Tag Archives: bjp

नाना पटोले यांचा सवाल, आणखी किती मृत्यू होण्याची वाट भाजपा सरकार पाहणार आहे? महिनाभरात ८ मृत्यू होऊनही राज्य सरकारला जीबीएस आजाराचे गांर्भीय नाही

राज्यात जीबीएस GBS चा पहिला रुग्ण सापडून एक महिना झाला आणि या एका महिन्यात या आजाराने ८ मृत्यू झाले आहेत. या आजाराचे रुग्ण आता मुंबईतही सापडू लागले आहे परंतु राज्य सरकार मात्र या आजाराकडे फारसे गांभिर्याने पहात असल्याचे दिसत नाही, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी …

Read More »

५० लाख सदस्यांसाठी चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण महाराष्ट्र दौऱ्यावर येत्या १५ दिवसांत भाजपा करणार ५० लाख सदस्यांची नोंदणी

संघटन पर्वाअंतर्गत महाराष्ट्र भाजपाने १ कोटी सदस्य नोंदणीचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. येत्या १५ दिवसांत आणखी ५० लाख सदस्य नोंदवून दीड कोटी सदस्य नोंदणीचे लक्ष्य साध्य केले जाईल, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी व्यक्त करत यासाठी आपण १३ फेब्रुवारीपासून कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासमवेत राज्याचा दौरा करणार …

Read More »

आमदार सुरेश धस यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणी लॉन्ग मार्च स्थगितीमुळे भीम आर्मी संतप्त

परभणीतील हिंसाचारानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. या प्रकरणातील गुन्हे दाखल करण्याची मागणी संयुक्तिक होणार नाही, असे सुरेश धस यांनी म्हटले होते. यावरून आंबेडकरी जनतेत तीव्र संताप व्यक्त होत असून सदर प्रकरणी आमदार सुरेश धस यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भीम आर्मीने केली आहे. परभणी संविधान …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, ‘मुंबई भारताची ‘कन्व्हेन्शन कॅपिटल’ ताज समुहाच्या नव्या ताज बॅण्डस्टॅण्ड हॉटेलचे भूमिपूजन

मुंबई ही भारताची ‘कन्व्हेन्शन कॅपिटल’ म्हणून उदयास येत आहे. बांद्रा परिसरात ‘ताज’ ग्रुपच्या नव्या आणि अत्याधुनिक हॉटेलमधील आधुनिक कन्व्हेन्शन सेंटरमुळे मुंबईतील व्यावसायिक संधी अधिक वाढतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ‘ताज’ ग्रुपच्या बांद्रा परिसरातील नव्या आणि अत्याधुनिक हॉटेलचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी …

Read More »

मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंग यांचा २१ महिन्यानंतर पदाचा अखेर राजीनामा जातीय हिंसाचार रोखण्यात अपयश आल्याने भाजपा आमदार आक्रमक

मणिपूरमध्ये सुरू असलेल्या जातीय संघर्षाला एकवीस महिने उलटून गेल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी रविवारी संध्याकाळी इंफाळमध्ये राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. बीरेन सिंग शनिवारी संध्याकाळी इम्फाळहून दिल्लीसाठी निघाले होते – या आठवड्यात राष्ट्रीय राजधानीचा असा दुसरा प्रवास – शनिवारी संध्याकाळी. मंत्रिमंडळातील कोणत्याही सहकाऱ्याशिवाय त्यांनी हा …

Read More »

नाना पटोले यांनी कागदपत्रे दाखवत मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले चौकशीचे आव्हान कृषी विभागातील भ्रष्टाचारांची सखोल चौकशी करण्याचे धाडस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दाखवावे.

देशातील सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत असताना भाजपा युतीचे सरकार मात्र त्याकडे गांभिर्याने पहात नाही. शेतकऱ्यांना भरघोस निधी दिल्याच्या घोषणा करून फक्त जाहिरातबाजी करण्यात आली. सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या निधीवर मात्र कृषी विभागातील अधिकारी व मंत्री संगनमताने खिसे भरत राहिले. शेतकऱ्यांच्या नावावर कृषी विभागाने नॅनो युरीया व नॅनो डीएपी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, २०१९ च्या निवडणूकीपूर्वीच उद्धव ठाकरे आघाडीत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मी फोन केला होता

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा आणि अविभाजित शिवसेना यांच्यातील प्रदीर्घ युती तुटल्याबद्दल बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी आरोप केला की उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याशी आघाडी केली होती. त्यामुळे राज्यात भाजपा-शिवसेनेचे सरकार येऊ शकले नाही. “तुम्हाला (उद्धव ठाकरे) बंद दरवाजाआड मुख्यमंत्री बनवले जाईल, असे …

Read More »

अंजली दमानिया यांचा सवाल, देशमुख कुटुंबियांना न्याय मिळणार की नाही…. दोन मोबाईल मिळाले, त्यातील डेटा रिट्राईव्ह करायला किती वेळ लागणार

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेला आज दोन महिने झाले. या दोन महिन्यांनंतर देशमुख कुटुंबियांना न्याय मिळणार आहे की नाही असा संशय निर्माण होत आहे. जे दोन मोबाईल मिळाले, त्या मोबाईलमधून डेटा रिट्राईव्ह करण्यात आला की नाही की त्यात मोठ्या नेत्याचा आवाज असल्याने त्या मोबाईलबाबतची माहिती लपविली जातेय अशी …

Read More »

पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांचे नवे आदेशः फाईल थेट पाठवा फाईली थेट राज्यपालांच्या मंजूरीसाठी पाठवा

दिल्लीत भाजपा २७ वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा सत्तेत येणार असल्याचे चित्र स्पष्ट होत असतानाच पंजाबमधील आम आदमी पार्टीच्या सरकारला लक्ष्य करण्यास केंद्रातील भाजपा सरकारने सुरुवात केली आहे. तत्कालीन राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्यानंतर त्यांच्या ठिकाणी राज्यपाल पदावर आलेल्या गुलाबचंद कटारिया यांनी आज नवे आदेश जारी केले असून राज्य सरकारने (प्रशासनाने) राज्य मंत्रिमंडळाच्या …

Read More »

नाना पटोले यांची टीका, लाडक्या बहिणींच्या तीन भावांची महाराष्ट्रातील लाखो बहिणींशी गद्दारी योजना सुरु करतानाच निकष लावण्याचे शहाणपण का सुचले नाही? अपात्र ठरवून लाखो बहिणींनी घोर फसवणूक.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्ष महायुतीने राज्यातील लाखो माता भगिनींची घोर फसवणूक केली आहे. मतांसाठी सरसकट सर्व बहिणींना १५०० रुपये देऊन त्यांची मते घेतली व सत्तेवर आल्यानंतर मात्र या बहिणींना दिलेल्या मदतीला कात्री लावण्याचे पाप केले जात आहे. सरकारने ५ लाख बहिणींना अपात्र केले असून …

Read More »