मुंबई : प्रतिनिधी मागील पाच वर्षात माझ्या सरकारने दुप्पट काम केले आहे. त्यावर कुठल्याही व्यासपीठावर चर्चा आणि वाद- विवाद करायला तयार असल्याचे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विरोधकांना दिलेले आव्हान काँग्रेस नेते नाना पटोले यांनी स्विकारले आहे. तसेच या चर्चेसाठी आणि वाद-विवादासाठी मुख्यमंत्र्यांनी तारीख व वेळ ठरवावी असे प्रति …
Read More »आरक्षण कपातीचा निर्णय रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू भाजप-शिवसेना सरकारने ओबीसींच्या हक्कांवर गदा आणल्याचा विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचा आरोप
मुंबईः प्रतिनिधी इतर मागासवर्गीयांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये असलेल्या सध्याच्या २७ टक्के आरक्षणात बदल करून त्यांचे राजकीय प्रतिनिधित्व कमी करण्याचा घेतलेला निर्णय हा ओबीसींच्या हक्कांवर गदा आणणारा आहे. हा आरक्षण कपातीचा निर्णय रद्द करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला. जिल्हा परिषद, पंचायत समित्या तसेच ग्रामपंचायतींमध्ये …
Read More »निवडणूक न लढविणारे ईव्हीएमवर बोलतायत शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांचा राज ठाकरेंना टोला
मुंबईः प्रतिनिधी जे कधी घराच्या बाहेर पडले नाहीत, ते आता कोलकात्यापासून लोकांच्या फ्लॅटवर जाऊ लागले आहेत. या पत्रकार परिषदेतील काही नेते ईव्हीएम बाबत बोलत आहेत. त्यांनी कधीच निवडणूक लढवलेली नाही. ज्यांनी कधी निवडणूक लढवली नाही त्यांनी आधी निवडणूक लढवून दाखवावी. तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत ज्यांनी निवडणूकच लढविली नाही त्यांनी …
Read More »ईव्हीएम विरोधात २१ ऑगस्टला विरोधात मोर्चा विरोधकांचा एल्गार
मुंबईः प्रतिनिधी ईव्हीएमविरोधात शंका उपस्थित करत आगामी विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या अशी मागणी करत येत्या २१ ऑगस्ट २०१९ रोजी मुंबईत सर्वपक्षीय मोर्चा निघणार असल्याची माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. वांद्रे येथे झालेल्या पत्रकार परिषदेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, स्वाभिमानी पक्षाचे …
Read More »आधी आम्ही भाजपची बी टीम आहोत का सांगा, मगच आघाडी अँड. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला सुनावले
मुंबई: प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने समविचारी पक्षांची आघाडी करण्याबाबत काँग्रेस पक्षाकडून वंचित बहुजन आघाडीला पत्र पाठविले. मात्र लोकसभा निवडणूकीत भाजपची बी टीम म्हणून आमच्यावर आरोप करण्यात आला. त्याअनुषंगाने वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम आहे का? याचे उत्तर काँग्रेसने द्यावे त्यानंतरच त्यांच्यासोबत आघाडी करण्याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे वंचित आघाडीचे …
Read More »अशोक चव्हाण मुख्यमंत्री फडणवीसांना म्हणतात शिबीरे घ्या पीक विम्याच्या तक्रार निवारणासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
मुंबई : प्रतिनिधी पीक विम्याची नुकसान भरपाई न मिळाल्याच्या बहुसंख्य शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्य सरकारने गावोगावी शिबिरांचे आयोजन करावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून पीक विमा योजनेसंदर्भात राज्यभरातून शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत. पिकांचे प्रचंड …
Read More »अखेर राजे, पिचड, नाईक आणि कोळंबकर भाजपात मुख्यमंत्री फडणवीस, अध्यक्ष पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश
मुंबई : प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेवून स्वतःचे राजकिय भवितव्य टिकविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवेंद्रराजे भोसले, वैभव पिचड, संदीप नाईक आणि काँग्रेसचे कालिदास कोळंबकर या माजी आमदारांसह राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह नवी मुंबईतील काही नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गरवारे क्लब येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि …
Read More »महाजनादेश यात्रा काढणाऱ्यांनो आधी पाच वर्षाचा हिशोब द्या जनतेला फसविल्याचा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा आरोप
मुंबईः प्रतिनिधी भाजप-शिवसेना सरकारने पाच वर्षात काहीही काम केले नसल्यामुळेच यात्रा काढून न केलेल्या कामाची दवंडी पिटण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. या सरकारने राज्यातील जनतेची दिशाभूल करुन केवळ फसवणूकच केली आहे. या फसवणुकीचा हिशोब त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर टीका …
Read More »राष्ट्रवादीचे राजे, पिचड, नाईक आणि काँग्रेसच्या कोळंबकरांचे राजीनामे भाजप प्रवेशाचा कार्यक्रम लवकरच
मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी समजूत काढूनही सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आपल्या आमदाराकीचा राजीनामा दिला. त्याच्यासोबत राष्ट्रवादीचे वैभव पिचड, ऐरोलीचे आमदार संदीप नाईक आणि काँग्रेसचे आमदार कालीदास कोळंबकर यांनी आमदारकीचे राजीनामे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केले. विशेष म्हणजे यापैकी वैभव पिचड, संदीप नाईक आणि …
Read More »गहूंजे बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींच्या फाशीला विलंब कोणामुळे ? दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाईची विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांची मागणी
मुंबईः प्रतिनिधी पुण्यातील गहूंजे येथील बलात्कार व हत्या प्रकरणातील दोन दोषींना सुनावलेल्या फाशीची अंमलबजावणी करण्यात अक्षम्य दिरंगाई केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाला फाशी रद्द करुन जन्मठेप द्यावी लागणे, हे राज्य सरकारचे मोठे अपयश आहे. फाशीच्या अंमलबजावणीस दोन वर्ष घालवणारे प्रशासन झोपा काढत होते का? असा संतप्त सवाल करत सरकारने तात्काळ चौकशी …
Read More »
Marathi e-Batmya