निबंधक, भागीदारी संस्था यांच्या उन्नत केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून भागीदारी संस्था व नागरिकांना अधिक वेगवान, पारदर्शक आणि सुलभ सेवा उपलब्ध होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते निबंधक, भागीदारी संस्था महाराष्ट्र राज्य, मुंबई कार्यालयाच्या 2.0 या उन्नत संकेतस्थळाचा शुभारंभ करण्यात आला. निबंधक भागीदारी संस्थेचे नवे अत्याधुनिक 2.0 …
Read More »शहापूर तालुक्यातील उबाठा, शरद पवार गट व काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत
शहापूर तालुक्यातील उबाठा सेना, शरद पवार गट तसेच काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी सोमवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. शहापूर तालुका उबाठा सेनेच्या आदिवासी आघाडीचे अध्यक्ष व शिरोळचे सरपंच संतोष आरे यांच्या नेतृत्वाखाली ‘उबाठा’ च्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री …
Read More »आमदार अमित साटम यांची मुंबई भाजपा अध्यक्षपदी नियुक्ती पक्ष नेतृत्वाने विश्वास दाखवल्याबद्दल आणि संधी दिल्याबद्दल मानले आभार
बीएमसी निवडणुकीपूर्वी अंधेरी (पश्चिम) येथील भाजपा आमदार अमित साटम यांची मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईसाठी पक्षाचे व्हिजन पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे आमदार अमित साटम यांनी सांगितले. आमदार अमित साटम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा जी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, …
Read More »स्मार्ट सिटीचे काय ? पण मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुन्हा स्मार्ट गावांची घोषणा राज्याच्या प्रत्येक तालुक्यातील १० गावे ‘स्मार्ट’ व ‘इंटेलिजेंट’ करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यात आणि देशात २०१४ साली भाजपाचे सरकार स्थानापन्न झाले. त्यावेळी मोठा वाजत गाजत जवळपास राज्यातील सर्वच जिल्ह्यांतील शहरांमध्ये स्मार्ट सिटी योजनेची घोषणा करण्यात आली. तसेच स्मार्ट शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर फंडही जाहिर करण्यात आला. परंतु तेव्हापासून राज्यातील स्मार्ट सिटीचे काय झाले याचा पत्ता शासनस्तराशिवाय आतापर्यंत कोणालाच माहित झाला नाही. तसेच …
Read More »सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी रामकृष्ण हरिवाली, मटण खालेलं माझ्या पांडुरंगाला चालत… मी माळ कधी घालत नाही, पण मटण सोडून दिलं तर माळ घालीण
मी रामकृष्ण हरीवाली, पण माळ घालत नाही कारण कधी कधी मटण खाते. खरं बोलते बाई मी काही त्यांच्यासारखं खोटं बोलत नाही. मी मटण खाल्ल तर माझ्या पांडुंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? खरं आहे की नाही ?, आमचे आई-वडील खातात, नवरा खातो, सासू-सासरे खातात आणि आम्ही आमच्या पैशाने खातो बाबा, …
Read More »आशिष शेलार यांच्या उपस्थितीत महागणेशोत्सव राज्य उत्सवानिमित्त गीत आणि पोर्टलचे लोकार्पण महागणेशोत्सवात सर्व नागरिकांनी सहभाग नोंदवावा
सार्वजनिक गणेशोत्सव, घरगुती गणेशोत्सव, या महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला आता राज्याने प्रथमच महाराष्ट्र राज्याचा राज्य महोत्सव म्हणून घोषित केला आहे. त्यानिमित्ताने सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत असणाऱ्या विभागांनी विविध उपक्रम, कार्यक्रम, उत्सव तसेच स्पर्धेचे आयोजन केले आहे. याचाच भाग म्हणून राज्यातील प्रत्येक नागरिकास घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे दर्शन मिळावे, यासाठी ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टलची निर्मिती …
Read More »मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महिला सक्षमीकरणाद्वारे राज्य विकासपथावर अग्रेसर महाराष्ट्रातून पाठविण्यात आलेल्या राख्यांच्या रक्षाबंधनाचा कार्यक्रम
राज्यभर रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला असून मुख्यमंत्री म्हणून मला आतापर्यंत ३६ लाखांहून अधिक भगिनींनी राख्या पाठविल्या आहेत. यामध्ये बहिणींचे निस्सीम प्रेम आणि आशीर्वाद आहेत. महिलांना सक्षम बनविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनामार्फत विविध योजना राबविल्या जात असून महिला सक्षमीकरणाद्वारे राज्य विकासपथावर अग्रेसर राहिल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त …
Read More »परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन, अपघाती मृत्यू रोखण्यावर भर द्यावा पदोन्नत अधिकाऱ्यांचा पद अलंकरण सोहळा
विभागाच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच ३३१ सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांना मोटार वाहन निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नतीने अधिकारांबरोबरच जबाबदारीमध्ये वाढ झाली आहे. पदोन्नत अधिकाऱ्यांनी राज्यात रस्ता सुरक्षा वाढवून अपघाती मृत्यू रोखण्यावर भर देण्याचे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. मोटार वाहन निरीक्षकपदी पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांच्या गणवेशावर नव्या पदाचे …
Read More »उद्धव ठाकरे यांचा मोदी वर हल्लाबोल, गरम सिंदूरचं आता काय कोल्ड्रिक्सं झालं काय? भारत-पाक क्रिकेट सामन्यावरून उद्धव ठाकरे यांची टीका
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानस्थित दहशतवादी तळावर हल्ले करून उद्धवस्त केले. तत्पूर्वी बिहारमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करण्यासाठी गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेरे शरीर मे खून नही तो गरम सिंदूर बह रहा है असे वक्तव्य करत उपस्थित समुदायाला भावविवश केले. त्यास तीन चार महिनेच उलटून …
Read More »बेरोजगार प्रश्नी छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचा रोजगार सत्याग्रह २५ ऑगस्टला रोजगार यात्रा आणि तिरंगा यात्रा
राज्य सरकारच्या विविध विभागात तब्बल २.५ लाख रिक्त पदे असूनही नोकर भरती केली जात नाही. लाखो तरुणांच्या भविष्याशी सरकार खेळ खेळत आहे. रिक्त जागा असतानाही सरकार मात्र कंत्राटीपद्धतीने भरती करत आहे. काँग्रेस पक्ष या बेरोजगारी विरोधात आवाज उठवत असून छत्रपती संभाजीनगर येथे सोमवारी २५ ऑगस्ट रोजी “रोजगार सत्याग्रह व तिरंगा …
Read More »
Marathi e-Batmya