राजकारण

मुख्यमंत्री, महसूलमंत्री: साहेबराव गायकवाड यांच्या दुर्दैवी मृत्यूची सीआयडी चौकशी करा महाराष्ट्र भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड ह्यांच्या अकस्मिक मृत्यूची सी. आय. डी. मार्फत चौकशी झाली पाहिजे त्याचप्रमाणे कै. गायकवाड यांची अवघ्या पाच महिन्यांच्या आत बदली करण्याचा आदेश कोणाच्या सहीने निघाला, ती माहिती जनतेसमोर आली पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी शुक्रवारी केली. …

Read More »

त्या घटनेने पवारांना दु:ख, म्हणाले भरारी पथक नेमा केंद्र व राज्याने एकत्रित येवून हा प्रश्न सोडवावा

मुंबई: प्रतिनिधी औरंगाबादजवळील करमाड रेल्वे दुर्घटनेत मजुरांच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी अतिशय व्यथित करणारी होतीच शिवाय कोरोना महामारीच्या काळातील या अपघाताने मनाला यातना झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना स्पष्ट केले आहे. दरम्यान पायी चालत आपल्या मूळ गावी स्थलांतर करू इच्छिणाऱ्या लोकांचे बिकट प्रश्न ऐरणीवर …

Read More »

खुषखबर : फक्त शेवटच्या सत्राची परिक्षा होणार : नवे वर्ष १ सप्टेंबरपासून अंतिम वर्षाच्या, अंतिम सत्राच्या महाविद्यालयीन परीक्षा जुलैमध्ये होणार - उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात सध्या लॉकडाऊन कालावधी सुरू आहे. त्या अनुषंगाने युजीसीने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठांच्या परीक्षेसंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नेमलेल्या समितीचा अहवाल शासनाला सादर केला. त्यानुसार सर्व पदवी व पदव्युत्तर कोर्सच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा या १ जुलै ते ३० जुलै …

Read More »

गावांमध्ये ४५ हजार स्वच्छताग्रहींची नियुक्ती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोविडग्रस्त जिल्ह्यांमध्ये स्वच्छाग्रहींची नियुक्ती करण्यात आली असून आधीच नियुक्त झालेल्या स्वच्छागृहींना मुदतवाढ देण्यात आलेली आहे. राज्यातील २७ हजार ७८६ ग्रामपंचायतीमध्ये ४० हजार ५०१ गावांमध्ये ४५ हजार स्वच्छाग्रही लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याचे काम करीत आहेत. या स्वच्छाग्रहींच्या सुरक्षा साधन खरेदीसाठी प्रत्येक जिल्ह्यास १० लाख रूपयांचा निधी प्रदान …

Read More »

कामगारांसाठी जास्तीच्या रेल्वे सोडणार मात्र जीवावर उदार नका होवू मुख्यमंत्री सहायता निधीतून त्या मृत मजुरांच्या कुटुंबियांना ५ लाख- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई: प्रतिनिधी औरंगाबाद जवळील करमाड येथे सटाणा शिवारात मालवाहू रेल्वेखाली येऊन परराज्यातील १६ मजुरांच्या झालेल्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दू:ख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच जखमींवर सरकारी खर्चाने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देश देत परराज्यातील मजूर आणि कामगारांसाठी …

Read More »

वीजबिल भरायचाय? मग या डिजीटल प्लॅटफॉर्मचा वापर करा १० हजारपेक्षा जास्त असेल ‘आरटीजीएस व एनईएफटी’ची सुविधा अन्यथा इतरचा वापर करा

मुंबई: प्रतिनिधी घरगुती ग्राहक व को-ऑपरेटीव्ह हाऊसींग सोसायट्यांसह ग्राहकांना १० हजारांपेक्षा अधिक वीजबिल भरण्यासाठी महावितरणकडून ऑनलाईनसोबतच आता ‘आरटीजीएस  व एनईएफटी’ ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महावितरणच्या ग्राहकांना वीजबिलांची रक्कम भरण्यासाठी ऑनलाईनची सोय असली तरी प्रामुख्याने धनादेशाद्वारे भरण्यात येते. मात्र कोरोनामुळे सध्या लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे बँकींग व्यवहारांवर परिणाम …

Read More »

गल्लाभरू डॉक्टरांपासून स्थलांतरीत कामगारांची सुटका प्रवासासाठी आवश्यक वैद्यकीय तपासणी मोफत करण्याची राज्य सरकारची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी राज्यात अडकलेल्या स्थलांतरीत कामगारांना प्रवासासाठी आवश्यक असलेले वैद्यकीय प्रमाणपत्र कोणत्याही नोंदणीकृत डॉक्टरांकडून घेण्याची अट राज्य सरकारने घेतली. मात्र या निर्णयाचा गैरफायदा काही गल्लाभरू डॉक्टरांनी घेण्यास सुरुवात करत अव्वाच्या सव्वा रक्कम आकरण्यास सुरुवात केल्याने या कामगारांना आणखीनच अडचणीचा सामना करावा लागला. त्यामुळे अखेर लॉकडाऊनच्या काळात आपल्या गावी जावू …

Read More »

कोरोनाविरोधी लढ्यासाठी मुख्यमंत्री ठाकरेंनी घडवून आणली सर्वपक्षिय एकजूट विविध पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या सूचनांची तत्काळ दखल

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचे संकट घालविण्यासाठी विरोधी पक्ष नेते तसेच इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या सूचनांची गांभीर्याने दखल घेतली जाईल. सर्वांच्या एकजुटीतून आपण हे संकट दूर करूत असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. लॉकडाऊनची चांगली अंमलबजावणी केल्याने एप्रिल महिन्यात आपण कोरोनाचा प्रसार रोखला होता ,आता मे अखेरपर्यंत आपणास ही …

Read More »

गृहमंत्री देशमुख, रेल्वे तिकिटांची विक्री नसताना मजूरांकडून पैसे कोण घेतय? जनतेची शंका दूर करण्याची भाजपा प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी एक व्हिडिओ जारी करून केंद्र सरकारवर टीका केली व रेल्वेने कामगारांकडून तिकिटाचे पैसे घेऊ नयेत अशी मागणी केली. या संदर्भात माधव भांडारी म्हणाले की, अनिल देशमुख जनतेची दिशाभूल करत आहेत. लॉकडाऊनमुळे रेल्वेगाड्यांची प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक …

Read More »

आणखी दोन स्थानिक स्वराज्य संस्थांकडून मुंबईवरून येणाऱ्यांवर बंदी अंबरनाथ, बदलापूर नगरपालिकांनी काढले आदेश

मुंबई: प्रतिनिधी ज्या मुंबई शहरात मिळणाऱ्या रोजगाराच्या जीवावर मुंबईच्या आजूबाजूला शहरे वसली आता त्याच लहान-मोठ्या शहरांकडून उपनगरातून मुंबईमध्ये कामाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बंदी घालण्याचे सत्र सुरु केले. काल कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महानगरपालिकांनी अशा आशयाचे पत्रक काढल्यानंतर आता अंबरनाथ, बदलापूर नगरपालिकांनी असे पत्रक काढत ८ मे पासून परतणाऱ्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. …

Read More »