विशेष बातमी

भाजपा उमेदवाराचे नाव काँग्रेसच्या जाहीरनामा समितीत आघाडीच्या शपथनाम्यात गोंदीयाच्या उमेदवाराचे नाव

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विद्यमान भाजपा-शिवसेनेचा पाडाव करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक लहान-मोठ्या पक्षांना घेवून आघाडीची स्थापना केली. मात्र या आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या जाहिरनामा समितीत भाजपाचे गोंदीयातील उमेदवार गोपालदास अगरवाल यांचे नाव असल्याने आघाडीच्या जाहीरनाम्याच्या शपथनामाबाबत संशय निर्माण झाला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने स्थापन केलेल्या आघाडीमध्ये भारतीय कम्युनिस्ट …

Read More »

व्याज, भाडे, डिव्हीडंड आणि फर्मच्या नफ्यातल्या हिश्श्याच्या बळावर आदित्यने कमावले ११ कोटी ११ कोटी रूपयांची मालमत्ता असल्याची आदित्य ठाकरे यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीसाठी फक्त दोन दिवस शिल्लक राहीलेले असताना आज गुरूवारी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी व्याज, जागा-जमिनीचे भाडे, डिव्हीडंड आणि एका फर्मच्या नफ्यातील मिळणाऱ्या हिश्शातून ८ कोटी रूपये कमाविल्याची माहिती त्यांनी दिली. आदित्य ठाकरे …

Read More »

कोल्हापूरकरांच्या रोषाला चंद्रकांत पाटील घाबरले पुण्यातून घेतली उमेदवारी

कोल्हापूर-मुंबईः प्रतिनिधी कृष्णा आणि पंचगंगेला आलेल्या पुरामुळे कोल्हापूर जिल्हा पूर्णतः पाण्याखाली गेला. मात्र कोल्हापूरचे रहिवासी असलेले राज्याचे महसूल मंत्री तथा भाजपाप्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी करवीरवासीयांच्या मदतीला धावण्याऐवजी पुण्यात राहणे पसंत केल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली. या टीकेची परिणती विधानसभा निवडणूकीत होवू नये म्हणून नियोजित शिराळा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्याऐवजी …

Read More »

वादा २० लाख घरांचा, पण प्रत्यक्षात तयार ३ हजार ८०० खाजगी विकासकांची घरे शासनाच्या यादीत दाखवून आवास योजनेची आकडेवारी फुगविण्याचा प्रकार

मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या विधानसभा निवडणूकांचे बिगूल वाजण्यापूर्वीच राज्य सरकारने सुरु केलेल्या विकास कामांचे ढोल वाचविण्यास सुरुवात केली. या विकासकामातंर्गत २०२२ पर्यंत राज्यात २० लाख घरांची उभारणी करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करत आतापर्यत ५ लाख घरे उभारल्याचेही त्यांनी वेळोवेळी जाहीर केले. परंतु प्रत्यक्षात मुंबईसह राज्यात फक्त ३ हजार …

Read More »

लॉर्ड माऊंटबँटनचे ओएसडी म्हणतात जम्मू -काश्मीरचा प्रश्न नेहरूंमुळे नव्हेतर ब्रिटीशांमुळे राजकिय गुंतागुत केवळ ब्रिटीशांनी निर्माण केली

दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक प्रचाराचा नारळ फोडताना भाजपाध्यक्ष तथा देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देशाचा अविभाज्य भाग असलेल्या जम्मू आणि काश्मीरला लागू असलेले ३७० कलम आणि ३५ ए हे कलम काढून टाकल्यामुळे हे राज्य पूर्णतः आता भारताचे झाले आहे. त्याचबरोबर नेहरूंच्या एका चुकीमुळे जम्मू आणि काश्मीरचा अर्धाभाग पाकिस्तानकडेच राहीला. …

Read More »

पं.दिनदयाल संस्थेला तो भूखंड अद्याप दिलेला नाही अखेर मराठी ई-बातम्याच्या वृत्तावर राज्य सरकारचा खुलासा

मुंबईः प्रतिनिधी चर्नी रोड स्टेशन लगत असलेली जवाहर बालभवन लगतचा भूखंड राज्य सरकारकडून पंडित दिनदयाल सेवाभावी संस्थेला देण्याचा घेतलेला निर्णय मराठी ई-बातम्या.कॉम या संकेतस्थळावर प्रसिध्द होताच तो भूखंड सदर संस्थेला द्यायचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नसल्याचा खुलासा उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला. मराठी ई-बातम्या संकेतस्थळावर वृत्त प्रकाशित झाल्यानंतर …

Read More »

पारदर्शक मुख्यमंत्री, महसूल मंत्र्यांना लागली गोडी भूखंडाच्या श्रीखंडाची प.दिनदयाल सेवाभावी संस्थेला मुंबईतील १२०० चौ.मीटरची जागा

मुंबईः खास प्रतिनिधी राज्यातील जनतेच्या अर्थात राज्य सरकारच्या मालकीचा भूखंड पत्नीसाठी तिरूपती देवस्थानला देण्याचा प्रताप नुकताच उघडकीस आला. आता त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्थापन केलेल्या पंडीत दिनदयाल उपाध्याय सेवाभावी संस्थेस भूखंडाचे श्रीखंड देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यासाठी महसूल आणि शिक्षण विभागाने फारच सोपस्कार …

Read More »

२३ पाकिस्तानी नागरीकांना राज्य सरकारने दिले भारतीय नागरीकत्व गृहराज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील आणि दिपक केसरकर यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप

मुंबई : प्रतिनिधी पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेल्या अल्पसंख्याक समाजातील २३ नागरिकांना आज गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर व गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले. पूर्वीपासून पाकिस्तानात राहिलेल्या व आता भारतात स्थलांतरित झालेल्या अल्पसंख्याक समाजातील नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्याचे अधिकार केंद्र शासनाने राज्य शासनास …

Read More »

आता प्रत्येकाला एकच घर उच्च न्यायालयाच्या दट्यानंतर राज्य सरकारचे धोरण

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील मुंबईसह विविध जिल्ह्यांमध्ये शासकिय योजनेच्या माध्यमातून नागरीकांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून दिली जातात. मात्र अनेक ठिकाणी विशेषतः मुंबईसारख्या शहरात एकापेक्षा अनेक घरे शासकिय योजनेतून मिळविण्याचे प्रकार वाढीस लागेल आहेत. या अशा एकापेक्षा अधिक घर लाभार्थ्यांवर निर्बंध घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून यापुढे भविष्यात शासकिय योजनेतून …

Read More »

भाजपातली मेगाभरती ही कारवाईच्या धाकापोटीच नेत्यांच्या संस्थामधील भ्रष्टाचाराचा मेगाभरतीसाठी आधार

मुंबईः प्रतिनिधी मागील काही महिन्यापासून पश्चिम महाराष्ट्रातील आजी -माजी खासदार आमदार आदी भाजपात प्रवेश करत आहेत. मात्र या प्रत्यक्ष पक्ष प्रवेशामागे त्या त्या नेत्यांच्या संस्थांमध्ये सदरच्या नेत्यांनी केलेल्या लाखो-करोडो रूपयांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे सरकारी यंत्रणेच्या हाती आल्याने या पुराव्याच्या आधारे कारवाईचा धाक दाखवित मेगाभरतीचे आमंत्रण देण्याचा सपाटा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि …

Read More »