Tag Archives: bjp

भाजपा म्हणते, राज्याच्या बदनामीचे कारस्थान कधीही यशस्वी होणार नाही

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणांतर्गत महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर करून राज्याला मोठी भेट दिल्याबद्दल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी व्यक्त केली. शिंदे – फडणवीस सरकारच्या नेतृत्वात राज्यात येणारी गुंतवणूक रोखण्यासाठी …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेबरोबर गेलेल्या बच्चू कडू आणि नाणार संदर्भात देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य बच्चू कडू मी फोनवर सांगितल्यानंतर ते शिंदेसोबत गेले

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकावित शिवसेनेतील ४० आमदारांबरोबरच शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या १० अपक्ष आमदारांनाही सोबत नेले. यात बच्चू कडू यांचाही समावेश होता. मात्र बच्चू कडू एकनाथ शिंदे यांच्याबरोबर कसे गेले याची माहितीच देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. त्याचबरोबर नियोजित नाणार प्रकल्पाबाबतही महत्वाचे …

Read More »

महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प गेल्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या, तूतू-मैमै करण्यापेक्षा.. मुख्यमंत्री शिंदेंनी सर्व पक्षिय बैठक बोलवावी

आधीच दोन मोठे प्रकल्प राज्यातून गुजरात गेल्यानंतर आज तिसरा उद्योग अर्थात सॅफ्रनचा प्रकल्पानेही आता महाराष्ट्राऐवजी हैद्राबादला पसंती दिल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली फारच सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. सुप्रिया सुळे म्हणाल्या, या सगळ्या घटनांवर …

Read More »

अरविंद सावंत म्हणाले, सरकार चालवायला लायक नाही हे सिध्द होतेय, सरळ…

वेदांत-फॉक्सकॉनपाठोपाठ टाटा-एअरबस सारखा मोठा आणि महत्वपूर्ण प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. त्यातच आता सॅफ्रन या विमान आणि रॉकेटसाठी इंजिन बनविणारी कंपनीचा नियोजित नागपूर मिहानमधून थेट हैद्राबाद येथे स्थलांतरीत झाल्याची माहिती हाती येत आहे. यापार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे गटाने यांच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी ठाकरे गटाचे खासदार …

Read More »

त्या दोन मोठ्या प्रकल्पानंतर आता सॅफ्रन पण महाराष्ट्राबाहेर

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विधासभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प आणणार असून राज्यात मोठी गुंतवणूक आणणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर काही दिवसांचा अवधी जात नाही. तोच वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाने गुजरातचा रस्ता धरला. त्यास काही दिवस जात नाहीत तोच टाटाचा एअर बस प्रकल्पही महाराष्ट्रातून बाहेर पडल्याची माहिती बाहेर आलेली असतानाच विमान …

Read More »

भाजपा सवाल, औरंगजेबी अपुर्ण स्वप्न पुर्ण करण्याची जबाबदारी घेतली का?

मराठी माणसावर कब्जा करण्याचे स्वप्न पाहतच औरंगजेब गाडला गेला, परागंदा झाला तेच औरंगजेबी अपुर्ण स्वप्न आज पुर्ण करण्याची जबाबदारी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाने घेतली आहे काय ? असा कडवा सवाल करीत भाजपा नेते आमदार ॲड आशिष शेलार यांनी करत जोरदार तोफ डागली. मुंबई भाजपा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार ॲड …

Read More »

छगन भुजबळ म्हणाले, दिवस येतात आणि जातात जरा धीर धरा… महाराष्ट्राला कमकुवत करण्याचा प्रयत्न;मात्र महाराष्ट्र कमकुवत होणार

महाराष्ट्र कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र महाराष्ट्र कमकुवत होणार नाही. दिल्लीला देखील आधार देण्याचं काम महाराष्ट्र करतो हे कुणीही विसरू नये अशी टीका करत महाराष्ट्र कधी झुकला नाही झुकणारही नाही. दिवस येतात आणि दिवस जातात जरा धीर धरा आपले दिवस परत येतील असा सबुरीचा सल्ला राज्याचे माजी मंत्री …

Read More »

प्रसाद लाड यांच्या आरोपावर सुभाष देसाई म्हणाले, खबरदार…

‘एअरबस- टाटा’ यांचा हवाई दलासाठी विमाननिर्मितीचा सुमारे २२ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरु आहे. भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी याचं खापर तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि महाविकास आघाडीवर फोडत सुभाष देसाई उद्योजकांकडून टक्केवारी घेत होते असा गंभीर आरोप केला. त्यांच्या या आरोपाला सुभाष देसाई …

Read More »

एकनाथ खडसे म्हणाले,..तर मी तुमच्या बोकांडी बसेन

भोसरी प्रकरणावरून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. खडसे यांचे विरोधक तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी भोसरी प्रकरण उचलून धरलं आहे. भोसरी प्रकरणावरून थेट विधिमंडळात चर्चा करण्याची मागणी महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यावरून एकनाथ खडसे यांनी …

Read More »

जयंत पाटील यांचा सवाल, अरे आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार?

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्य सरकारला नुकतेच तीन महिने पूर्ण झाले. या तीन महिन्यात पहिल्यांदा वेदांता-फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क आणि आता टाटाचा नागपूर येथील एअर बस प्रकल्प गुजरातला गेला. त्यावरून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठविली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही यासंदर्भात शिंदे-फडणवीस सरकारला …

Read More »