राज्यातील विधानसभा निवडणूकांचा कालावधी जसजसा जवळ येत आहे. तसतसे राज्यातील सर्वच राजकिय पक्षांनी पक्ष बांधणी आणि मतदारांना बांधून ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सत्ताधारी पक्षाकडून आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जनतेला आकर्षित करण्यासाठी माझी बहिण लाडकी योजना सुरु केली. तर दुसऱ्याबाजूला शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. …
Read More »उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजपाच्या राजू शिंदे यांचा शिवसेना उबाठात प्रवेश छत्रपती संभाजी नगरमध्ये चंद्रकांत खैरे हे नेते
मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजी नगर येथील भाजपाचे स्थानिक पातळीवरील नेते राजू शिंदे भाजपा सोडून शिवसेना उबाठात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. त्या अनुषंगाने आज अखेर राजू शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केला. यावेळी राजू शिंदे यांच्यासोबत त्यांच्या समर्थकांनीही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाठात …
Read More »नाना पटोले यांचा टोला, ७० दिवसानंतर खरी मॅच सुरु होईल तेंव्हा… कॅच घेईल राज्यातील पोलीसही असुरक्षित, गृहमंत्र्यांच्या फक्त घोषणा, कृती मात्र शून्य
शिवसेना खासदार रविंद्र वायकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असताना मुंबई पोलिसांनी त्यांना क्लिन चीट देणे म्हणजे भाजपाच्या वॉशिंगमशीन मधून वायकरांना स्वच्छ केल्याचे आणखी एक प्रकरण आहे. मोदी सरकार हे ईडी व सीबीआय या दोन कार्यकर्त्यांच्या मार्फत राजकारण कसे करते हे देशाने पाहिले आहे. अशी एखादी घटना समजू शकतो पण अनेक …
Read More »अजित पवार यांचे अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर, हा निर्धाराचा अर्थसंकल्प हा अजित दादाचा वादा जिल्हा विकास निधीतून प्रत्येक जिल्ह्याला ई-पिंक रिक्षा
राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या योजनांसह नवीन योजनांच्या अंमलबजावणीसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. महिलांना स्वयंरोजगारासाठी ई-पिंक रिक्षा योजनेचा विस्तार, श्री ज्योतिबा मंदिर व परिसर विकास उत्कर्ष प्राधिकरणाची स्थापना, जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांचे समाधीस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे विकास आराखडा तयार करुन त्यास आवश्यक निधी, …
Read More »सुप्रिया सुळे यांचा सवाल, १५०० रुपयात काय येणार? सरकारकडून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हापासून महाराष्ट्राच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली आहे तेव्हापासून राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. ही जबाबदारी स्वीकारण्यात देवेंद्र फडणवीस पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. गुन्हे फक्त मोठ्या शहरांमध्ये वाढले नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्रात वाढले आहेत. हा माझा डेटा नाही, तो केंद्र सरकारचा डेटा आहे. देवेंद्र फडणवीस पूर्णपणे अपयशी गृहमंत्री असल्याची …
Read More »नाना पटोले याची मागणी, फेरीवाल्यांवर सुरु असलेली कारवाई तात्काळ थांबवा राज्य सरकारच्या उदासिनतेमुळे गरीब फेरीवाल्यांना आजही ठरतात कारवाईचे बळी
मुंबईसह राज्यातील इतर शहरात अंदाजे ३० लाख फेरीवाले आहेत, पण त्यांच्यासाठी ठोस धोरण नसल्याने आजही ते त्यांच्या हक्कांपासून वंचित आहेत. २०१४ साली लोकसभेने फेरीवाल्यांसदर्भात कायदा केला व सर्व राज्याने तशाप्रकारे फेरीवाला धोरण आखणे अपेक्षित होते. परंतु १० वर्षानंतरही राज्यात फेरीवाल्यांसाठी ठोस धोरण नाही. केवळ योजना नसल्याने फेरीवाल्यांना अमानुष वागणूक मिळते, …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, पीकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट पीकविम्यासाठी नोंद करावयाची महसूल विभागाची वेबसाईटच बंद
राज्यात मराठवाड्यासह विविध भागात दुष्काळ आहे, शेतकरी संकटात आहे असे असताना शेतकऱ्याला मदत मिळत नाही तर दुसरीकडे पिकविमा कंपन्या शेतकऱ्यांच्या जीवावर खिसे भरत आहेत. राज्यातील सरकार पीक विमा कंपन्यांबरोबर आहे, मोदींच्या मित्रोंबरोबर आहे. महसूल विभागाची वेबसाईट आजही बंद आहे, या बेवसाईटवर नोंद झाली नाही तर पीक विमा मिळत नाही. शेतकऱ्यांची …
Read More »विजय वडेट्टीवार यांची मागणी, जमिनी घशात घालणाऱ्या चोरांची चौकशी करा महायुतीने भ्रष्टाचार करून मुंबई साफ केली
राजरोसपणे मुंबई लुटली जात आहे. दुग्ध विकास विभागाची साडे आठ हेक्टर जागा अदानीच्या घशात घातली आहे. त्यामुळे मुंबईला अदानीपासून वाचवा असे आवाहन करत जमिनी घशात घालणाऱ्या चोरांची चौकशी करण्याची मागणी आज करत अदानी पूर्ण मुंबई साफ करीत आहे. अदानींना राज्याचे प्रमुख पाठीशी घालत आहेत असा हल्लाबोल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय …
Read More »दिलगिरीचे पत्र दिल्यानंतर अंबादास दानवे यांचा निलंबन कालावधी झाला कमी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत केला निर्णय जाहिर
संसदेचे सध्या अधिवेशन सध्या सुरु आहे. या अधिवेशाच्या सुरुवातीला राष्ट्रपतीचे भाषण झाले. राष्ट्रपतींच्या भाषणावरील चर्चेदरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणातील काही वक्तव्य केली. त्या वक्तव्याचे पडसाद सध्या राज्यातील विधिमंडळाच्या सुरु असलेल्या अधिवेशनात उमटले. त्यावरून भाजपाचे आमदार प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात …
Read More »मुंबईच्या अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत शुक्रवारी बैठक विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आदेश
मुंबईत कमी दाबाने आणि अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या तक्रारी वाढत असून मुंबईकर हैराण झाले आहेत. याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या दालनात शुक्रवारी तातडीची बैठक बोलावली आहे. आज विधानसभेत आज आमदार अॅड आशिष शेलार यांनी आपल्या वांद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्रातील खार दांडा, गझदरबांध आणि वांद्रे परिसरातातील पाणी पुरवठ्याच्या तक्रारी विधानसभेत …
Read More »
Marathi e-Batmya