राज्यात पहाटेच्या शपथविधीवरून शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी होत असतानाच आणि त्या शपथविधी मागे नेमकं कोण या बाबतची उस्तुकता अद्याप राजकिय वर्तुळात असतानाच अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप घडवून आणला. तसेच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर …
Read More »राष्ट्रवादीतील राजकिय भूकंपात अजित पवार यांना ‘या’ नेत्यांनी दिली साथ मुख्यमंत्री शिंदेंकडील आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडील खात्यांचा भार हलका
राज्यातील सत्ता हस्तगत करण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केली. त्यापाठोपाठ १३ खासदारही ठाकरे यांना सोडून शिंदे यांच्यासोबत गेले. आता तशीच काहीशी पुर्नरावृत्ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडवून आणण्यात भाजपाला यश आल्याचे दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अजित पवार …
Read More »संजय राऊत यांचा घणाघात, दिल्लीचे दोन बोके आणि ४० खोके… पंतप्रधान मोदींसह शिंदे गटावर हल्लाबोल
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून करण्यात येत असलेल्या मुंबईतील कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करण्यात येत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाकडून आज शनिवारी मुंबईत महामोर्चाच आयोजन करण्यात आलं. या मोर्च्याला मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते. हा मोर्चा मेट्रो सिनेमापासून मनपा कार्यालयापर्यंत काढण्यात आला. या मोर्च्याला सुरुवात होण्यापूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी …
Read More »नाना पटोले यांची मागणी, … ईडी सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ५४ हजार कोटी रुपये खर्चून जनतेच्या माथी मृत्युचा महामार्ग
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग मोठा गाजावाजा करुन ईडी सरकारने घाईघाईत पंतप्रधानांच्या हस्ते खुला केला. हा महामार्ग सुरु झाल्यापासून दररोज अपघात होत आहेत. या महामार्गाबद्दल अनेक तक्रारीसुद्धा येत आहेत पण शिंदे फडणवीस सरकार त्याची दखल घेताना दिसत नाही. बुलढाण्याजवळ खाजगी बसला अपघात होऊन २६ जणांचा होरपळून मृत्यू झाला, हा अपघात नसून सरकारी …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, समृद्धी महामार्गावरील अपघातांचा तज्ज्ञांमार्फत अभ्यास करणार २६ जणांचा लागलेल्या आगीत मृत्यू, देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात जखमींची विचारपूस
समृद्धी महामार्गावरील प्रवास सुरक्षित होण्यासाठी तज्ज्ञांमार्फत अभ्यास करण्यात येईल. त्यांच्या सूचनांनुसार उपाययोजना प्राधान्याने अंमलात आणण्यात येतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. समृद्धी महामार्गावरील देऊळगाव राजानजीक खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचा शुक्रवारी (३० जून) रात्री दोन वाजता अपघात झाला. या अपघातात २६ जणांचा मृत्यू, तर आठ जण जखमी झाले आहेत. …
Read More »समृद्धी महामार्गावरील अपघाताबाबत मुख्यमंत्री शिंदे, पंतप्रधान मोदींकडून शोक मुख्यमंत्री शिंदेंकडून पाच लाख तर पंतप्रधानांकडून २ लाखांची मदत मृतांच्या कुटुंबियांसाठी जाहिर
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या …
Read More »शरद पवार यांनी स्पष्टचं सांगितले, पाच-सहा लाख देऊन प्रश्न सुटणार नाहीत… समृध्दी महामार्गावरील सततच्या अपघातावरून राज्य सरकारला सल्ला
समृध्दी महामार्गावरील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ एका खाजगी प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला. समृध्दी महामार्गावर सातत्याने अपघात होत असलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फक्त अपघातील मृतांच्या नातेवाईकांना चार-पाच लाख रूपये देऊन प्रश्न सुटणार नाही तर रस्ते तज्ञांना बोलावून याची …
Read More »समृध्दी महामार्गावरील भीषण अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू आठ जणांनी स्वतःचे प्राण वाचविले तर आठ जण जखमी
समृध्दी महामर्गावरील अपघाताची मालिका सातत्याने सुरुच असून शनिवारी रात्री दीडच्या सुमारास बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर एका बसला भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर बसला लागलेल्या आगीत २५ प्रवाशांचा दुर्दैवी अंत झाला आहे. ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. त्यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ हा अपघात झाला. या अपघातानंतर राज्यभर हळहळ …
Read More »संजय राऊत यांचा सवाल, इथे का समान नागरी कायदा नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समान नागरी कायद्यावर खोच टीका
देशात समान नागरी कायदा आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसे सूचक विधानही केलं आहे. यावर शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. देशात चार-चार कायदे लागू आहेत. भ्रष्टाचारासंदर्भात जे आपल्याविरोधात आहेत, त्यांना एक कायदा. स्वत:च्या पक्षात आलेल्या भ्रष्टाचाऱ्यांना दुसरा कायदा. …
Read More »ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या मोर्च्याला महायुतीचे मोर्चाने प्रतित्तुर भाजपा आणि शिंदे गटही काढणार ठाकरे गटाच्या विरोधात मोर्चा
राज्यात सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला आज एकवर्ष पूर्ण होत आहेत. यापार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून शिंदे फडणवीस सरकारवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहेत. तसेच मुंबई महापालिकेतील प्रशासकीय राजवटीत कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाल्याचा आरोप करत या घोटाळ्यांच्या चौकशीच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मोर्चा शनिवारी १ जुलै रोजी मुंबई महापालिकेवर धडकणार …
Read More »
Marathi e-Batmya