राजकारण

देशात ७ तर महाराष्ट्रात ४ टप्प्यात लोकसभा निवडणूकीसाठी मतदान २३ मे ला मतमोजणी होणार असल्याची निवडणूक आयोगाची घोषणा

नवी दिल्ली : प्रतिनिधी विद्यमान लोकसभेचा कार्यकाल जून महिन्यात संपणार असल्याने तत्पूर्वी नवी लोकसभा अस्तित्वात येण्यासाठी लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता आज रविवारपासून लागू झाल्याचे जाहीर करत देशात एकूण ७ टप्प्यात तर महाराष्ट्रात ४ टप्प्यात निवडणूका घेण्यात येणार असल्याची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी केली. तसेच यंदाच्या निवडणूकीत व्हीव्हीपँट मशिन्स …

Read More »

भ्रष्टाचारप्रकरणी महिला व बालविकास मंत्र्यांची हकालपट्टी करा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी महिला व बालविकास विभागातर्फे घरपोच आहाराचे सुमारे ६ हजार ३०० कोटी रूपयांचे कंत्राट सर्वोच्च न्यायालयाने रद्द करून सरकारचे तोंड काळे केले आहे. याच निर्णयाद्वारे बालकांना शिजवलेले गरम अन्न देण्याऐवजी प्रिमिक्स पाकिटे देण्याचे कंत्राट सरकारने याच माफियांना दिले होते. ते ही सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. या संपूर्ण प्रकरणात प्रचंड …

Read More »

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष साजरे करणार सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी ज्येष्ठ साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष ऑगस्ट २०१९ पासून सुरु होणार आहे. या शताब्दी वर्षामध्ये विविध सामाजिक कार्यक्रम व उपक्रम आयोजन करण्याबाबत अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी समिती स्थापन करणार असल्याची घोषणा सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी केली. *साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या …

Read More »

शिवसेनेच्या आश्वासनाची सरकारकडून पूर्तता ५०० चौ.फु.पर्यंतच्या निवासी सदनिकांच्या मालमत्ता करात माफी

मुंबई :प्रतिनिधी  बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या कालावधीत पालिकेच्या हद्दीतील निवासी इमारतींमधील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांचा मालमत्ता कर माफ करण्याचे जाहीर आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता राज्य सरकारकडून शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करत आगामी लोकसभा निवडणूकीच्यादृष्टीने नागरीकांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. मालमत्ता कर संपूर्णत: माफ करण्यासाठी संबंधित अधिनियमामध्ये सुधारणा …

Read More »

अनुसूचित जाती-नवबौध्दांसाठी आता निवासी शाळा योजना १६५ निवासी-अनिवासी आश्रमशाळा सुरु करणार असल्याची मंत्री बडोले यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील १६५ निवासी-अनिवासी आश्रमशाळांसाठी शाहु-फुले-आंबेडकर अनुसूचित जाती-नवबौद्ध निवासी शाळा ही नवीन योजना सुरू करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून मंजूर रकमेच्या २० टक्के अनुदान दिले जाणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. स्वयंसेवी संस्थांमार्फत अनुसूचित जातीच्या मुला-मुलींसाठी …

Read More »

कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार वेतन हमी, भत्ते, आरोग्य सेवा, पीएफ कंत्राटदारांमार्फत वेतन अदा करण्याचे कामगारमंत्र्यांचे निर्देश

मुंबई: प्रतिनिधी ज्या शासकीय विभागात आणि कार्यालयात कंत्राटदारांमार्फत कंत्राटी कर्मचारी घेण्यात आले आहेत अशा सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या कामाच्या दिवसांनुसार महिन्याकाठी कंत्राटदाराने संबंधित कर्मचाऱ्याचे करारानुसार वेतन व भत्ते, मूळ वेतन, विशेष/ महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, इतर भत्ते, भविष्य निर्वाह निधी (P.F.), राज्य कामगार विमा योजना (E.S.I.S)/कर्मचारी नुकसान भरपाई (W.C.), …

Read More »

हुकुमशाही सरकारविरोधात काँग्रेस सेवादलाची तिंरगा पदयात्रा ९ मार्च रोजी रोजी निघणार

मुंबईः प्रतिनिधी केंद्रातील व राज्यातील भाजप सरकार हुकुमशाही पद्धतीने कारभार करत आहे. संविधानिक संस्थांची गळचेपी सुरु असून देशाचे संविधान आणि लोकशाही धोक्यात आली आहे. संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी शनिवारी ९ मार्च रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष विलास औताडे यांच्या नेतृत्वाखाली टिळक भवन दादर येथून तिरंगा पदयात्रा काढण्यात येणार आहे. …

Read More »

मोदींच्या कृपेने देशाची अर्थव्यवस्था संकटात राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी मोदीसाहेबांच्या कृपेने देशाची अर्थव्यवस्था संकटात आली आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केला. देशावर ८४ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर मोदी सरकारने उभा केला आहे. आणि देशातील सव्वाशे कोटी जनतेच्या डोक्यावर ६५ हजाराचे कर्ज करुन ठेवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. नोटाबंदी, जीएसटी चुकीच्या अंमलबजावणीमुळे …

Read More »

उद्योग विभागाचे सचिव सतीश गवई यांना ७ कोटींची लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्याची नवाब मलिक यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या दौऱ्याला ९० लाख खर्च होतात आणि ५ अधिकारी दौऱ्यावर जातात त्यावेळी ७ कोटी ६३ लाख रुपये खर्च होतात आणि हा खर्च एमआयडीसीच्या खात्यातून खर्च केला गेला. एकप्रकारे बिल्डरांच्या घशात जागा घालण्यासाठी हे सगळे केले जात असून राज्याच्या उद्योग विभागाचे अतिरिक्त सचिव सतीश गवई यांना ७ कोटीची …

Read More »

माथाडी कामगारांची कर्जवसूलीच्या नावाखाली होणारी लूट थांबणार परस्पर होणाऱ्या पगार कपातीला कामगार विभागाकडून फुलस्टॉप

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील माथाडी कामगारांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेत त्यांच्या पगारीतून वारेमाप पध्दतीने कर्जवसूली करणाऱ्या पतसंस्था, पतपेढ्या, खाजगी बँकांच्या वसुलीला आता कामगार मंडळाने चाप लावण्याचा निर्णय घेतला. तसेच या अनुषंगाने कामगार विभागाने नुकताच शासन निर्णयही प्रसिध्द केला. राज्याच्या विविध भागात जवळपास २ लाख ५ हजार माथाडी कामगारांची नोंद आहे. त्यापैकी १ …

Read More »