Tag Archives: congress

मुख्यमंत्री महोदय…महाराष्ट्रातील जनतेची मरणं तरी गांभीर्याने घ्या केवळ १० किलो धान्याचा आदेश हि पुरग्रस्तांची थट्टा असल्याचा नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप

मुंबई : प्रतिनिधी माझ्या वक्तव्यांना तुम्ही गांभीर्याने घेत नसाल तरीही त्याचे स्वागत करतो. मात्र तुमच्यापुढे सनदशीर मार्गाने मांडलेली राज्याची वास्तविक पुरपरिस्थिती तरी गांभीर्याने घ्या, ते ही जमत नसेल तर पुरात वाहून जाणाऱ्या जिवांना तरी तुमच्या गांभीर्याने घेण्याचा निकष लागु होतो का ?ते सांगा. किमान ज्या राज्याने तुम्हाला मुख्यमंत्रीपदावर बसविले त्या …

Read More »

राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्राने तात्काळ ४ हजार कोटीं द्यावे पूरग्रस्त भागात मदत व बचावकार्यासाठी लष्कराला पाचारण करण्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील पूरग्रस्त भागातील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. प्रशासन व एनडीआरएफ हे बचावकार्य करण्यात अपुरे पडत आहेत. त्यामुळे सरकारने पूरग्रस्त भागात मदत बचावकार्यासाठी लष्कराला पाचारण करावे व केंद्र सरकारने तातडीची मदत म्हणून महाराष्ट्राला चार हजार कोटी रूपये द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात …

Read More »

राज्यातील पूरस्थिती हाताळण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या बहुतांश भागामध्ये अभूतपूर्व पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शहरांमध्ये आणि गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने हजारो लोक बेघर झाले आहेत. आतापर्यंत पूरामुळे १६ नागरिकांचा बळी गेला आहे. लाखो जनावरे वाहून गेली आहेत. पूरपरिस्थिती हाताळण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. सरकारने कुठलाही राजकीय अभिनिवेश न बाळगता पूरस्थिती हाताळण्यासाठी सर्वपक्षीय …

Read More »

यात्रा काढा; पण राजधर्म विसरू नका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा उपरोधिक सल्ला

मुंबई : प्रतिनिधी मते मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हव्या तेवढ्या यात्रा काढाव्यात. पण यात्रेच्या नादात राजधर्म विसरून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये. आणखी कोणत्याही शेतकऱ्यावर धर्मा पाटील होण्याची दुर्दैवी वेळ आणू नका असा उपरोधिक सल्ला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारला दिला. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा अकोल्यात येण्याच्या आदल्याच दिवशी जिल्ह्यातील सहा …

Read More »

पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांना १० लाखाची मदत द्या तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची वडेट्टीवार यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी मराठवाडा व विदर्भातील काही भाग वगळता राज्याच्या इतर भागात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. या महापुरामुळे शेतमालासह खाजगी संपत्तीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन विनाविलंब नुकसान भरपाई द्यावी तसेच पूरग्रस्त …

Read More »

पंतप्रधान मोदी यांनी कौतुक करूनही शेतकऱ्याने केली आत्महत्या अकोल्यातील घटनेवरून अशोक चव्हाण यांची भाजप सरकारवर टीका

मुंबई: प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात मधून जाहीर कौतुक केलेले शेतकरी मुरलीधर राऊत यांच्यावर राज्यातील फडणवीस सरकारच्या अनास्थेमुळे आत्महत्येची वेळ यावी, हा प्रकार भाजप सरकारसाठी लज्जास्पद असल्याची संतप्त टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. यातून सरकारची शेतकऱ्यांप्रती निष्क्रियता आणि उदासीनता चव्हाट्यावर आल्याचा आरोपही त्यांनी केला. राष्ट्रीय महामार्गात …

Read More »

राज्यात भयंकरस्थिती तर मुख्यमंत्री मत मागतायत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य सचिव अजोय मेहता यांची भेट

मुंबई: प्रतिनिधी गेल्या पाच सहा दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे भयंकर पूरस्थिती निर्माण झालेली आहे. अनेक गावेच्या गावे, घरे, संसार, शाळा, कॉलेजेस, रस्ते सर्वच उध्वस्त झालेले आहे. सगळीकडे पाणीच पाणी साचल्याने महाराष्ट्रातील जनता भयभीत झालेली आहे. महाभयंकर परिस्थिती ओढवली आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, पालघर, पनवेल, संपूर्ण कोकण, नाशिक, …

Read More »

आदिवासी विभागातील साहित्य खरेदीत करोडो रुपयांचा घोटाळा उच्चस्तरीय चौकशी करून घोटाळेबाजांवर कारवाई करण्याची वडेट्टीवारांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठीच्या साहित्य खरेदीत घोटाळा करुन राज्याची जवळपास ६० ते ७० कोटी रुपयांची लूट केली आहे, असा आरोप करुन विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली. राज्यातील ५०२ आश्रमशाळामधील २ लाख विद्यार्थी तसेच वसतीगृहातील ५८ …

Read More »

मुख्यमंत्री महोदय, चर्चेसाठी तारीख आणि वेळ ठरवा मुख्यमंत्र्यांचे आव्हान काँग्रेस प्रचार समितीप्रमुख नाना पटोलेंनी स्वीकारले

मुंबई : प्रतिनिधी मागील पाच वर्षात माझ्या सरकारने दुप्पट काम केले आहे. त्यावर कुठल्याही व्यासपीठावर चर्चा आणि वाद- विवाद करायला तयार असल्याचे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विरोधकांना दिलेले आव्हान काँग्रेस नेते नाना पटोले यांनी स्विकारले आहे. तसेच या चर्चेसाठी आणि वाद-विवादासाठी मुख्यमंत्र्यांनी तारीख व वेळ ठरवावी असे प्रति …

Read More »

आरक्षण कपातीचा निर्णय रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू भाजप-शिवसेना सरकारने ओबीसींच्या हक्कांवर गदा आणल्याचा विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी इतर मागासवर्गीयांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये असलेल्या सध्याच्या २७ टक्के आरक्षणात बदल करून त्यांचे राजकीय प्रतिनिधित्व कमी करण्याचा घेतलेला निर्णय हा ओबीसींच्या हक्कांवर गदा आणणारा आहे. हा आरक्षण कपातीचा निर्णय रद्द करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला. जिल्हा परिषद, पंचायत समित्या तसेच ग्रामपंचायतींमध्ये …

Read More »