मुस्लिम कंत्राटदारांना निविदांमध्ये ४% आरक्षण देण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयामुळे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. भाजपाने काँग्रेसवर “तुष्टीकरणाचे राजकारण” केल्याचा आरोप केला आहे आणि राहुल गांधी यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयावर प्रभाव पाडल्याचा आरोप केला आहे. “कर्नाटक सरकारचा मुस्लिमांसाठी ४% आरक्षणाचा प्रस्ताव राहुल गांधींच्या पूर्ण पाठिंब्याने मंजूर करण्यात आला आहे. आम्ही हे …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका,… फडणवीसांच्या मंत्रिमंडळात एक एक मंत्री एक एक नमुना सभ्यता, संस्कृती व लोकशाहीची मुल्ये जोपासलेल्या सिंधुदुर्गात आता ‘हम करो सो कायदा’ म्हणणारे लोक
महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही, सत्ताधारी पक्षातील लोक दहशत निर्माण करत आहेत. संसदीय लोकशाहीची पायमल्ली केली जात आहे. जाती धर्मातील एकोप्याची भावना नष्ट केली जात आहे. आज विविधतेत एकता या मुळ गाभ्याला धोका निर्माण झाला आहे. देवेंद्र फडणवीस हेकेखोर पद्धतीने राज्यकारभार हाकत असून त्यांच्या मंत्रिमंडळात एक एक मंत्री एक एक …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, सौर ऊर्जेच्या वापरामुळे दर्जेदार आरोग्य सुविधांची उपलब्धता 'सेल्को फाउंडेशन'च्या सहकार्याने १८ जिल्ह्यांत प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सौर ऊर्जाकरण
पारंपरिक ऊर्जा स्त्रोत हे मर्यादीत असल्यामुळे यापुढील काळात अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांवरच अधिक भर द्यावा लागणार आहे. अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राला प्रोत्साहन देऊन अधिकाधिक ऊर्जा निर्मिती करण्याची शासनाची भूमिका आहे. राज्यात अपारंपरिक ऊर्जेच्या उपयोगासाठी सेल्को फाउंडेशन कार्यरत आहे. फाउंडेशनच्या सहकार्याने राज्यातील १८ जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सौर ऊर्जाकरण करण्यात येणार असून सध्या …
Read More »रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणी रोहिणी खडसेंचा संताप, नेमका आका कोण? छेडछाडीच्या घटनेस १० दिवस झाले तरी तीन आरोपी अद्यापही फरारच
केंद्रीय राज्यमंत्री तथा एकनाथ खडसे यांची स्नुषा रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्या प्रकरणी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी स्वतः पोलिस स्टेशनला जात पोलिसांत जाऊन तक्रार नोंदविली. मात्र त्यानंतर थोडी हालचाल होत एकाला अटक करण्यात आले. मात्र अद्यापही तीन आरोपी फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर रक्षा खडसे यांच्या …
Read More »पानिपत येथे “मराठा शौर्य स्मारक” उभारण्याचा शासन निर्णय जारी मंत्री ॲड. आशिष शेलार यांची माहिती
पानिपतच्या “काला अंब” परिसरात मराठा शौर्य स्मारक उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या स्मारकाच्या माध्यमातून मराठा साम्राज्याच्या ऐतिहासिक पराक्रमाचे स्मरण आणि सन्मान करण्यात येणार आहे, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले. मंत्री ॲड. शेलार म्हणले की, पानिपतच्या तिसऱ्या लढाईला ३५४ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त १४ जानेवारी, २०२५ रोजी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मारकाच्या …
Read More »तामीळनाडू आणि केंद्र सरकार यांच्यातील भाषिक वाद वाढला, रूपयाचे चिन्हच बदलले रूपयाचे नवे चिन्ह तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी जाहिर केले चिन्ह
१४ मार्च रोजी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी, तामिळनाडू सरकारने त्यांच्या लोगोमध्ये देवनागरी रुपया चिन्हाच्या जागी तमिळ रुपया अक्षराचा वापर केला आहे. ‘एलोर्ककुम एलाम’ (सर्वांसाठी सर्वकाही) असे लिहिलेला हा लोगो गुरुवारी दुपारी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या कार्यालयाने प्रसिद्ध केला. गेल्या वर्षी, तथापि, त्याच लोगोमध्ये देवनागरी लिपीत रुपया चिन्ह होते. सीएमओमधील …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, निविदेत घोटाळा असल्याचे लक्षात येताच रद्द, चौकशी करणार एका महिन्यात चौकशी पूर्ण केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल
एसटी महामंडळाने मध्यंतरी एसटी बसेस भाड्याने घेण्याबाबतचा निर्णय घेतला. तसेच त्यासंदर्भातील जी निविदा काढण्यात आली आणि त्यासंदर्भातील वर्क ऑर्डरचे आदेश मागीलवेळी उपमुख्यमंत्र्यांनी दिले होते. तसेच ही निविदा प्रक्रिया नियमानुसार असल्याचे सभागृहात सांगितले. मात्र आता विद्यमान मुख्यमंत्री त्यासंदर्भात स्थगिती आदेश देत आहेत असा मुद्दा विधान परिषदेत शिवसेना उबाठाचे अनिल परब यांनी …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४’ लवकरच जाहीर करणार शिफारस प्रस्तावावर अंतिम निर्णय विचारविनिमय करूनच
‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४’ साठी राज्यातून प्राप्त शिफारस प्रस्तावातील सर्व मान्यवरांचे महाराष्ट्रासाठी अत्यंत मोलाचे योगदान आहे. ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४’ अंतिम निर्णय हा सर्व संबंधितांशी विचारविनिमय करून लवकरच जाहीर करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विधानभवन येथे ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४’ निवड समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप,…महाराष्ट्राचा तालीबान करण्याचा भाजपाचा डाव धार्मिक विष कालवणाऱ्या नितेश राणेंना मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आहे का?, नसेल तर तात्काळ हकालपट्टी करा
महाराष्ट्राला महान साधू संत व महापुरुषांचा जाज्वल्य इतिहास आहे. पण एका विशिष्ट विचारसरणीचे लोक जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवून, इतिहासाचे विद्रूपीकरण करून वातावरण दुषीत करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. महाराजांनी कधीही कोणाचा द्वेष केला नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव घेऊन महाराष्ट्राच्या सामाजिक …
Read More »शक्तीपीठ महामार्गाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांचे वक्तव्य, समर्थनार्थ मोठा मेळावा होणार विरोधी पक्षननेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत मुद्दा उपस्थित करताच मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य
राज्यातील देवस्थानांना जोडणारे रस्ते आधीच चांगल्या आणि सुस्थितीत असताना पुन्हा एकदा शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला जात आहे. हा मार्गमार्ग १२ जिल्ह्यातून जाणार असून या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा मोठा विरोध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध असतानाही शक्तीपीठ महामार्ग मोठ्या प्रमाणावर रेटला जात आहे. आजच्या मोर्चात फक्त कोल्हापूरचे शेतकरी आले आहेत. मात्र भविष्यकाळात …
Read More »
Marathi e-Batmya