पुणे: प्रतिनिधी अयोध्या येथील राम मंदिराच्या विरोधात सतत काही विरोधी मुद्दे उपस्थित करणे काँग्रेस आणि देशविरोधी शक्तींकडून चालू असताना, शिवसेनेने त्या सुरात सूर मिसळू नये. तुम्ही काही लिहिले तर रोषही व्यक्त करायचा नाही, अशी दंडुकेशाही चालणार नाही, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही शिवसेना भवनासमोर घडलेल्या प्रकारावरून शिवसेनेला दिला. …
Read More »फळबाग विमाचा पुढील २ वर्षाचा करार रद्द २०१९ च्या निकषाप्रमाणे नवीन निविदा काढाव्यात-डॉ. अनिल बोंडे यांची मागणी
मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रात उद्धवजी ठाकरे सरकारनी हवामानावर आधारित फळबाग विमा योजनाचे हवामानाचे निकष बदलवुन विमा कंपन्या सोबत २०२० ते २०२२ पर्यंत ३ वर्षाचा करार केला होता. या कराराने शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही फक्त कंपन्या मालामाल झाल्या. भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रान पेटविल्यानंतर शेवटी शासनाने माघार घेतली. आणि …
Read More »राम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने शिवसेनाभवनासमोर भाजपा-शिवसैनिकात राडा
मुंबई: प्रतिनिधी अयोध्येतील राम मंदीर जमिन खरेदीप्रकरणाची चौकशी मागणी केल्याच्या निषेधार्थ भाजपाने शिवसेनेच्या विरोधात आज फटकार मोर्चा काढला. मात्र शिवसैनिकांनीच भाजपा कार्यकर्त्यांना फटके लगावल्याचे दृष्य आज शिवसेना भवन परिसरात पहायला मिळाले. दरम्यान शिवसैनिक आणि भाजपा कार्यकर्त्ये आमने सामने आल्याने राडा होण्यास सुरुवात झाल्याने अखेर पोलिसांनी सौम्य लाठीमार करत कार्यकर्त्यांना पांगवत …
Read More »आशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे ? भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचा सवाल
मुंबई : प्रतिनिधी कोरोना विरुद्धच्या लढाईत आपल्या जीवाची पर्वा न करता योगदान देणाऱ्या ‘आशा’ सेविकांच्या जीवनाशी न खेळता सरकारने या कर्मचाऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी मंगळवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुख्य प्रवक्ते केशव …
Read More »पुरूषोत्तम रामाच्या नावाने चंदा, हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा दोन कोटींची जमीन काही मिनिटात १८.५ कोटींची कशी झाली ? सचिन सावंताचा सवाल
मुंबई: प्रतिनिधी अयोध्येत श्रीराम मंदिर निर्माणासाठी जमीन संपादनाच्या कामात घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. दोन कोटी रुपयाची जमीन अवघ्या काही मिनिटातच १८.५ कोटी रुपयांना विकत घेऊन मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या नावावर सर्व मर्यादा सोडून लज्जाहिनतेने भाविकांच्या श्रद्धेशी चालवलेला हा खेळ आहे. भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने रामाच्या नावावर लोकांच्या …
Read More »उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शुल्क समितीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा आ. भातखळकर यांच्या जनहित याचिकेवर आदेश
मुंबई: प्रतिनिधी कोरोना काळात फी वाढ व सक्तीची फी वसुली करण्यास मनाई असताना सुद्धा अनेक शाळांनी अवाजवी फी वाढ करत सक्तीची फी वसुली चालवली आहे, तसेच वेळेत फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू न देण्याचा प्रकार अनेक शाळांनी चालविला. याविरोधात भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे अतुल भातखळकर यांनी दाखल …
Read More »‘One Earth One Health’ आरोग्य सेवेची चांगली संकल्पना परंतु मिळणार कधी? राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा सवाल
मुंबई : प्रतिनिधी जी-७ मध्ये असलेल्या देशांसारखी आरोग्य सेवा आपल्या देशात ‘वन अर्थ वन हेल्थ’ यातून देण्याची संकल्पना पंतप्रधानांनी मांडलीय. परंतु ही सेवा किती दिवसात मिळणार याची वाट पहावी लागेल अशी खोचक टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. शनिवारी जी-७ च्या बैठकीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे …
Read More »प्रशांत किशोर- शरद पवार यांची भेट: नव्या निवडणूक रणनीतीची नांदी पण काहीकाळ वाट पहावी लागणार
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची ओळख ही खरी तर दिल्लीच्या तक्ताला धडका मारणारा नेता अशीच आहे. त्यानंतर गुढ राजकिय व्यक्तीमत्व आणि बदलत्या परिस्थितीवर मात करत स्वत:चे वेगळे अस्तित्व टिकवून ठेवणारा नेता, दूरदृष्टीचा नेता म्हणून ही सबंध देशभरात ओळखले जाते. निवडणूकीच्या आधीच राज्यात काय वारे वहातेय अंदाज …
Read More »कोरोना काळातील अपयश झाकण्यासाठीच भाजपाचे योगी विरूध्द मोदीचे चित्र राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका
मुंबई: प्रतिनिधी काही दिवसापासून मोदी आणि योगी यांच्यामध्ये मतभेदाचे वातावरण असल्याच्या बातम्या देशात आणि उत्तर प्रदेशमध्ये येत आहेत. परंतु कोरोना काळातील अपयश झाकण्यासाठी भाजपची ही ठरवून केलेली रणनीती असल्याची पोलखोल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. कोरोना काळात उत्तरप्रदेशमधील गंगा नदीत कोरोना बाधित लोकांचे मृतदेह फेकण्यात …
Read More »चंद्रकांत पाटलांची शिवसेनेला पिंजऱ्यातील वाघाची उपमा वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया
पुणे: प्रतिनिधी आमची दोस्ती जंगलातील वाघाशी होते. पिंजऱ्यातील वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याबाहेर बाहेर होता तोपर्यंत दोस्ती होती. आता तो पूर्णपणे पिंजऱ्यामध्ये आहे, अशी उपरोधिक उपमा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नामोल्लेख टाळत उत्तर दिले. मुंबईत बुधवारी पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचून लोकांचे प्रचंड हाल झाले. त्याविषयी …
Read More »
Marathi e-Batmya