राजकारण

कोरोना इफेक्ट आता ऊर्जा विभागाच्या शासकीय कंपन्यांवर…पैसाच नाही २० हजार कोटींच्या कर्ज उभारणीस शासन हमी: मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई: प्रतिनिधी कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्व उद्योग आणि वाणिज्यिक उपक्रम बंद आहेत. सर्वसामान्य जनता देखील घरी असल्यामुळे घरगुती वीज ग्राहकांकडून विजेचा जास्त वापर होऊन औद्योगिक ग्राहकांची विजेची मागणी कमी झाली आहे. महाराष्ट्रातील विजेची सरासरी रोजची मागणी २३ हजार मेगावॅटवरुन १६ हजार मेगावॅट इतकी कमी झाली आहे. …

Read More »

निसर्गग्रस्त फळबाग-भात शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र पॅकेजची आवश्यकता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे आश्वासन

श्रीवर्धन: प्रतिनिधी मागील दोन-तीन महिन्यापासून राज्यावर कोरोनाचे संकट आलेले आहे. या संकटाचा सामना संपूर्ण राज्य करत असतानाच आता निसर्ग चक्रीवादळाने कोकणावर धावा केला. वादळामुळे येथील फळबागा, भात शेती, घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांसाठी पुढील ८ ते १० वर्षाचा अंदाज बघून केंद्र आणि राज्य …

Read More »

अरविंद बन्सोड हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

पुणे: प्रतिनिधी अरविंद बनसोड याची हत्या झाली असून पोलिसांमार्फत ही आत्महत्या असल्याचे जाणीवपूर्वक पसरवले जात आहे. त्यामुळे हे प्रकरण केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) कडे देण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. नागपूर, थंडीपवनी येथे अरविंद बनसोड याची हत्या करण्यात आली होती. २७ मे रोजी …

Read More »

सरकारला सर्कस बोलणार्‍या राजनाथसिंह यांचे ‘अनुभवाचे बोल’ राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांचे प्रतित्तुर

मुंबई: प्रतिनिधी लोकशाही मार्गाने चालणार्‍या सरकारला सर्कस बोलणार्‍या राजनाथसिंह यांचे ‘अनुभवाचे बोल’ असल्याचे प्रतित्तुर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना दिले. केंद्रीय मंत्री राजनाथसिंह यांनी रिंगमास्टरच्या चाबूकने महाविकास आघाडी सरकार चालवले जात असल्याचे वक्तव्य केले होते. महाराष्ट्रामध्ये लोकशाही मार्गाने सरकारचे …

Read More »

केंद्रीय मंत्री आठवलेंनी लाईक केले या मोदी विरोधी ट्विटला ऊर्जा मंत्री राऊत यांचे ट्विट

मुंबई: प्रतिनिधी राज्य असो किंवा केंद्र असो बदलत्या राजकारणाचे वारे ओळखणारे राजकारणी जे काही आहेत. त्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे फार वरचे स्थान आहे. या बदलत्या राजकारणाचा अंदाज घेवून राजकिय आघाड्या करण्यातही त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरीत मजुरांचा प्रश्न, कोरोनाची वाढती संख्या आणि आर्थिक …

Read More »

महिला, मधुमेह, हार्टचे पेशंट, श्वसन विकारग्रस्तांना शासकिय कार्यालयात बोलावू नका सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व प्रशासनाला आदेश

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्याच्या कारभाराचा गाडा हाकणाऱ्या शासकिय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होवू नये यासाठी मधुमेह, हार्टचे पेशंट आणि श्वसनाचे विकार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ऑफिस मध्ये बोलाविण्याऐवजी त्यांना घरूनच काम करण्याचे आदेश द्यावेत अशी सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या प्रशासनाला दिली. याबरोबरच महिला या कुटुंबातील प्रमुख असतात त्यामुळे या महिलांनाही कार्यालयात …

Read More »

शरद पवार दोन दिवस कोकणच्या दौऱ्यावर जिल्ह्यातील 'निसर्गा' चा तडाखा बसलेल्या गावांची करणार पाहणी

मुंबई: प्रतिनिधी ‘निसर्ग’ चक्रीवादळाने कोकणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून या नुकसानीच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार हे दोन दिवस कोकण दौरा करणार आहेत. ९ जून रोजी रायगड आणि १० जूनला रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन संपूर्ण माहिती जाणून घेणार आहेत. ९ जून …

Read More »

चक्रीवादळ बाधितांना मोफत केरोसीनचे वाटप करणार अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

मुंबई :प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील निसर्ग चक्रीवादळामुळे या भागातील वीज खंडीत झाल्याने बाधीत कुटुंबियांना केरोसीन राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून मोफत केरोसीनचे वाटप करण्यात येणार आहे. राज्यातील अन्य नुकसानग्रस्त जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांची मागणी असल्यास त्या जिल्ह्यांनाही केरोसीन पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती अन्न नागरी व …

Read More »

६ वेळा मरून जिवंत झालेल्या दाऊदबाबत केंद्राने काय ते एकदाचं सांगावे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या दोन दिवसांपासून भारतीय प्रसार माध्यमातून येत आहेत. भारत सरकारने यावर मौन बाळगले आहे. त्यामुळे संशयाचे वातावरण तयार झाले आहे. दाऊदचा खरेच मृत्यू झाला की तो जिवंत आहे हे केंद्र सरकारने एकदाचे ठरवून देशाच्या जनतेला सांगावे, अशी मागणी काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस …

Read More »

राज्य सरकारची परिस्थिती ‘केवळ पॉलिसी’ नाही, तर ‘अ‍ॅक्शन पॅरालिसिस’ची चक्रीवादळग्रस्तांना १०० कोटींची मदत तुटपुंजी: देवेंद्र फडणवीस

मुंबई: प्रतिनिधी आपण ज्या घोषणा करतो, त्याप्रमाणे ते करतो का, याचा राज्य सरकारकडून विचार होणे आवश्यक आहे. ८० टक्के खाटा अधिग्रहित करण्यात येणार असल्याचे केवळ सांगण्यात आले, पण रूग्णांना खाटा मिळत नाही, ही वास्तविकता आहे. राज्य सरकारची ‘पुनश्च हरिओम’ ही संकल्पना चांगली आणि ती आवश्यकच आहे. सुरूवातीला काही अडचणी येतील. …

Read More »