राजकारण

बाळासाहेब थोरातांचा पलटवार,…त्याच गावच्या बाभळी असतात’ हे सत्ताधा-यांनी लक्षात ठेवावे राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारण्याचे आंदोलन हे सत्ताधाऱ्यांचे हीन राजकारण

खा. राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याचा प्रकार सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर केला, हे अत्यंत हीन दर्जाचे राजकारण आहे. अशा हीन पातळीवर उतरून सत्ताधारी पक्षाला अवकाळी पावसाने शेतक-यांचे झालेले नुकसान, महागाई, बेरोजगारी यावरून लक्ष हटवता येणार नाही आणि महाराष्ट्राशी केलेल्या गद्दारीचे पापही झाकता येणार नाही. आमच्याकडेही जोडे आणि तुमच्या …

Read More »

अजित पवारांचा सत्ताधाऱ्यांना इशारा, उद्या विरोधी पक्षाकडून देखील घडेल… ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाहीय... ही महाराष्ट्राची परंपरा नाहीय विधिमंडळ कार्यक्षेत्रात असा प्रकार घडता कामा नये

विधिमंडळाच्या आवारात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेला सत्ताधारी आमदारांकडून जोडे मारण्याचा प्रकार झाला ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाहीय… ही महाराष्ट्राची परंपरा नाहीय असे सांगतानाच रस्त्यावर लोक जे काही करतात तो ज्याचा – त्याचा प्रश्न असतो, परंतु विधिमंडळ कार्यक्षेत्रात असा प्रकार घडता कामा नये अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार …

Read More »

राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन, विरोधकांच्या आक्रमकतेनंतर अध्यक्षांनीच सत्ताधाऱ्यांना भरला दम राहुल गांधी विरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे कामकाज दोनवेळा स्थगित

अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु असताना आज सकाळीच २०१९ साली निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी गुजरातमधील सूरत न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली. मात्र विधिमंडळाचे कामकाज सुरु होण्याआधीच सत्ताधारी पक्षातील भाजपा-शिंदे गटाचे आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जमा होत लंडनमधील सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यप्रकरणी जोडे मारो आंदोलन सुरु केले. या घटनेचे …

Read More »

न्यायालयाने विचारताच राहुल गांधींची स्पष्टोक्ती, मी बोलतो पण… प्रियंका गांधी-वड्रांचा मोदी सरकारवर निशाणा

गेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा यात्रेच्या निमित्ताने कोलर येथील प्रसारसभेत बोलताना राहुल गांधी यांनी सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? असा प्रश्न विचारत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. त्यानंतर राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपाचे माजी आमदार पुनरेश मोदी यांनी सुरत न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. …

Read More »

उध्दव ठाकरेंचा राजला टोला, जशी स्क्रिप्ट तशे वाचन… मी तर त्या बाबत पूर्वीच एका चित्रपटाचा संदर्भ देत स्पष्ट केले होते...

गुढी पाडव्या निमित्त आयोजित मनसैनिकांच्या मेळाव्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी १८ वर्षापूर्वीचा किस्सा सांगताना शिवसेना सोडण्यामागे उध्दव ठाकरे हेच कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत नारायण राणे यांच्याबाबतही तेच कारणीभूत असल्याचा आरोप केला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा या मुद्यावरून चर्चेला सुरुवात झाली. अर्थसंकल्पिय अधिवेशनात मराठी भाषा भवन इमारतीच्या अनुषंगाने उध्दव ठाकरे …

Read More »

हिंदू नव वर्षारंभांचे निमित्त साधत मुख्यमंत्री शिंदेंनी दिले “मनसे” संकेत गुढी पाडव्यानिमित्त डोंबिवलीत मनसे कार्यालयाला दिली भेट

हिंदूत्वाचा नारा देत राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थानापन्न झाल्यानंतर आलेल्या पहिल्याच गुढी पाडवा सणानिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी आज अचानक मनसे कार्यालयाला भेट दिली. त्यामळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी युती करणार असल्याचे मनसे संकेत तर नाही …

Read More »

जयंत पाटील यांची भीती, एकेदिवशी… गुजरातला आर्थिक राजधानी घोषित केले जाईल एवढ्या गोष्टी या गुजरातकडे नेण्यात आल्या

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे पण ज्याप्रमाणे निर्णय घेतले जात आहेत त्याप्रमाणे एकेदिवशी मुंबईचे महत्त्व कमी होईल आणि गुजरातला आर्थिक राजधानी घोषित केले जाईल की काय अशी भीती जयंत पाटील यांनी बोलताना व्यक्त केली. गुजरातला मुंबईविषयी आकस असणे स्वाभाविक आहे. मुंबई गुजरातला मिळाली नाही याचे त्यांना दुःख आहे असा …

Read More »

ऑटोरिक्षा चालक- मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी लवकरच धोरण निश्चिती मंत्री दादाजी भुसे यांची विधान परिषदेत ग्वाही

राज्यातील ऑटोरिक्षा चालक व मालक यांच्या सर्व समस्या, मागण्या आणि अडचणी सोडविण्यासाठी सर्व रिक्षा संघटनांना विश्वासात घेऊन लवकरच धोरण निश्चित करण्यात येईल, असे मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत सांगितले. सदस्य कपिल पाटील यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. मंत्री भुसे यांनी सांगितले की, रिक्षा चालक बांधवांसाठी राज्य शासनाने यंदाच्या …

Read More »

नाना पटोलेंची टीका, वस्त्रोद्योग कार्यालय हलवण्यामागे महाराष्ट्राला बरबाद करण्याचा डाव पंतप्रधान मोदी जनतेसाठी नाही तर ‘मेहुलभाई’सारख्या मित्रोंसाठीच काम करतात

मुंबई व महाराष्ट्राबद्दल दिल्लीतील भाजपा सरकारला कायम आकस राहिला असून मुंबई व राज्याचे महत्व कमी करण्याचा विडाच मोदी सरकारने उचललेला आहे. शिंदे सरकार आल्यापासून महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प गुजरातला हलवून महाराष्ट्राचे नुकसान करण्यात आले. आता मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तांचे कार्यालय दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे जाणीवपूर्वक केले जात असून महाराष्ट्राला बरबाद …

Read More »

बाळासाहेब थोरात यांची मागणी, साईबाबा संस्थानच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा त्यांच्या वेतनाचा लाभही द्या

अध्यात्मिकदृष्ट्या देशात अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या व अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या ५९८ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घ्यावे व वेतनातील फरक त्वरित द्यावा, अशी मागणी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत केली आहे. थोरात पुढे म्हणाले की, शिर्डी साई संस्थान मधील सुमारे ५९८ कंत्राटी कर्मचारी साधारणपणे …

Read More »