महाराष्ट्रातील जनतेने भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांना मोठे बहुमत दिले असताना मुख्यमंत्री ठरवण्यात वेळ लागण्याची गरज नाही. भाजपा युतीला महाराष्ट्राच्या जनतेची चिंता नाही, महाराष्ट्र विकणारा व्यक्ती त्यांना हवा आहे म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाडक्या उद्योगपती मित्राच्या कागदपत्रांवर डोळे झाकून सही करणारा व्यक्तीच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर नेमला जाईल, त्यामुळे उशीर होत आहे, असे …
Read More »एकनाथ शिंदे बनले काळजीवाहू मुख्यमंत्री, संशयातीत बहुमतानंतरही अद्याप चर्चाच नियमानुसार विद्यमान राज्य मंत्रिमडळाने दिला राजीनामा
विद्यमान विधानसभेची मुदत संपत आली आहे. त्याचबरोबर विधानसभा निवडणूकीशी संबधित प्रक्रियाही पूर्ण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाचा राजीनामा देणे आवश्यक होते. त्यानुसार आज मंत्रिमंडळाचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री पदाचा एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यपाल सीपी राधाकृष्णन …
Read More »उद्धव ठाकरे यांचा टोला, काल झालेला स्फोट चार दिवस आधी झाला असता तर… मतमोजणीच्या एक दिवस आधीच भाजपाचा पदाधिकारी शिवसेना उबाठात
पंतप्रधान नरेद्र मोदी यांचे मित्र उद्योगपती गौतम अदानी यांच्या विरोधात अमेरिकन न्यायालयाने भारतीय अधिकाऱ्यांना लाच दिल्याच्या प्रकरणावरून अटक वॉरंट अमेरिकन न्यायालयाने काढले. त्यावरून देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. या प्रकरणावरून काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांकडून याप्रकरणी गौतम अदानी आणि भाजपावर टीका केली. याप्रकरणाला जवळपास दोन तीन दिवसाचा कालावधी उलटून गेल्यानंतर शिवसेना …
Read More »भाजपाचे केंद्रीय महामंत्री विनोद तावडे यांची काँग्रेस नेत्यांना नोटीस माफी मागा नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरे जा
नाला सोपारा येथील विवांता हॉटेलमध्ये विरारचे बहुजन विकास आघाडीचे प्रमुख तथा आमदार हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर यांनी धाड टाकत भाजपाचे नेते विनोद तावडे यांना पैशाच्या बॅगेसह पकडले. तसेच त्यांच्यावर असलेल्या बागेत पैशांची पाकिटे आणि दोन डायऱ्याही सापडल्या. त्यावरून राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी …
Read More »नाना पटोले यांचे सूचक विधान, मुंबईला लुटणाऱ्या उद्योगपती अदानीला…. नरेंद्र मोदींच्या मदतीने देशाला लुटणाऱ्या अदानीला अटक करण्याची राहुल गांधींची मागणी योग्यच
उद्योगपती गौतम अदानी यांनी कंत्राटे मिळवण्यासाठी २ हजार कोटी रुपयांची लाच दिल्याच्या आरोपावरून अमेरिकेच्या कोर्टाने अटक वॉरंट काढले आहे. ही केंद्रातील सरकारसाठी लाजिरवाणी घटना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मदतीने गौतम अदानींना देश विदेशात मोठ्या प्रमाणात कंत्राटे मिळवून देशाला लुटले आहे. भ्रष्टाचाराचे आरोप करून कोणतीही चौकशी न करता मोदी सरकारने …
Read More »अमेरिकन न्यायालयाच्या अटक वॉरंटनंतर राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधानांचे संरक्षण अदानीला चौकशी सर्वांची झाली पाहिजे पण त्याची सुरुवात अदानीपासून
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेतील सरकारी वकिलांनी भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना २,०२९ कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप केल्याने गुरुवारी राजकीय वादळ उठले, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्या तात्काळ अटकेची मागणी केली आणि आरोप केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लाचखोर आहेत. त्याचे “संरक्षण” अदानीला आहे . सोमवारपासून सुरू …
Read More »धुळ्यात पैसे वाटणाऱ्या भाजपा कार्यकर्त्याला वंचितने पकडत केले पोलिसांच्या हवाली पण पोलिसांचा भीमनगरभोवतीच बंदोबस्त वाढवला
धुळे शहरात मतदारांना पैसे वाटणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्याला वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. मात्र त्यानंतर पैसे वाटप करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी भीमनगर वस्तीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. अशा प्रकारे वस्तीच्या प्रवेशद्वारावर इतक्या मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा आणि गाड्या लागल्या मुळे मतदारांमध्ये दहशतीचे …
Read More »राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मतदारसंघात वसतिगृहातील विद्यार्थ्यानाच बनविले मतदार काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्याकडून विद्यार्थी मतदारांची मतदान केंद्रावरच तपासणी
विधानसभा निवडणूकीची घोषणा जाहिर झाल्यापासून अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघात विद्यमान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उमेदवारीची आणि त्यांच्या रणनीतीची चर्चा अहमदनगरसह संपूर्ण राज्यात सुरु झाली. त्यातच काँग्रेसकडून प्रभावती घोगरे यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. त्यामुळे काँग्रेसच्या प्रभावती घोगरे विरूद्ध राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यात सामना सुरुवातीला एककल्ली वाटत होता. मात्र आज …
Read More »नाना पटोले यांचा विश्वास, विधानसभेत काँग्रेसच एक नंबरचा पक्ष… बिटकॅाईन प्रकरणातील व्हायरल क्लिपमधील आवाज माझा नाही
विधानसभा निवडणुकीत जनतेचा दांडगा उत्साह दिसत असून महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता महाराष्ट्राच्या हिताचे सरकार निवडेल. राज्यातील जनतेचा प्रतिसाद पाहता काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून येईल. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार ही काळ्या दडगावरची रेष आहे, असा ठाम विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा …
Read More »राहुल गांधी यांचा खोचक सवाल, मोदीजी ५ कोटी कुणाच्या सेफमधून निघाले? भाजपाचे विनोद तावडे यांच्या पैसे वाटपाच्या मुद्यावरुन राहुल गांधी यांचा सवाल
विधानसभा निवडणूकीच्या मतदानासाठी आता काही तासांचा अवधी शिल्लक राहिलेला असताना भाजपाचे केंद्रीय महामंत्री अर्थात महासचिव विनोद तावडे यांच्याकडून नालासोपाऱ्यातील विवांता हॉटेलमध्ये ५ कोटी रूपयांचे वाटप करण्यात येत असल्याच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज बाहेर आले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यातच पाच कोटी वाटपाचे प्रकरणाची कुणकुण लागताच बहुजन विकास आघाडीचे प्रमुख …
Read More »
Marathi e-Batmya