राजकारण

वंचितच्या फारूख अहमद यांचा सवाल, आमदार प्रणिती शिंदे….तेव्हा तुम्ही कुठे होता? जेव्हा देशभर अल्पसंख्याक मुस्लीम, दलित, आदिवासी, बहुजनांवर अन्याय अत्याचार

सोलापूर येथील काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर टीका केली होती, त्याला जोरदार प्रत्युत्तर वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष फारूख अहमद यांनी दिले. फारूख अहमद पुढे बोलताना म्हणाले, जेव्हा देशभर अल्पसंख्याक मुस्लीम, दलित, आदिवासी, बहुजनांवर अन्याय अत्याचार होत होते, तेव्हा तुम्ही कुठे लपला होतात? …

Read More »

५० हजार शिक्षकांच्या भरतीप्रक्रियेला येत्या शुक्रवारपासून होणार सुरुवात ३० हजार शिक्षकांची पहिल्या टप्प्यात भरती

जिल्हा परिषद आणि माध्यमिक शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांच्या भरतीचा प्रश्न सुटला असून शिक्षक भरतीसाठी आवश्यक असणारी पवित्र ही वेबसाईट शुक्रवारपासून कार्यरत होणार आहे. तर त्यानंतरच्या पुढच्या १५ दिवसात प्रत्यक्ष भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. संध्याकाळी उशीरा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर …

Read More »

काँग्रेसचा आरोप, पराभवाच्या धास्तीने पछाडल्यानेच मोदी सरकारला महागाईची जाणीव ४५० रुपयांचा सिलेंडर ११५० रुपये करुन २०० रुपये कमी करणे ही मोदी सरकारची लुटारु वृत्ती

महागाईने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले असताना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मोदी सरकारला अचानक महागाईची जाणीव झाली आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये २०० रुपये व उज्ज्वला योजनेतील सिलिंडरमागे ४०० रुपये कमी करण्याचा निर्णय घेऊन जनतेला दिलासा देत असल्याचा ढोल बडवला जात आहे पण पाच राज्यातील विधानसभा निवडणुका व त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत पराभव …

Read More »

इंडियाच्या धर्तीवर भाजपासह एनडीएची बैठक मुंबईत होणार

भारतीय जनता पार्टी , शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांची संयुक्त बैठक ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार असल्याची माहिती महायुतीच्या समन्वय समितीचे अध्यक्ष आणि भाजपा आ. प्रसाद लाड यांनी मंगळवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत, …

Read More »

‘इंडिया’ आघाडीमुळे घाबरलेल्या मोदींची घाईघाईत ३८ पक्षांची बैठक नाना पटोले म्हणाले, ... मोदींचा पराभव करणे हाच उद्देश

देशातील हुकुमशाही मोदी सरकारने काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर राजकीय सुडबुद्धीने कारवाई केली पण राहुल गांधी मोदींच्या हुकुमशाहीला न डगमगता निर्भीडपणे सामोरे गेले. देशभरात भितीचे वातावरण असताना ‘डरो मत’ असा संदेश देणाऱ्या राहुल गांधी यांचा सत्कार छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात करावा, ही काँग्रेसची भावना होती म्हणूनच …

Read More »

सुनिल तटकरे म्हणाले, आम्ही जो विचार घेऊन सत्तेत सहभागी… बीडच्या उत्तरदायित्व सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद...

राज्याचे विकासाभिमुख उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे पिंपरी-चिंचवड, बारामती आणि बीडमध्ये झालेले स्वागत पाहून आम्ही जो विचार घेऊन सत्तेत सहभागी झालो, त्याला जनतेमधून पाठिंबा मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीडमधील ‘उत्तरदायित्व सभेला’ मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल सुनिल …

Read More »

त्या टीकेवर महेश तपासे म्हणाले, शरद पवारांवर टीका करणे ही राजकीय फॅशन पवार साहेबांनी मोठे केलेले लोक ऋण विसरले मात्र जनता पवार साहेबांसोबत

महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यात दलित तरुणांना झाडावर उलट टांगून मारहाण केली या घटनेचा साधा निषेध ही बीडच्या सभेमध्ये जमलेल्या मंत्र्यांनी केला नाही याची खंत पवार गटाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी बोलून दाखवली. राज्यातल्या नेते मंडळींना राज्यात वाढत चाललेल्या असहिष्णुतेच्या घटना दिसत नाहीत हे दुर्दैव आहे अशी प्रतिक्रियाही व्यक्त केली. पुढे …

Read More »

नाना पटोले यांची स्पष्टोक्ती, … ‘भाजपा चलो जाव’ चा नारा ‘इंडिया’त पंतप्रधानपदासाठी अनेक सक्षम उमेदवार, भाजपाकडेच चेहरा नाही

भाजपाच्या अत्याचारी सरकारविरोधात देशभरातील विविध राजकीय पक्षांनी इंडिया आघाडीच्या नावाखाली एक वज्रमुठ बांधलेली आहे. इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर अशी दोन दिवस होणार आहे. ३१ ऑगस्टला इंडिया आघाडीच्या लोगोचे अनावरण केले जाईल. महात्मा गांधी यांनी ब्रिटिश सत्तेला मुंबईतूनच ‘चलो जाव’ चा नारा दिला होता, मोदी …

Read More »

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आणि दुष्काळग्रस्त भागातील प्रकल्पांना मदत द्या गांधीनगर येथील पश्चिम क्षेत्रिय परिषदेच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मागणी

दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाण्याची समस्या आहे. नदी जोड प्रकल्प प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड आणि कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी याचा योग्य तो वापर यासाठी करण्यास केंद्राकडून मदत हवी त्याचप्रमाणे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते आज अहमदाबाद येथील गांधीनगर येथे पश्चिम …

Read More »

देवेंद्र फडणवीसांवरील खालच्या भाषेतील टीका यापुढे खपवून घेणार नाही भाजपा आ. प्रवीण दरेकर यांचा उद्धव ठाकरेंना इशारा

मुख्यमंत्रीपद गेल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे थांबवले नाही तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कृतीने उत्तर देतील असा इशारा भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रवीण दरेकर यांनी सोमवारी दिला. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यलयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ …

Read More »