काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये पहिल्यादाच सत्तेत आलेल्या एका मंत्र्याला लाच घेताना अटक केल्याचे उदाहरण ताजे असतानाच आज ई़डीने केलेल्या कारवाईत आम आदमी पार्टीच्या दिल्ली सरकारमधील आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना अटक केली. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने अटक केली आहे. कोलकाता येथील एका कंपनीसोबत हवाला व्यवहार केल्याचा …
Read More »संजय राऊत यांचा गर्भित इशारा, जसं तुमचं लक्ष तस आमचंही… फडणवीसांच्या टीकेवर पलटवार करताना दिला इशारा
राज्यसभेच्या सहा जागांसाठी जवळपास भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सर्व उमेदवारांनी आज अर्ज भरले. मात्र सहाव्या जागेवर भाजपाचा उमेदवार निवडूण यावा यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला घोडेबाजार करायचा नाही. त्यामुळे शिवसेनेने एक उमेदवार मागे घ्यावा अशी सूचना केली. त्यावर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर पलटवार करत म्हणाले की, …
Read More »नाना पटोले म्हणाले, सध्या चूक दाखविण्याची परंपरा… संजय राऊत यांच्यासह टीकाकारांना प्रत्युत्तर
एकाबाजूला काँग्रेसला मजबूत करण्याच्यादृष्टीने नुकत्याच झालेल्या राजस्थानातील उदयपुर येथील नवसंकल्प शिबिरात चर्चा करण्यात आली. तसेच स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय पातळीवर पक्ष संघटना मजबूत कऱण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला. मात्र मागील अनेक वर्षआपासून पर राज्यातील उमेदवार महाराष्ट्रातून संसदेत पाठविण्याची परंपरा काँग्रेसने यंदाही सुरु ठेवत आपल्याच ठरावाला हरताळ फासला असल्याचे दिसत असताना …
Read More »मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, वेळ पडली तर बँकांचे मेळावे घ्या पण… वित्तीय वर्षासाठी बँकांकडून २६ लाख ३३ हजार कोटी रुपयांचा पत आराखडा
पावसाळा तोंडावर असून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पिक कर्जाची तातडीने आवश्यकता आहे ही बाब लक्षात घेऊन बँकांनी मिशनमोड स्वरूपात शेतकऱ्यांना पिक कर्जाचे वाटप करावे, आवश्यक असल्यास स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांची मदत घेऊन यासाठी बँक मेळावे आयोजित करावेत अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्या. त्यांनी कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा वेगाने विकास …
Read More »राज्यसभेसाठी “या” उमेदवारांनी भरला उमेदवारी अर्ज; असे असणार मतांचे गणित प्रफुल पटेल, डॉ.बोंडे, महाडिक, गोयल, प्रताप गढी या पाच उमेदवारांनी भरला
महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाणाऱ्या सहा जागांसाठी आज पाच उमेदवारांनी आज विधानसभेत जावून उमेदवारी अर्ज भरला. यामध्ये भाजपाच्या तीन उमेदवारांचा तर काँग्रेस एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका उमेदवारांनी अशा एकूण पाच उमेदवारांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला. अर्ज भरण्यासाठी ३१ मे ही शेवटची तारीख असून अर्ज माघारीची तारीख ३ जून आहे. या …
Read More »मुख्यमंत्री ठाकरेंनी केंद्राकडे केली मागणी, ७० लाखाहून अधिक शेतकऱ्यांना व्याज परत द्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांना पत्र
केंद्र शासनाने बँकांना पीक कर्जापोटी देण्यात येणारा २ टक्के व्याज परतावा थांबविण्याचा निर्णय घेताना कुठेही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केलेला नाही. त्यामुळे हा व्याज परतावा परत सुरु करुन केंद्राने सर्वसामान्य शेतकरी आणि जिल्हा सहकारी बँका यांना दिलासा द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे केली असून व्याज परतावा बंद …
Read More »जयंत पाटील म्हणाले, भाजपाला जशी मते कमी पडतात तशी आम्हालाही… राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दिली माहिती
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून संजय पवार यांना उमेदवारी जाहिर करण्यात आल्यानंतर भाजपाकडून माजी खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी जाहिर केली. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, अपक्षांची बेरीज केली तर आमचा कोटा पूर्ण होतो. …
Read More »मंत्री यशोमती ठाकूर यांची बोचरी टीका, नवनीत राणा बेशर्म आणि वेडी अमरावतीतील स्वतच्या स्वागत सोहळ्यावरून साधला निशाणा
हनुमान चालिसावरून शिवसेनेला आव्हान दिल्यानंतर तुरुंगावारी करून आलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी ३६ दिवसानंतर काल आपल्या शहरात परतल्या. त्यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. या जल्लोषाप्रकरणी विविध अशा तीन गुन्ह्यात राणा दाम्पत्यावर गुन्हा पोलिसांनी दाखल केला. यापार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसचा मोदींवर निशाणा; बनावट नोटा पुन्हा वाढल्या, नोटबंदी सपशेल फेल रिझर्व्ह बँकेचा अहवालच पुरेसा बोलका
नुकताच रिझर्व्ह बँकेने आपला वार्षिक अहवाल जारी केला असून या अहवालात २ हजार रूपयांच्या चलनातील जवळपास १५ टक्केहून अधिक नोटा गायब झाल्याचा सांगितले आहे. तसेच गतवर्षीच्या तुलनेत हा आकडा चांगलाच असल्याची बाबही नमूद केली आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या ट्विटर …
Read More »महिला आयोगाच्या नोटीसीनंतर चंद्रकांत पाटील यांची सशर्त दिलगिरी सुप्रिया सुळे यांच्यावर वैयक्तिक टीका केल्याप्रकरणी
ओबीसीच्या प्रश्नावर मंत्रालयावर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपाने मोर्चा काढत राज्य सरकारचा निषेध केला. मात्र यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना काही आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यावरून राज्य महिला आयोगाकडून नोटीस मिळताच अखेर चंद्रकांत पाटील यांनी समस्त महिला वर्गाची दिलगिरी व्यक्त केली. यासंदर्भात …
Read More »
Marathi e-Batmya