Tag Archives: bjp

पवारांच्या उपस्थितीतच गडकरी म्हणाले, “साखर कारखानदारीवर बंदी घालायला हवी” अहमदनगरमधील कार्यक्रमात पवार-गडकरी एकाच मंचावर

अहमदनगर : प्रतिनिधी सध्याच्या परिस्थितीत साखर कारखानदारी ही तोट्यातील असून आपल्याकडे साखरचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत आहे. तसेच साखरेचे उत्पादन होऊनही शेतकऱ्यांना योग्य पैसे मिळत नाहीत. त्यामुळे नव्या साखर कारखानदारींना बंदी घालायला पाहिजे अशी सूचना केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत केली. अहमदनगर महामार्ग प्रकल्पाचे उद्घाटनानिमित्त …

Read More »

आशिष शेलारांच्या टीकेला अजित पवारांचे प्रत्युत्तर मी कधीही अशा गोष्टीला महत्व देत नाही

पुणे: प्रतिनिधी आज त्यांचे सरकार नाही ही त्यांची खंत आहे. त्यांचे दुखणे इतकं मोठे आहे की त्यावर दुसरं काहीही न करता गरळ ओकायची सवय लागली आहे. त्यामुळे मी कधीही त्या गोष्टीला महत्व देत नाही असं सांगत आशिष शेलार यांनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले. महाविकासआघाडी सरकारमध्ये सुरू …

Read More »

शेलारांचा निशाणा, तीन पक्षाचं सरकार घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज पीएमआरडीएच्या प्रस्तावित आराखड्यात १ हजार कोटींचा घोटाळा

मावळ: प्रतिनिधी पीएमआरडीएच्या प्रस्तावित विकास आराखड्यात मावळ मधील शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात आरक्षणे टाकून आणि नामधारी शेतकरी “विकासकांची” आरक्षणे निवासी पट्टा म्हणून खुली करण्याचा डाव सुरु असून यात १ हजार कोटींचा घोटाळा करण्यात येतोय, असा गंभीर आरोप भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी मावळ येथे केला. तसेच राज्यातील तीन पक्षांच …

Read More »

फडणवीसांचे ‘मी पुन्हा येईन’ हे सत्यात कधी येईल किरीट सोमय्या यांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देणे गरजेचे नाही - जयंत पाटील

शिर्डी: प्रतिनिधी किरीट सोमय्या विरोधात आहेत त्यामुळे विरोधात बोलणे त्यांचे काम आहे, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणे गरजेचे नाही असे सांगत देवेंद्र फडणवीस यांचे “मी पुन्हा येईन” हे सत्यात कधी येणार असा सवाल करत याची माहिती आता माध्यमांनीच द्यावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील केले. …

Read More »

आधी मदत जमा करा, नंतर वरातीमागून घोडे नाचवून उपयोग नाही मराठवाड्याच्या दौऱ्यावर देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर

पुणे: प्रतिनिधी निसर्गवादळ असो वा तौक्ते चक्रीवादळ यावेळी राज्य सरकारकडून मोठ मोठ्या पॅकेजच्या घोषणा देण्यात आल्या पण आजही पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आपत्तीग्रस्तांना मदत मिळालेली नाही. त्यामुळे आता घोषणा खूप झाल्या, आता थेट मदतीची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत जमा व्हावी, ही मदत काही महिन्यानंतर नाही तर आता तातडीने करा …

Read More »

शेतकऱ्यांसाठी राज्यातील भाजपा नेत्यांनो, मोदींची भेट घ्या राज्य शासनाने ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी: नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी मराठवाड्यासह राज्यातील इतर भागात झालेल्या अतिवृष्टीने व पूराने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास या नैसर्गिक संकटाने हिरावून घेतला आहे. या संकटातून बळीराजाला उभे करण्यासाठी त्याला मोठ्या आधाराची गरज आहे. राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन तातडीने मदत करावीच त्याचबरोबरच केंद्र सरकारकडून भरीव मदत मिळवण्यासाठी राज्यातील …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, “व्वा रे बिट्या (किरीट सोमय्या) तुला कुणी सांगितलं ?…..” नरेंद्र मोदींनी लोकांना महागाईची एकप्रकारची सवयच लावली

अहमदनगर – पारनेर: प्रतिनिधी किरीट सोमय्या म्हणतात महाराष्ट्रातील अर्ध मंत्रिमंडळ हॉस्पिटलमध्ये तर अर्ध तुरुंगात जाईल. व्वा रे बिट्या तुला कुणी सांगितलं ? असा सवाल करतानाच ईडीची नोटीस येण्याआधी किरीट सोमय्या, चंद्रकांत पाटील यांना कसं कळतं? याचा अर्थ भाजपतर्फे तपास यंत्रणेचा गैरवापर केला जातोय असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या शब्दानंतर फडणवीस म्हणाले, “पोकळ शब्दांची नाही….” प्रत्यक्ष मदत देण्याची मागणी

मुंबई: प्रतिनिधी गुलाब चक्रीवादळामुळे विशेषत: मराठवाड्यात सतत दोन दिवस पडणाऱ्या पावसाचा फटका बसला असून येथील लाखो हेक्टर शेतजमिन पाण्याखाली गेल्याने हाताशी आलेली पीके गेल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपत्तीतून बाहेर काढणार असा शब्द देत धीर सोडू नका असे आवाहन केले. त्या आवाहनाचा धागा पकडत …

Read More »

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाचे समूळ उच्चाटन करा पालघर जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी काँग्रेस कट्टीबद्ध : नाना पटोले

पालघर : प्रतिनिधी काँग्रेसचा विचार हाच देशाला, संविधानाला व सर्व जातीधर्माच्या लोकांना तारणारा आहे. काँग्रेसला इतिहास आहे व भविष्यही आहे. परंतु भारतीय जनता पक्षाकडे इतिहासही नाही आणि भविष्यही नाही. भाजपाने देश विकायला काढला असून डॉ. बाबासाहेब आंबडेकरांनी दिलेले संविधानही बदलण्याचा घाट घातला आहे, अशा भाजपाचे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये समूळ उच्चाटन …

Read More »

भाजपामध्ये गेलेल्या लोकांना केंद्रीय एजन्सींचे संरक्षण आहे का?… राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा खोचक सवाल

अहमदनगर: प्रतिनिधी भाजपामध्ये गेलेल्या लोकांना सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग या एजन्सींचे संरक्षण आहे का? आम्ही अशा लोकांची यादी देतो त्यांच्यावर ईडी काय कारवाई करणार असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अहमदनगर येथे आले …

Read More »