृत्यू होत आहेत. यात तातडीने हस्तक्षेप करीत गरीब रुग्णांना खाजगी आणि सरकारी रुग्णालयात हे औषध मोफत उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते …
Read More »कृषी कायद्याविरोधात काँग्रेसचे राज्यात जनआंदोलन दोन कोटी सह्यांचे निवेदन पक्षाध्यक्ष सोनिया गांधींच्या मार्फत राष्ट्रपतींना सादर करणार
नाशिक- मुंबई: प्रतिनिधी केंद्र सरकारने आणलेले शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जयंतीचे निमित्त साधून काँग्रेसने राज्यभरात ‘किसान मजदूर बचाओ दिन’ पाळला व आंदोलन केले. हे कायदे आणून शेतकरी व कामगारांना उद्योगपतींचे …
Read More »अर्धवट खुशखबर: एस.टी कर्मचाऱ्यांना एका महिन्याचा पगार आठवड्यात मिळणार उरलेल्या पगारीबाबत चर्चा करून निर्णय- परिवहन मंत्री परब यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्याने लॉकडाऊन लागू करण्यात आला. या काळात एसटीची सेवा फक्त अत्यावश्यक सेवेसाठी फक्त वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आधीच तोट्यात असलेले एसटी महामंडळ आणखी आर्थिक चक्रात अडकले. यापार्श्वभूमीवर मागील चार महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही. अखेर यातील एका महिन्याचे वेतन या कर्मचाऱ्यांना …
Read More »सर्वाधिक संसर्ग दर सप्टेंबर महिन्यात, ४ टक्क्यांनी वाढ : देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र ६ महिने गेले, आता तरी चाचण्या वाढवा!
मुंबई : प्रतिनिधी कोरोना प्रादुर्भाव झाल्यापासून राज्यात आतापर्यंतचा सर्वाधिक संसर्गाचा मासिक दर सप्टेंबर महिन्यात आढळून आला असून त्यात जवळजवळ ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. असे असले तरी हव्या त्या प्रमाणात चाचण्यांच्या संख्येत वाढ केली जात नाही. आता अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्याचे आव्हान असताना आणि पाच महिन्यांचा कालखंड चाचण्या न वाढविण्यात निघून …
Read More »अल्पसंख्याक समाजातील महिलांसाठी स्वयंसहाय्यता बचतगट योजना – नवाब मलिक ४ हजार बचतगटांद्वारे महिलांचे होणार सक्षमीकरण;३३.९० कोटी रुपये खर्च अपेक्षित, कर्जासाठी प्रतिवर्ष ५ कोटी रुपये
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अल्पसंख्याक बहुल क्षेत्रातील अल्पसंख्याक समाजातील महिलांसाठी पुढील ५ वर्षाकरीता स्वयंसहाय्यता बचतगट योजना राबविण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. दरम्यान या योजनेसाठी अंदाजे ३३.९० कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे. महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत (माविम) ही योजना राबविण्यात येईल. या योजनेसंदर्भातील शासन …
Read More »
Marathi e-Batmya