भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२५ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी ९.१५ वाजता आयोजित करण्यात येणार आहे. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी या दिवशी सकाळी ८.३० ते १० या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्ध शासकीय समारंभ आयोजित …
Read More »स्वामित्व योजनेंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सनद वितरणाचा शुमारंभ महाराष्ट्रात राज्यपाल तसेच मुख्यमंत्री यांच्या हस्ते सनद वितरण
स्वामित्व योजनेद्वारे देशातील जनतेच्या उत्पन्नात वाढ होत असून यामुळे त्यांच्या आशा-आकांशा पुर्ण करत आहे. स्वामित्व योजनेंतर्गत जनतेला देण्यात आलेल्या कायदेशीर सनदेमुळे त्यांना मदत होत असून या सनदेच्या आधारे बँकेतून कर्जाद्वारे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. केंद्रीय ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालयामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, मुंबईत सेलिब्रिटी आणि गावात सरपंच सुरक्षित नाही… काय अवस्था? अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याला धर्माच्या दृष्टीकोनातून पाहू नका
महाराष्ट्रात जंगलराज निर्माण झाले आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. दिल्लीत आज महाराष्ट्राची चर्चा जंगलराज म्हणून होत आहे हे दुर्दैवी आहे. भाजपा सरकारने महाराष्ट्राला कलंकीत करण्याचे काम केले असून सत्तेसाठी दहशत निर्माण करण्याचे काम भाजपाने थांबवले पाहिजे. राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली असून मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाहीत आणि गावात सरपंच …
Read More »अंजली दमानिया यांच्याकडून मुंडे-कराड चा आणखी एक पुरावाः केली राजीनाम्याची मागणी राख विक्रीच्या कंपनीत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड भागिदारी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी आणि परळी तालुक्यातील दहशतीवरून मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील कथित आर्थिक संबध आणि वाल्मिक कराडच्या पाठिशी धनंजय मुंडेच असल्याचे आतापर्यंत उघडकीस आले आहे. यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज आणखी एक पुरावा दाखवत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा तात्काळ घ्यावा …
Read More »गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी व अतिक्रमणे रोखण्यासाठी जिल्हास्तरीय कमिटी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांची समिती
गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी आणि नव्याने अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कमिटी गठीत करण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना दिली. महाराष्ट्र राज्यात सध्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अंतर्गत एकूण ४७ केंद्र संरक्षित किल्ले आणि पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनलय अंतर्गत ६२ …
Read More »राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला सुरुवात छगन भुजबळ आले, प्रफुल पटेल म्हणाले, ते ज्येष्ठ नेते ते आमच्या कुटुंबातील टोकाची नाराजी नाही
विधानसभा निवडणूकीनंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षात नाराजी छगन भुजबळ यांच्या निमित्ताने बाहेर आली. त्यातच छगन भुजबळ यांच्या नाराजीवरून स्वतः अजित पवार आणि प्रफुल पटेल यांच्याकडून नाराजी दूर करण्यासंदर्भात अद्याप कोणतीच भेट झाली नसल्याचे सांगितले जात असतानाच राष्ट्रवादीच्या दोन दिवसीय अधिवेशासाठी नाराज छगन भुजबळ येणार की नाही अशी चर्चा …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, तंत्रज्ञान क्षेत्रात पुढे जाण्यासाठी कॉम्पेक्स प्रदर्शन महत्वाचे राज्यात इनोव्हेशन सिटी तयार होत आहे
परिवर्तन हा जीवनाचा नियम असून तंत्रज्ञान क्षेत्रात हा बदल झपाट्याने होत आहे. कॉम्पेक्स प्रदर्शनाच्या माध्यमातून विदर्भासाठी माहिती तंत्रज्ञान, डिजीटल गॅझेट, गेमिंग कॉम्पुटींग, कृत्रीम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रात मोठे दालन उपलब्ध झाले आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात विदर्भाला पुढे घेवून जाण्यासाठी हे आयोजन महत्वाचे ठरत असल्याचे प्रतिपादन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. …
Read More »दरवर्षी एसटी महामंडळ स्वमालकीच्या ५ हजार लालपरी बसेस खरेदी करणार एस टी महामंडळ नवीन बस खरेदीसाठी पंचवार्षिक योजना आणणार - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
एस. टी महामंडळ दरवर्षी स्वमालकीच्या ५ हजार साध्या लालपरी बसेस खरेदी करणार आहे. यासाठी महामंडळ अंतर्गत पंचवार्षिक नियोजन करण्यात येणार आहे, तसेच महामंडळात यापुढे कुठल्याही पद्धतीने भाडेतत्त्वावर बसेस न घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला. परिवहन आयुक्त कार्यालयात एसटी महामंडळ कामकाज आढावा बैठक परिवहन मंत्री प्रताप सरनाईक …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, २०२७ च्या कुंभमेळ्याची तयारी करा धार्मिक परंपरेचे दर्शन घडविण्यासाठी ‘महाकुंभा’ची निर्मिती करा
नाशिक –त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील धार्मिक परंपरेचे दर्शन घडावे, यासाठी नाशिकजवळील भागात एक मोठे महाकुंभ तयार करावे. या महाकुंभामध्ये देशातील तसेच राज्यातील मंदिरे, तीर्थक्षेत्रे, सांस्कृतिक वारशाचे भाविकांना दर्शन घेता येईल, असे मोठे संमेलन केंद्र (कन्व्हेन्शन सेंटर) उभारावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २० ते २४ जानेवारीला दावोसला पहिल्या कार्यकाळात महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावरुन आला होता पहिल्या क्रमांकावर
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या २० ते २४ जानेवारी या काळात दावोसमध्ये वर्ल्ड इनॉकॉनिक फोरममध्ये सहभागी होणार आहेत. यासाठी १९ तारखेला पहाटे ते मुंबईतून रवाना होणार आहेत. सर्वाधिक परकीय गुंतवणूक आकर्षित करणारा आणि आकांक्षांनी परिपूर्ण महाराष्ट्रात आणखी गुंतवणूक आणण्याच्या हेतूने त्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. यापूर्वी देवेंद्र …
Read More »
Marathi e-Batmya