राजकारण

जयंत पाटील म्हणाले, आपण हनुमान चालिसा म्हणतोय, अन् तुम्ही त्रास होतोय… माकडांनी उच्छाद मांडलायच्या तक्रारीवरून जयंत पाटील यांचा राणा दाम्पत्यावर निशाणा

मागील काही दिवसांपासून राज्यात हनुमान चालिसा पठणावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापलेलं दिसत आहे. या मुद्यावरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवि राणा यांनी शिवसेनेवर चांगलेच शरसंधान करण्याचा प्रयत्न सुरु ठेवलेला आहे. यापार्श्वभूमीवर आपल्या मिश्किल टिपण्णीसाठी प्रसिध्द असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी …

Read More »

आमदारांची नाराजी रोखण्यासाठी महिनाभर सरकारी बदल्यांना स्थगिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय

राज्यात पहिल्यादाच राज्यसभेच्या आणि विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होत आहे. या दोन्ही निवडणूकांसाठी सर्व पक्षिय आमदार मतदान करणार आहेत. मात्र सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यासाठी आमदार आणि मंत्र्यांकडून शिफारसी करण्यात येतात. परंतु शिफारसी करूनही आमदार आणि मंत्र्यांना आपल्या आवडीच्या अधिकाऱ्याची बदली न झाल्यास त्यावरून आमदार आणि मंत्र्यांमध्ये नाराजी पसरू नये म्हणून …

Read More »

सदाभाऊ खोतांना भाजपाचा निरोप, “विश्रांती घ्या” विधान परिषद निवडणूकीत पत्ता कट

रयत क्रांती संघटनेचे संस्थापक माजी भाजपाचे राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना आता विश्रांती घ्या असा निरोप आल्याचे कळते. त्यामुळे विधानपरिषदेच्या निवडणुकीतून खोत यांचे नाव मागे पडले आहे. विधान परिषदेच्या १० जागासाठी निवडणुका जाहीर झाल्या असून २० जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीतून रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, माजी मंत्री सदाभाऊ खोत …

Read More »

ओबीसी समर्पित आयोगातही निर्माण झाले मतभेद राष्ट्रवादी अन शिवसेनेत ओबीसी आरक्षण प्रश्नी उडत आहेत खटके

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे (इतर मागासवर्ग) २७ टक्के आरक्षण पुन:प्राप्त करण्याची राज्य सरकारची लगीनघाई चालु असताना जयंतकुमार बांठिया अध्यक्ष असलेल्या समर्पित आयोगात दुफळी पडली आहे. ओबीसींच्या एम्पिरिकल डेटाचा अहवाल केव्हा सादर करायचा याप्रश्नी आयोगाच्या सदस्यांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. परिणामी, जूनच्या पहिल्या आठवड्यात अहवाल सादर होण्याची शक्यता मावळली आहे. …

Read More »

किरिट सोमय्या म्हणाले; परबांनी ती जागा विकली, पण उध्दव ठाकरेंना नोबेल पारितोषिक मिळेल ईडी कारवाईनंतर सोमय्यांची पुन्हा मुख्यमंत्री आणि अनिल परबांवर टीका

ईडीने काल राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सरकारी आणि खासजी निवासस्थानासह ७ ठिकाणी धाडी टाकत १२ तासाहून अधिक काळ चौकशी केली. त्यानंतर अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते रिसॉर्ट माझ्या मालकीचे नाही. तसेच चौकशीला आपण सामोरे जाणार असल्याचेही जाहिर केले. त्यानंतर आज भाजपाचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी आज …

Read More »

कॉर्डिलिया क्रुजप्रकरणी एनसीबीची मोठी कबुलीः आर्यन खानसह त्यांच्या विरोधात पुरावा नाही व्हॉट्सअॅप चॅट पुरावा होवू शकत नाही

बॉलीवूड बादशाह शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याच्या विरोधात ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असल्याच्या कारणावरून वादग्रस्त एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांने गुन्हा नोंदवित कारवाई केली. तसेच याप्रकरणी आर्यन खान हा आठवड्यापेक्षा जास्त कालावधी तुरूंगात रहावे लागले. मात्र याप्रकरणी आता आर्यन खान प्रकरणी कोणतेही ठोस पुरावे मिळाले नसल्याची स्पष्टोक्ती एनसीबीचे प्रमुख …

Read More »

संभाजी राजेंचा आरोप; मी गेलो पण, मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नाही… राज्यसभा निवडणूकीतून माघार घेत असल्याचे केले जाहिर

राज्यसभा निवडणूकीतील सहाव्या जागेसाठी माजी खासदार संभाजी राजे यांनी प्रयत्न सुरु केले. तसेच अपक्ष उमेदवारी जाहिर करत शिवसेना आणि भाजपाने पाठिंबा देण्यासाठी प्रयत्न केले. परंतु शिवसेनेनेत प्रवेश न केल्यामुळे शिवसेनेने संभाजी राजे यांच्या नावाचा पत्ता कट केला. यासर्व राजकिय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार संभाजी राजे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर …

Read More »

मुख्यमंत्र्यांचे आवाहन, कोरोना वाढतोय, मास्क वापरा; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले हे निर्णय सारथी संस्थेस खारघरमध्ये भुखंड उपलब्ध करुन देणार

कोरोना रुग्णांमध्ये संथपणे वाढ दिसत असून राज्यातील जनतेने मास्क वापरावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून जनतेला केले. राज्याची साप्ताहिक पॉझिटीव्हीटी १.५९ टक्के असून मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त पॉझिटीव्हीटी आढळते. मुंबईत रुग्णसंख्येत ५२.७९ टक्के वाढ झाली असून ठाण्यामध्ये २७.९२ टक्के तर …

Read More »

अनिल परब म्हणाले, जे रिसॉर्ट माझे नाही त्यावरून ईडीच्या धाडी, न्यायालयात जाणार ईडीचे अधिकारी गेल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली माहिती

दापोली येथील कथित रिसॉर्टप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकिय निवासस्थानासह त्यांच्याशी संबधित सात ठिकाणांवर छापे मारी केली. जवळपास १२ तासाहून अधिक काळ ईडीच्या अधिकाऱ्यांनी अनिल परब यांच्याकडील सर्व कागदपत्रांची आणि चौकशी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल परब म्हणाले, दापोलीतील जे रिसॉर्ट आहे. त्या रिसॉर्टची मालकी …

Read More »

नाना पटोलेंची टीका, नरेंद्र मोदी सरकारचा पायाच खोटेपणावर उभारलेला मोदी सरकारच्या ८ वर्षांच्या कारभारामुळे देश ५० वर्षे मागे गेला : नाना पटोले

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारची मागील ८ वर्षांतील कामगिरी सर्वच आघाडीवर शून्य राहिली आहे. महागाई प्रचंड वाढलेली आहे, जनतेसमोर जीवनमरणाचा प्रश्न उभा ठाकला आहे, बेरोजगारी ४५ वर्षांतील सर्वात जास्त आहे. रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली, अर्थव्यवस्था गटांगळ्या खात आहे. तर मागील ८ वर्ष ही खाजगीकरणातून मोदींचे उद्योगपती मित्र मात्र मालामाल आणि जनतेचे …

Read More »