राजकारण

पंतप्रधान मोदी यांची स्पष्टोक्ती, संघटन, समर्पण आणि सेवेची त्रिवेणी देशाला पुढे घेऊन जाणार माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटरचे भूमिपूजनः मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती

संघटन, समर्पण आणि सेवेची त्रिवेणी भारत देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी महत्वाचे सूत्र ठरणार असून विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी याचा अवलंब करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. गोरगरिबांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी केंद्र शासन कसोशीने कार्य करीत आहे. माधव नेत्रालयानेही या कार्यात योगदान देत गेल्या तीन …

Read More »

पंतप्रधान मोदी यांची रेशीमबागेतील आरएसएसच्या मुख्यालयास भेट डॉ हेडगेवार आणि गोळवळकर गुरूजींच्या स्मृतीस्थळाचे घेतले दर्शन

नागपूर येथील आरएसएस मुख्यालयाला भेट देणारे पंतप्रधान मोदी म्हणाले की, संघ हा भारताच्या अमर संस्कृती आणि आधुनिकीकरणाच्या वटवृक्षासारखा आहे. नागपूर दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमही पार पडला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिक्षाभूमीला भेट दिली. या भेटीदरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय …

Read More »

महाबोधी महाविहार ताब्यात देण्याच्या मागणीसाठी रामदास आठवले बिहारच्या राज्यपालांकडे मागणीसाठी घेतली बिहारच्या राज्यपालांची भेट

महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे यासाठी महाबोधी टेम्पल ऍक्ट १९४९ रद्द करावा या मागणीसाठी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बिहारचे राज्यपाल महामहीम मोहम्मद आरिफ खान यांची पटना येथील राजभवन येथे भेट घेतली. या भेटीवेळी रामदास आठवले म्हणाले की, बुद्धगया मधील महाबोधी महाविहार हे …

Read More »

अंबादास दानवे यांची टीका, सरकार अदानीचे कर्ज माफ करू शकते पण शेतकऱ्यांचे नाही निवडणूकीतील आश्वासन पूर्ण करू शकत नाही

पीक कर्जमाफीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात राजकीय धुमाकूळ सुरू झाला आहे. अजित पवार यांच्या विधानाला महायुतीतील मित्रपक्षांकडून पाठिशी घालण्याचा प्रयत्न सुरु केला असताना , शिवसेना उबाठाने मात्र अजित पवार यांच्या वक्तव्याचा विरोध करत, महायुती सरकारने खोटी निवडणूक आश्वासने देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप केला. बारामतीतील एका कार्यक्रमात …

Read More »

एकनाथ शिंदे यांची घोषणा, वढू व तुळापूर बलीदान स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त स्थानिक सुट्टी जाहिर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य प्रेरणा देणारे आहे. पुढील अनेक पिढ्यांना स्फूर्ती आणि ऊर्जा देणाऱ्या त्यांच्या वढू येथील समाधी स्थळ व तुळापूर येथील बलीदान स्थळाला पर्यटन क्षेत्र नव्हे तर तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज यांच्या ३३६ व्या …

Read More »

मंगल प्रभात लोढा चित्ररथातून दाखवणार आरएसएचा १०० वर्षांचा इतिहास महाराष्ट्राचा इतिहास गौरवणारा चित्ररथ तयार

गुढी पाडव्यानिमित्त मुंबईमध्ये विविध ठिकाणी आयोजित होणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेत कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून साकार झालेला चित्ररथ सहभागी होणार आहे. यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे ३०० वे जयंती वर्ष, संविधान निर्मितीला झालेली ७५ वर्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेच्या शताब्दी …

Read More »

सुनिल तटकरे यांचे आवाहन, सद्‍भावनेची गुढी उभारूया… आपल्या महाराष्ट्राला विकासाच्या शिखरावर नेऊया

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने यंदाचा गुढीपाडवा आपण एका नव्या संकल्पाने ‘सद्‍भावनेची गुढी’ उभारून साजरा करावा असे आवाहन अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केले आहे. तसेच सुनिल तटकरे पुढे म्हणाले की, जातीधर्मांत निर्माण झालेले अंतर हे आपल्या महाराष्ट्राच्या सुसंस्कृत आणि वैभवशाली परंपरेशी सुसंगत नाही. म्हणूनच, यंदाच्या …

Read More »

वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वाद केलाच पाहिजे असं आहे का… अनेक वर्षे झाली, दोन्ही समाज सोबतच

राज्यात औरगंजेबाच्या कबरीवरील निर्माण झालेला वाद शांत होत नाही तोच आता नवा वाद रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीसमोरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरील वाद पुढे आला आहे. या समाधीवरून कोल्हापूरचे संभाजी राजे छत्रपती यांनी वाघ्या कुत्र्याच्या बाबत इतिहासात कोणताही पुरावा नसल्याचे सांगत ती समाधी राज्य सरकारने हटवावी अशी मागणी केली. तर ओबीसीचे नेते …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, कर्जमाफी मिळणार नाही ‘दादा, क्या हुआ तेरा वादा?’ भाजपा युती सरकारकडून शेतकरी व लाडक्या बहिणींची घोर फसवणूक, मते घेऊन सत्तेत आले आणि विसरले

जनतेने राक्षसी बहुमत देऊन सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू वागू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत कर्जमाफी देऊ असे आश्वासन देऊन महायुतीने राज्यातील शेतक-यांची मते घेऊन सत्ता मिळवली पण आता ३१ मार्चपूर्वी पीककर्ज भरा, कर्जमाफी मिळणार नाही असे मुजोरपणे सांगत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कर्जमाफी मिळणार नाही हे विधान शेतकऱ्यांच्या …

Read More »

खड्ड्याची तक्रार आता थेट राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडे ऑनलाईन करा खड्ड्यांच्या तक्रारीसाठी आता खड्डे तक्रार निवारण प्रणाली

पावसाळ्यानंतर रस्त्यांमध्ये खड्डे पडतात. असे खड्डे जलद दुरुस्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे तक्रार निवारण प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे नागरिकांना आता खड्डयांबाबतची तक्रार ऑनलाईन करता येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाचे संगणकीकारण करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन माहिती प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यासोबतच खड्ड्यासाठी तक्रार प्रणाली विकसित केली आहे. नागरिक …

Read More »