मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० योजनेमुळे पुढील दोन वर्षांत कार्यरत होणा-या सौर उर्जा प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होणार असून घरगुती ग्राहक, औद्योगिक ग्राहक यांनाही मोठा फायदा होणार आहे. सौर उर्जा प्रकल्पांमुळे आगामी पांच वर्षांत १०० युनिट पर्यंत वीज वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठीचे वीज दर ५ रु. ८७ प्रति युनिट …
Read More »शैक्षणिक हितासाठी एका वर्षासाठी ईब्ल्यूएस प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवेश घेतलेल्या प्रवेशित परंतु विहित नमुन्यामध्ये ईडब्लूएस EWS प्रमाणपत्र सादर न केलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशास एका वर्षासाठी विशेष बाब म्हणून ईब्ल्यूएस प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे ईडब्ल्यूएस प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या जवळपास १ हजार ६०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना लाभ होणार असल्याची …
Read More »नाना पटोले यांची घोषणा, लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसचा एल्गार,राष्ट्रीय मतदार दिनी आंदोलन लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या भाजपा व निवडणूक आयोगाचा निषेध करणार
भारतीय जनता पक्ष व निवडणूक आयोगाने विधान सभेच्या निवडणुकीत मतांवर दरोडा टाकून लोकशाहीचा गळा घोटला आहे. भाजपा व निवडणुक आयोगाची ही अभद्र युती लोकशाहीला कलंक लावणारी आहे. लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी तसेच मतदारांच्या हक्कासाठी काँग्रेस पक्ष शनिवारी २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनी राज्यभर जिल्हा व तालुका स्तरावर तीव्र आंदोलन करणार …
Read More »अजित पवार म्हणाले, पक्षाचे काम करताना आगीतून फुफाट्यात पडल्याची भावना… आपल्याला अजितपर्व पुढे नेताना भविष्याचा वेध घ्यायचा आहे - सुनिल तटकरे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त सदस्य कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करा असे सांगतानाच निवडणूका डोळ्यासमोर ठेवूनच काम करा. पल्ला लांब असला तरी दिवस पटकन निघून जातात त्यामुळे लक्षपूर्वक काम करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. गुरुवारी नांदेड जिल्हयातील नायगाव मतदारसंघातील सुमारे …
Read More »नाना पटोले यांची मागणी, शिंदे व फडणवीस सरकारने दावोससंदर्भात श्वेतपत्रिका काढावी ‘बुक माय शो’, ‘हिरानंदानी’शी करार करून सरकार काळाबाजारी व गुन्हेगारीला प्रोत्साहन देत आहे का?
दावोसमध्ये ६१ कंपन्यांशी केलेल्या करारातून १५.७० लाख कोटींची गुंतवणूक व १५.९५ लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्यात मोठी गुंतवणूक आली तर त्याचे स्वागतच केले पाहिजे पण केलेले करार व वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा जनतेला अधिकार आहे. याआधीही असेच मोठे करार झालेले आहेत, …
Read More »सुप्रिया सुळे यांची भीती, राज्यात प्रचंड अस्वस्थ करणारी परिस्थिती संसदेत मांडणार हा विषय मांडणार
राज्यातील सरकार कबुली देतंय की ४०० कोटी रुपयांचा पीक विम्याचा घोटाळा झाला आहे आणि त्याच सरकारमधील आमदार म्हणतायत की ४०० नव्हे तर ५००० कोटीचा झालाय. हा खूप गंभीर विषय असून तो मी, संसदेत मांडणार आहे. तसेच सरकारने हार्वेस्टरमागे ८ लाख रुपये मागितले हे अतिशय गंभीर आहे स्वतः भ्रष्टाचार होतो हे …
Read More »राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे निर्देश, सर्व बसस्थानकांमध्ये तृतीयपंथीयांना राखीव स्वच्छतागृहे बसचे अपघात कमी करण्यासोबतच बस स्थानकातील स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे निर्देश
राज्यातील परिवहन महामंडळाच्या बसेसचे होणारे अपघात कमी करण्यासंदर्भात ठोस पावले उचलण्यात यावीत. राज्यातील सर्व बस स्थानकांवर तृतीयपंथीयांना राखीव स्वच्छतागृह उपलब्ध करून द्यावे. तसेच बस स्थानक परिसर स्वच्छ व उत्तम सोयी सुविधायुक्त ठेवण्यात यावा, असे निर्देश परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले. एसटी महामंडळाच्या आढावा बैठकीचे आयोजन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, सैफ अली खान प्रकरणी सीसीटीव्ही आणि अटकेतील व्यक्ती एकच का? ‘लाडकी बहीण’चा फायदा घेणारे बांग्लादेशी भारतात आले कसे? नरेंद्र मोदी सरकार कमजोर आहे का?
अभिनेता सैफ अली खानवर त्यांच्या घरातच मध्यरात्री हल्ला झाल्याने मुंबईत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई पोलिसांनी हल्लेखोराला अटक केल्याचे जाहिर केले आहे परंतु CCTV मध्ये दिसलेला हल्लेखोर व अटक करण्यात आलेला व्यक्ती यांच्यात साम्य दिसत नाही असा दावा एका वृत्तपत्राने केला आहे, या प्रश्नी मुंबई पोलिसांनी खुलासा करावा व …
Read More »काका शरद पवार, पुतण्या अजित पवार शेजारी बसता बसता पुन्हा एक हात अंतर वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटच्या कार्यक्रमात काका-पुतण्यात नेमकं काय घडलं
विधानसभा निवडणूकीचा निकाल जाहिर झाल्यानंतर काका शरद पवार आणि पुतण्या अजित पवार यांनी एकमेकांपासून दूर राहणेच पसंत केल्याचे दिसून आतापर्यंत दिसून आले. तसेच कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर बसणेही टाळले. परंतु वसंतदादा पाटील शुगर इन्स्टीट्युटच्या आज आयोजित कऱण्यात आलेल्या कार्यक्रमात मात्र मंचावर एकत्रित बसण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून पाचोरा रेल्वे दुर्घटनेतील मदत जाहिर मृतांच्या कुटुंबिंयाना पाच लाख रुपयांची मदत; जखमींवर मोफत उपचार मदत व बचाव कार्याचे दावोस येथून समन्वय
जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीकच्या परधाडे रेल्वे दुर्घटनेतील मृतांप्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंवेदना व्यक्त करून, मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मृतांच्या कुटुंबिंयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करून, जखमींवर शासनाच्या वतीने मोफत उपचार केले जावेत असे निर्देशही दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जागतिक अर्थ परिषदेच्या निमित्ताने दावोस दौऱ्यावर आहेत. …
Read More »
Marathi e-Batmya