देशातील इतर भाजपा शासित राज्यात वापरण्यात आलेल्या मुद्यांची कॉपी करत महाराष्ट्रातही धार्मिक आणि सामाजिक वातावरण तापविण्याचा प्रयत्न भाजपाकडून मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यातच मंत्री नितेश राणे यांनी झटका आणि हलाल मटणाच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. मंत्री नितेश राणे यांच्या भूमिकेचा अनेकांनी विरोध …
Read More »आता हॅलो नाही तर जय शिवराय बोला, राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे यांचा सल्ला पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना दिला सल्ला
मागील काही दिवसांपासून राज्यात आणि देशात औरंगजेब, शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि मुघल शासक यांच्या विषयीच्या चर्चांना ऊत आला आहे. त्यातच या मुद्यावरून सत्ताधारी भाजपाकडून वारंवार अशा चर्चांना पुरूस्कृतही केले जात आहे. यातच आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी केली. त्यामुळे या चर्चेत आणखीनच …
Read More »जलयुक्त शिवारसाठी राज्य शासन आणि ए.टी.ई.चंद्रा फौंडेशन यांच्यात सामंजस्य करार गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेतंर्गत सामाजिक संस्थांचा सहभाग
राज्यात ‘जलयुक्त शिवार योजना-2’ अंतर्गत ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून धरणांमधील पाणीसाठा वाढण्यासोबतच शेतीची सुपिकता वाढण्यासही मोठ्या प्रमाणावर मदत होत आहे. या योजनेतील सहभाग आणि प्रभावी अंमलबजावणीबाबत ए.टी.ई.चंद्रा फौंडेशन आणि मृद आणि जलसंधारण विभाग यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. गाळमुक्त धरण, गाळयुक्त …
Read More »भाजपाकडून विधान परिषदेसाठी ३ जणांची नावे जाहिरः अर्जाचा शेवटचा दिवस सोमवार शिंदे शिवसेनेने कडून आणि अजित पवार यांच्या महाराष्ट्रवादीकडून अद्याप उमेदवारांची चाचपणी
विधान परिषदेतील पाच सदस्य विधानसभा निवडणूकीत विजयी झाल्याने रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला. या पाच जागांसाठी भाजपाचे तीन आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या हिश्शाला प्रत्येकी एक उमेदवार असे मिळून पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. यासाठी २७ मार्चला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाकडून तीन …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, महायुती सरकार म्हणजे ‘गँग्ज ऑफ …’ सारखे टोळ्यांचे सरकार औरंगजेबाची कबर ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतिक, महाराजांचे शौर्य पुसून टाकण्याचा भाजपाचा डाव
राज्यातील भाजपा युती सरकारने आश्वासन देऊनही शेतमालाला भाव दिला नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. लाडक्या बहिणीच्या मतांवर सत्तेत आले पण सत्तेत आल्यानंतर १० लाख बहिणींना लाभापासून वंचित ठेवले आहे. आश्वासन हर्देषऊन न पाळणे हे सरकारचे अपयश आहे. भाजपा युती सरकार मस्तीत चालले असून मंत्र्यांमध्ये बेबनाव आहेत, सत्तापिपासू वृत्तीची माणसे सत्तेत …
Read More »अजित पवार, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री? आणि नाना पटोले यांची ऑफर भाजपाने नाना पटोले यांनाच दिली मंत्री पदाची ऑफर
मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदाची खुर्च्यांची आदलाबदल होताच, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सवतासुभा सुरु झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संबध तर चांगलेच ताणले गेल्याची चर्चा सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका,… फडणवीसांच्या मंत्रिमंडळात एक एक मंत्री एक एक नमुना सभ्यता, संस्कृती व लोकशाहीची मुल्ये जोपासलेल्या सिंधुदुर्गात आता ‘हम करो सो कायदा’ म्हणणारे लोक
महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही, सत्ताधारी पक्षातील लोक दहशत निर्माण करत आहेत. संसदीय लोकशाहीची पायमल्ली केली जात आहे. जाती धर्मातील एकोप्याची भावना नष्ट केली जात आहे. आज विविधतेत एकता या मुळ गाभ्याला धोका निर्माण झाला आहे. देवेंद्र फडणवीस हेकेखोर पद्धतीने राज्यकारभार हाकत असून त्यांच्या मंत्रिमंडळात एक एक मंत्री एक एक …
Read More »अमोल मातेले यांचा इशारा, तर त्या विधेयकामुळे सरकारी दडपशाहीला सामोरे जावे लागणार महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायद्यामुळे लोकशाही अधिकारांवर गदा
महाराष्ट्र सरकारने प्रस्तावित ‘महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा’ हा कायदा आणण्याचा निर्णय घेतला आहे, जो राज्यात हुकूमशाही लादण्याच्या दिशेने उचललेले धोकादायक पाऊल आहे. हा कायदा मंजूर झाल्यास, लोकशाही मार्गाने विरोध करणाऱ्या नागरिकांना, सामाजिक कार्यकर्त्यांना, पत्रकारांना आणि संघटनांना अवाजवी दडपशाहीला सामोरे जावे लागेल अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, सौर ऊर्जेच्या वापरामुळे दर्जेदार आरोग्य सुविधांची उपलब्धता 'सेल्को फाउंडेशन'च्या सहकार्याने १८ जिल्ह्यांत प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सौर ऊर्जाकरण
पारंपरिक ऊर्जा स्त्रोत हे मर्यादीत असल्यामुळे यापुढील काळात अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांवरच अधिक भर द्यावा लागणार आहे. अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राला प्रोत्साहन देऊन अधिकाधिक ऊर्जा निर्मिती करण्याची शासनाची भूमिका आहे. राज्यात अपारंपरिक ऊर्जेच्या उपयोगासाठी सेल्को फाउंडेशन कार्यरत आहे. फाउंडेशनच्या सहकार्याने राज्यातील १८ जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सौर ऊर्जाकरण करण्यात येणार असून सध्या …
Read More »शरद पवार म्हणाले, अमरावती आणि बीड मध्ये जी काही ऐकायला मिळते ते चिंताजनक काही लोकांनी सत्तेचा गैरवापर केला
मागील काही महिन्यापासून धनंजय मुंडे आणि त्यांचे विश्वासू सहकारी वाल्मिक कराड यांच्या सत्तेच्या गैरवापर करत हैदोसाच्या अनेक सुरस कथा बाहेर येत आहेत. तसेच अमरावती जिल्ह्यातूनही अशाच पद्धतीच्या घटनांची माहिती पुढे येत आहे. यापार्श्वभूमी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली. बारामतीत आयोजित एका कार्यक्रमानंतर राष्ट्रवादी …
Read More »
Marathi e-Batmya