येत्या ८ सप्टेंबरला राज्य सरकारचा ‘शासन आपल्या दारी’हा कार्यक्रम जालना जिल्ह्यात नियोजित आहे. सराटी अंतरवाली येथील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा आपल्या कार्यक्रमावर विपरित परिणाम होऊ नये, यासाठी हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. मराठा आंदोलनावरील लाठीमार प्रकरणी आज दुपारी मुंबईत प्रतिक्रिया देताना ते बोलत …
Read More »अजित पवार यांची घोषणा, मराठा आंदोलकांवरील लाठीमारप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी… दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश, आंदोलकांच्या भावनांशी सहमत
“मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवली येथे आंदोलन करणाऱ्या समाजबांधवांवर पोलिसांकडून झालेला लाठीमार, हवेतील गोळीबार, बळाच्या गैरवापरासंबंधी उच्चस्तरीय चौकशीचे आणि दोषी पोलिसांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. या घटनेबाबत मराठा बांधवांसह सर्व महाराष्ट्रवासियांच्या भावना तीव्र आहेत. राज्य शासन देखील या भावनांशी सहमत असून शासनाने या प्रकरणाची गंभीर …
Read More »पवार यांच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस प्रत्युत्तर, शरद पवार, चिडलेले, नाराज आहेत…. मोठे नेते आहेत त्यांना उत्तर देणार नाही
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून जालन्यात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामध्ये ५० हून अधिक निष्पाप नागरिक जखमी झाले आणि त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणावरून विविध राजकिय पक्षांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करत या घटनेवरून जबाबदार धरण्यात येत आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, शरद पवार हे मुख्यमंत्री असताना गोवारी …
Read More »शरद पवार यांचा आरोप, फोन आल्यानंतरच लाठीचार्ज, गोवारी हत्याकांड…. देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा
मुंबईत इंडिया आघाडीची बैठक सुरु असतानाच जालना येथे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलनाची भूमिका घेणाऱ्या आंदोलकांवर पोलिस लाठीचार्ज करण्यात आला. यात मोठ्या प्रमाणावर निष्पाप लोक जखमी झाले. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी जालना येथील रूग्णालयात जात जखमींची विचारपूस केली. यावेळी भेटीनंतर आंदोलनकर्त्यांच्या ठिकाणी जाऊन संवाद साधला. त्यानंतर आयोजित …
Read More »नाना पटोले यांचा आरोप. ‘इंडिया आघाडी’ वरुन लक्ष वळवण्यासाठी जालन्यात लाठीचार्ज मराठा व धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या फडणवीसांच्या आश्वासनाचे काय झाले ?
देशभरातील महत्वाच्या पक्षांचे नेते मुंबईत इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी आले असताना या बैठकीचा संदेश देशभर जाऊ नये व इंडिया आघाडीच्या बैठकीपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी सत्तेतील भाजपाने जालन्याची घटना घडवून आणली. आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठा समाजातील निर्दोष बांधवांवर लाठीचार्ज करण्यात आला. हा लाठीचार्ज सरकारच्या आदेशानेच झाल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले …
Read More »राजस्थानात मुख्यमंत्री पदासाठी वसुंधरा राजेंना भाजपाकडून “साईडलाईन” ? नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता
एकाबाजूला काहीही करून देशावरील भाजपाची अर्थात नरेंद्र मोदी यांची सत्ता अबादीत ठेवायची या उद्देशाने अनेक छोट्या-मोठ्या राजकिय पक्षात बंडखोरी आणण्याचे प्रयत्न भाजपाकडून सुरु आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नावावर निवडणूका लढविण्याचा निर्णयही घेतला आहे. मात्र राजस्थानमध्ये भाजपाच्या वसुंधरा राजे यांना मात्र विधानसभा निवडणूकीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न प्रदेश भाजपाने सुरु …
Read More »मराठा समाजाला मीच आरक्षण देतो म्हणणाऱ्या फडणवीसांनी पोलीसांकरवी लाठ्या काठ्यांनी मारले मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर खुर्ची खाली करा :- नाना पटोले
मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यासाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात सुरु असलेले आंदोलन पोलीसी बळाचा वापर करुन दडपण्याचा प्रयत्न येड्याचे सरकार करत आहे. पोलिसांनी लाठीचार्ज करुन हवेत गोळाबार केला, या घटनेचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत आहे. मराठा समाजाला जर शिंदे, फडणवीस, पवार यांचे तिघाडी सरकार आरक्षण देऊ शकत नसेल …
Read More »राहुल गांधी म्हणाले, नफरत की बाजार मे मोहब्बत की दुकान…. जगातील सर्वात शक्तीशाली ब्रिटीश सत्ता काँग्रेसमुक्त भारत करु शकली नाही, नरेंद्र मोदी काय करणार?
काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांचा शुक्रवारी महाराष्ट्र काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या टिळक भवनात सत्कार करण्यात आला. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, द्वेषाच्या बाजारात आम्ही प्रेमाचे दुकान उघडू असा निर्धार व्यक्त करत काँग्रेस हा बब्बर शेर आणि शेरनिंयोका पक्ष आहे. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी फुटली, पण काँग्रेसमध्ये फूट पडली नाही. आम्ही …
Read More »इंडिया बैठकीत निवडणुकीचे बिगुल वाजवत केली समन्वय समितीची स्थापना निवडणुका एकत्र लढण्याचा निर्धार, जागा वाटपाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे
देशभरातील २८ विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या इंडिया आघाडीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत निवडणुकीचा बिगुल वाजवला. केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात लोकसभा आणि शक्य तितक्या विधानसभा निवडणुका एकत्र लढल्या जातील, असा ठराव दोन दिवसीय बैठकीत मंजूर करण्यात आला. निवडणुकीसाठी विविध राज्यांमध्ये जागावाटपाची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येणार असून ती लवकरच पूर्ण केली जाणार …
Read More »राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचा उद्धव यांचा प्रयत्न…… हिंदूहृदयसम्राटाचा मुलगाच हांजी हाजी करतोय ही बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी!- शिवसेना खा. राहुल शेवाळे आणि आ. उदय सामंत यांची टीका
देशभरातील सर्व भ्रष्ट नेते मुंबईत पर्यटनासाठी आले आहेत. एकेकाळी वंदनीय बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या या नेत्यांची सरबराई करण्यासाठी हिंदुहृदयसम्राटांचा मुलगाच हांजी हांजी करत फिरत आहे. त्यामुळे या दुभंगलेल्या I.N.D.I.A. आघाडीच्या बैठकीच्या निमित्ताने बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांचा चेहरा जनतेसमोर आला आहे, अशी टीका शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आणि आमदार व मंत्री उदय …
Read More »
Marathi e-Batmya