मुंबईः प्रतिनिधी इतिहासात नादिरशहाने दिल्ली जाळल्याची नोंद आहे. त्यामुळे आता नादिरशहानंतर अमित शाह यांचे नाव दिल्ली जळीत प्रकरणामध्ये निश्चितपणे नोंदले जाईल अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. दिल्ली जळत असताना पोलिसांनी हिंसा करणाऱ्यांवर कारवाई केली नाही. पोलिस ‘मूक दर्शक’ बनून राहिले. …
Read More »मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, पंतप्रधान मोदींची योजना आल्यावर जाहीर करू शेतकऱ्यांना हमीभाव मिळणे अजूनही दूरच
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार महाविकास आघाडीकडून कर्जमाफी देणे सुरु करण्यात आले. मात्र शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याबाबत पंतप्रधान मोदींची हमीभाव योजना येणार असून त्याची वाट आम्ही बघत असल्याची खोचक टीका मोदी यांच्यावर करत ही योजना आल्यानंतर त्याचा अभ्यास करून महाविकास आघाडीची हमीभाव योजना …
Read More »कायम विना अनुदानित शाळांची तपासणी वित्त,शिक्षण विभाग करणार मंत्री वर्षा गायकवाडांना उपमुख्यमंत्र्यांची मदत
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील कायम विना अनुदानित शाळांना पुन्हा अनुदान देण्याचा निर्णय २०१६ साली घेण्यात आला. मात्र अनुदान देताना या शाळांची तपासणी करण्यात आली नाही. त्यामुळे यां शाळांची शालेय शिक्षण विभागाबरोबरच वित्त विभागाकडून तपासणी करण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली. …
Read More »मंत्री आणि विरोधी पक्षनेते तुम्ही दुसरा अध्यक्ष नेमलाय का? विधासभा अध्यक्ष नाना पटोलेंची भर सभागृहातच विचारणा
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील कायम विनाअनुदानित शाळांना पुन्हा अनुदान देण्याच्या प्रश्नावरील चर्चेच्यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात प्रश्नोत्तरे सुरु झाली. त्यामुळे अखेर सभागृहात अध्यक्ष नाना पटोले यांनी मंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांन तुम्ही दोघांनीच दुसरा अध्यक्ष नेमलाय का? अशी मिश्किल विचारणा करत …
Read More »फडणवीसांकडून पंतप्रधान मोदींच्या जात प्रवर्गाचा उल्लेख ओबीसीच्या स्वतंत्र जणगणनेच्या चर्चेवेळी विधानसभेत आणले उघडकीस
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात अथवा देशाच्या घटनात्मक पदावर काम करणारे राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या जातीचा उल्लेख न करण्याची परंपरा आहे. तसेच संसदेत आणि राज्याच्या विधिमंडळातही महत्वाच्या घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तींच्या जातीचा उल्लेख न करण्याचे नियम आहेत. मात्र भाजपा नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी …
Read More »मुस्लिम आरक्षणामुळे मराठा, ओबीसी आरक्षणावर परिणाम होणार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील मुस्लिम समुदायाला पुन्हा आरक्षण देण्याचा निर्णय अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी जाहीर करताच भाजपा नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या आरक्षणामुळे मराठा आणि ओबीसी आरक्षणावर परिणाम होईल असा इशारा दिला. विधान परिषदेत मलिक यांनी घोषणा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलत होते. …
Read More »फडणवीसांनी रद्द केलेले मुस्लिम आरक्षण महाविकास आघाडी देणार विधान परिषदेत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची घोषणा
मुंबईः विशेष प्रतिनिधी भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने रद्दबातल ठरविलेले मुस्लिम समाजाचे आरक्षण विद्यमान महाविकास आघाडी पुन्हा बहाल करणार आहे. पूर्वीच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने मुस्लिम समाजाला सच्चर समितीच्या शिफारसीनुसार ५ टक्के आरक्षण दिले होते. मात्र त्यास भाजपा सरकारने ब्रेक लावला. परंतु विद्यमान महाविकास आघाडीकडून मुस्लिम समाजाला …
Read More »ओबीसी स्वतंत्र जनगणनेच्या मागणीसाठी सर्वपक्षिय शिष्टमंडळ दिल्लीला विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, भाजपाची संयुक्त मागणी
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील ओबीसी समाजाची लोकसंख्येची नेमकी आकडेवारी नसल्याने त्यांना आरक्षणाचा, आर्थिक सवलतीचे फायदे देता येत नाही. त्यामुळे ओबीसी समाजाची जातनिहाय स्वतंत्ररित्या जणगणना करण्यात यावी अशी मागणी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपाने संयुक्तरित्या मागणी केली. तसेच २०२१मध्ये होणाऱ्या जणगणनेत ओबीसींची जातनिहाय संख्याही गोळा करावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना …
Read More »सीएए आमच्या अखत्यारीत नसताना आम्ही का राबवावा ? राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांचा सवाल
मुंबईः प्रतिनिधी सीएए अंमलबजावणी राज्य सरकारच्या अखत्यारीत नाही. सर्व अधिकार केंद्राकडे आहे. आमच्या अखत्यारित नसताना का राबवावा असा सवाल करतानाच एनआरसी लागू होवू देणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी जाहीर केले. एनआरसी आणणार नाही असे सांगून आपली भूमिका भाजपने बदलली. मात्र याबाबत सरकारने …
Read More »शिवछत्रपतींच्या स्वराज्याची मराठी केविलवाणी नाहीच “इये मराठीचिये नगरी” कार्यक्रमातून विधानमंडळात “मराठीचा गजर”
मुंबई: प्रतिनिधी मराठ्यांच्या घोड्यांच्या टापाचा आवाज ऐकला तरी दुष्मनांची पळापळ व्हायची, या टापांचा आवाज खणखणीत तर मग मराठीचा आवाज केविलवाणा कसा? असा सवाल उपस्थित करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगत मराठी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिजाऊंची भाषा आहे, स्वराज्याची भाषा आहे ती टिकणारच असा विश्वास व्यक्त केला. राजभाषा मराठी गौरव दिनानिमित्ताने …
Read More »
Marathi e-Batmya