महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये जलसिंचनाची क्षमता वाढवण्यासाठी शासन गंभीर असून, त्यासाठी महत्त्वाची पावले उचलण्यात येत आहेत, असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले. सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी अर्धा तास चर्चेत वाढत्या पाण्याची मागणी पूर्ण करण्याची सूचना केली होती, त्यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माहिती दिली. राधाकृष्ण …
Read More »सपा आमदार रईस शेख म्हणाले, महाराष्ट्रात ७५ लाख उर्दू भाषिक, पण लोकराज्य उर्दूत नाही आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून उपस्थित केला मुद्दा
राज्य शासनाच्या ‘लोकराज्य’ मासिकाच्या उर्दू आवृत्तीचे प्रकाशन कोणत्याही कारणाविना बंद करण्यात आले असून समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. राज्यातील उर्दू भाषिकांना शासनाच्या योजनांची माहिती होण्यासाठी ‘माहिती व जनसंपर्क महासंचालनालया’ला (डीजीआयपीआर) ‘लोकराज्य’ची उर्दू आवृत्ती पुन्हा सुरू करण्याचे निर्देश देण्यात यावेत, …
Read More »जयंत पाटील यांची मागणी, इतर पिकांप्रमाणे कांद्यालाही हमीभाव ठरवून द्या सोशल मिडीयावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मागणी
कांद्याचे घसरते दर आणि शेतकऱ्यांचे होणारे नुकसान या गोष्टींची गांभीर्याने दखल घेत इतर पिकांप्रमाणे कांद्यालाही हमीभाव ठरवून द्यायला हवा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज केली. आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले की, सध्या देशभरातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात …
Read More »दारु दुकाने परवाने देण्याच्या विरोधात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन विधिमंडळाच्या पायऱ्यावर विरोधकांचे आंदोलन
निवडणुकीत राज्याची तिजोरी रिकामी करणाऱ्या सरकारने आता महसूल वाढीसाठी १९७२ पासून बंदी असलेले मद्य परवाने देण्याचे लाडक्या बहिणींचे संसार उध्वस्त करणाऱ्या दारु दुकाने परवाने देण्याच्या धोरणा विरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले. महायुती सरकारने मद्य परवाने देऊन जनजीवन विस्कळीत करणारे धोरण आखले आहे. सत्ताधारी पक्षांनी आपले …
Read More »आदित्य ठाकरे यांच्या चड्डी-बनियन गँगच्या उल्लेखावर निलेश राणे यांचे आव्हान हिंमत असेल तर नाव घेऊन बोला, उगाच मोघम बोलू नका
महाराष्ट्र विधानसभेत आज शिवसेना (उबाठा)चे आमदार आदित्य ठाकरे यांनी २९३ च्या प्रस्तावावर बोलत होते. यावेळी प्रस्तावावरील भाषण संपविताना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचे अभिनंदन करत त्यांच्याकडून युतीचा धर्म पाळण्यात येत असून ज्या चड्डी-बनियनवर कारवाई करायला पाहिजे त्यांच्यावर कारवाई करता येत नाही. त्यामुळे त्यांचे खरेच आभार मानायला पाहिजे असे सांगत आपले …
Read More »चड्डी-बनियन व्हिडीओवरून अनिल परब यांचा टोला, सरकारने किमान दोन कपडे तरी द्यायचे बेडरूम पर्यंतचे व्हिडिओ लीक कसे होतात, यंत्रणा पोखरलीय
नुकतेच काही मंत्र्यांचे चड्डी-बनियनवरील व्हिडिओ व्हायरल झाले. त्यामुळे आता मंत्रीही सुरक्षित राहिले नाहीत. तर जनती सुरक्षा तर बाजूलाच राहिली असा उपरोधिक टोला शिवसेना उबाठाचे अनिल परब यांनी लगावत, चड्डी बनियन मध्ये सगळे उघडे फिरत आहेत. सरकारने किमान त्यांना दोन कपडे तरी पुरवायचे असा खोचक टोलाही शिंदे गटाचे आणि मंत्र्यांचे नाव …
Read More »प्रकाश आबिटकर यांची माहिती, १०२ क्रमांक रुग्णवाहिका सेवा सुरळीत, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन… विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान दिली माहिती
राज्यात आरोग्य सेवेसाठी १०२ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा उपलब्ध आहे. या सेवेची सर्व देयके आणि चालकांचे वेतन अदा केल्याने ही सेवा सुरळीत सुरू असल्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य शिवाजीराव गर्जे यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सर्वश्री …
Read More »एकनाथ शिंदे यांची ग्वाही, अनधिकृत बांधकामांना शासन पाठीशी घालणार नाही मुंबईतील अनधिकृत बांधकामाच्या प्रश्नावर विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान विचारलेल्या प्रश्नाला उत्तर
मुंबईतल्या अनधिकृत बांधकामांची यादी आणि त्यांचे वर्गीकरण करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना देण्यात येतील. शासन कोणत्याही अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणार नाही. जर अधिकारी अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालत असल्याचे आढळले, तर त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. याबाबत सदस्य पराग अळवणी यांनी प्रश्न उपस्थित केला …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, प्रविण गायकवाड यांच्यावरील हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांचे उत्तर
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावर काही जणांनी हल्ला केला. तसेच त्यांच्या तोंडाला आणि अंगावर शाई टाकण्यात आली. त्या विषयीचा मुद्दा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. घटनेच्या ठिकाणाहून पोलिसांनी एका जागेवरच अटक केली. सध्या सर्व …
Read More »विजय वडेट्टीवार यांची मागणी, प्रवीण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्यावर कडक कारवाई करा विधानसभेत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट इथे सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड गेले होते. तिथे त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यांना गाडीतून बाहेर खेचून पाडण्यात आले काळे फासण्यात आले. हा त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न होता असा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. विजय वडेट्टीवार पुढे बोलताना …
Read More »
Marathi e-Batmya