बहुचर्चित महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक २०२४ गुरुवारी विधानसभेत बहुमताने मंजूर झाले. सभागृहात, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरी नक्षलवाद आणि लोकशाहीविरोधी संघटनांना आळा घालण्याच्या उद्देशाने हे विधेयक मांडले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, हे विधेयक डाव्या पक्षांच्या आणि कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नाही, तर डाव्या विचारसरणीच्या अतिरेक्याविरुद्ध आहे आणि त्याचा गैरवापर होणार नाही, …
Read More »आशिष शेलार यांची घोषणा, गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा
१०० वर्षाहून अधिक मोठी परंपरा असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला “महाराष्ट्र राज्य महोत्सव” म्हणून आज घोषित करण्यात आले. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी ही घोषणा विधानसभेत केली. विधानसभेत निवेदन करताना मंत्री आशिष शेलार म्हणाले की, महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव १८९३ साली लोकमान्य टिळकांनी सुरू केला, या उत्सवाची पार्श्वभूमी ही सामाजिक, राष्ट्रीय, …
Read More »मुद्दा मराठी माणसाच्या हक्काच्या घराचाः पण शिवसेनेच्या दोन गटात गद्दारीवरून रंगला वाद अनिल परब आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यात गद्दारीवरून एकमेकांना धमकी
मागील काही दिवसांपासून मराठी -अमराठीचा वाद सातत्याने चांगलाच रंगला आहे. त्यातच मराठी माणसांना मुंबईतील विविध सोसायट्यांमध्ये घरे नाकारण्याचा प्रकारातही चांगलीच वाढ होत आहे. या मुद्यावरून आज विधान परिषदेत शिवसेना उबाठाचे आमदार अनिल परब आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यात चांगलीच शाब्दीक वाक्ययुद्ध रंगल्याचे चित्र पाह्यला मिळाले. विधान परिषदेत यासंदर्भात शिवसेना उबाठाचे …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा, राज्यात नागरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द आदर्श कार्यप्रणाली तयार करण्यात येणार, ५० लाख कुटुंबांना लाभ
राज्यातील महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणारा कायदा १९४७ नुसार ठराविक प्रमाणात कमी क्षेत्रफळ असलेल्या जमिनींची खरेदी-विक्री कायद्याने प्रतिबंधित होती. या पार्श्वभूमीवर १ जानेवारी २०२५ पर्यंत शहरी भाग, गावठाण पासून २०० मीटर पर्यंत आणि विविध प्राधिकरणांमधील भागात झालेले सर्व तुकड्यांचे व्यवहार मान्य करण्यात येणार आहेत. अशाप्रकारे एक गुंठेपर्यंत जमिन व्यवहारासाठी …
Read More »प्रताप सरनाईक यांची घोषणा, एसटीतील त्या १५ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणार विधानसभेत एसटी महामंडळाच्या भांडार खरेदीत घोटाळा प्रकरणी चर्चेत दिली माहिती
राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) पुणे जिल्ह्यातील दापोडी येथील मध्यवर्ती कार्यशाळेत भांडार खरेदीत मोठा आर्थिक अपहार उघडकीस आला आहे. विशेष लेखापरीक्षण पथकाने केलेल्या तपासणीत २२ कर्मचारी आणि अधिकारी दोषी आढळले आहेत. यापैकी १५ कर्मचारी आणि अधिकारी सध्या कार्यरत असून, उर्वरित ७ निवृत्त झाले आहेत. निवृत्त कर्मचाऱ्यांवर चौकशी करणे शक्य न झाल्याने …
Read More »विरोधी पक्षनेते पदावरुन विधानसभेत विरोधकांचा सभात्याग प्रश्नोत्तराच्या तास सुरु होण्याआधीच भास्कर जाधव यांच्याकडून बोलायला सुरुवात
पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु होऊन आज दुसरा दिवस सुरु झाला. सकाळी प्रश्नोत्तराचा तासाची घोषणा करताच शिवसेना उबाठाचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्याच्या विधिमंडळात महाराष्ट्राचे सुपुत्र तथा देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई हे येत आहे. त्या पार्श्वभूमीवर सांसदीय लोकशाही राबविणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेत सरकार आहे पण विधानसभेत विरोधी पक्षनेते पदावरील …
Read More »अजित पवार यांचे आश्वासन, दारूबंदीचे निवेदन मिळाल्यास योग्य ती कार्यवाही करणार भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिले आश्वासन
खारघर परिसरात प्रभागाकरिता दारूबंदी करण्याबाबत विहित प्रक्रियेनुसार निवेदन प्राप्त झाल्यास योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. खारघर परिसरातील दारू विक्री परवाना रद्द करून दारूमुक्त क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबत विधानसभा सदस्य प्रशांत ठाकूर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेत बोलत होते. अजित …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, भिवंडी शहरानजिकची अवैध गोदामे बंद करणार स्वतंत्र झोन तयार करणार आला, नियमित करण्याची संधी
भिवंडी शहर परिसरात ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून गोदामांसाठी स्वतंत्र झोन तयार करण्यात आला आहे. याशिवाय अन्य परिसरात जी गोदामे उभारण्यात आली आहेत, ती नियमित करण्यासाठी यापूर्वी संधी देण्यात आली आहे. ज्यांनी ती अद्यापही नियमित केली नसतील त्यांना सर्वेक्षणानंतर आणखी एक संधी देण्यात येईल, तथापि कोणतीही परवानगी न घेता उभारलेली आणि ती नियमित करुन न …
Read More »आमदार सतेज बंटी पाटील यांचा सवाल, नवीन खनिकर्म प्राधिकरणाचा घाट कशासाठी? सरकारने काही सूचना केल्या आहेत का ?
प्राधिकरणाच्या नावाने स्थानिक स्वराज्य संस्था खिळखिळी होत असताना गडचिरोली जिल्ह्यात नवीन खनिकर्म प्राधिकरणाचा घाट कशासाठी घातला जात आहे ? असा सवाल विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. आपला जुन्या व्यवस्थेवरील विश्वास उडाला आहे काय? या प्राधिकरणांना काही नविन अधिकार दिले आहेत का ? असा प्रश्नांचा भडीमारही आमदार …
Read More »उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल,.. भाजपा संपलेला भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावरून केली टीका
मराठी माणसांसोबत गुण्या गोविंदाने राहणाऱ्या अन्य भाषिकांनीही दोन्ही भाऊ एकत्र आल्याबद्दल आनंद व्यक्त करत तुम्ही चांगले केल्याचे असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या. परंतु भाजपाच्या बुडाला आग लागणे साहजिक आहे. भाजपाचे राजकारण तर तोडा, फोडा आणि राज्य करा असे झालेले आहे. लोकांच्या घरांच्या होळ्या पेटवायच्या त्यावर आपल्या राजकारणाची पोळी भाजून घ्यायच्या हाच …
Read More »
Marathi e-Batmya