Tag Archives: election commission of india

राहुल गांधी यांचा सवाल, महाराष्ट्रात मतदारांपेक्षा मतदान जास्त कसे पहिल्यांदाच राहुल गांधी शिवसेना उबाठाचे संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे एकत्रित पत्रकार परिषदेला सामोरे

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तम जानकर यांच्याकडून त्यांच्या मतदारसंघासह राज्यातील सर्वच मतदार संघातील निवडणूक निकालाबाबत संशय उपस्थित करण्यात येत आहे. तसेच पुर्ननिवडणूकीची मागणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर काँग्रेस आणि शिवसेना उबाठा पक्षाकडून यासंदर्भात सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. तसेच भाजपाला मिळालेल्या …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाची त्या दुरुस्तीवरून केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस निवडणूकीशी संबधित कागदपत्रे आणि माहिती पाहता येणार नसल्याच्या याचिकेवर नोटीस जारी

निवडणुकांशी संबंधित नोंदी मिळविण्याच्या लोकांच्या अधिकारावर बंधने घालणाऱ्या निवडणूक आचार नियम, १९६१ मधील सुधारणांना आव्हान देणाऱ्या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि भारतीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयात ही याचिका आरटीआय कार्यकर्त्या अंजली भारद्वाज यांनी दाखल केली आहे. ज्या गेल्या अनेक दशकांपासून पारदर्शकता आणि जबाबदारीच्या मुद्द्यांवर काम करत …

Read More »

निवडणूक कारभार आणि संशयातीत प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी काँग्रेसची ईगल समिती महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीतील मतदार यादीच्या घोळासह, आगामी आणि पूर्वीच्या निवडणूकांचा अभ्यास करणार

काही महिन्यापूर्वी महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीपाठोपाठ विधानसभा निवडणूका झाल्या. लोकसभा निवडणूकीत राज्यात काँग्रेस पक्षाला चांगल्यापैकी यश मिळाले. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणूकीत अपेक्षे इतके यश काँग्रेसला मिळू शकले नाही. त्यातच विधानसभा निवडणूकीच्या मतदानाच्या दिवशी वाढलेल्या मतांच्या वाढीव टक्केवारीवरून सातत्याने संशय व्यक्त करण्यात येत असून या निवडणूकीसह यापूर्वी झालेल्या निवडणूका आणि आगामी …

Read More »

नाना पटोले यांची टीका, झोपेचे सोंग घेतलेल्या निवडणूक आयोग व सरकारला जागे करा सरकारचे बगलबच्च्यांच्या साखर कारखान्यांना १०० कोटींचे व्याज माफ पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीस पैसे नाहीत

लोकांनी लोकांसाठी निवडून देण्याच्या लोकशाही व्यवस्थेलाच निवडणूक आयोग व भाजपा सरकारने बगल देत मतदारांच्या मतदानावर दरोडा टाकण्याचे काम केले आहे, हा प्रकार लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. आपल्या पूर्वजांनी बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळवले व लोकशाही व संविधान दिले त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली असून झोपेचे सोंग घेतलेल्या निवडणूक आयोग व सरकारला …

Read More »

पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती, मविआच्या १०० उमेदवारांची न्यायालयात याचिका लोकसभा ते विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या सहा महिन्यात ४८ लाख मतदार कसे वाढले याचे पुरावे द्या: प्रविण चक्रवर्ती

लोकशाही व्यवस्थेत निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी स्वायत्त संस्था असलेल्या निवडणूक आयोगाकडे आहे परंतु आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत त्याला हरताळ फासला आहे. विधानसभेला मतदार याद्यांमध्ये मोठा घोटाळा केल्याने त्याचा फायदा भाजपा युतीला झाला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत ४८ लाख मतदार अधिक वाढले …

Read More »

उत्तर प्रदेशातील मायवतींच्या पुतळा उभारणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्व निर्णय निवडणूक आयोगाचे नियम सर्वांनी पाळा

२००७ ते २०१२ दरम्यान उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती, त्यांचे गुरु कांशीराम आणि बहुजन समाज पक्षाचे (बसपा) चिन्ह असलेले हत्ती यांचे पुतळे लखनौ आणि नोएडा येथील उद्यानांमध्ये करदात्यांच्या पैशाने बांधल्याबद्दल २००९ मध्ये दाखल केलेल्या जनहित याचिकेचा सर्वोच्च न्यायालयाने १५ जानेवारी रोजी निकाल दिला. न्या. बी. व्ही. नागरत्न आणि सतीश चंद्र …

Read More »

नाना पटोले यांची घोषणा, लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसचा एल्गार,राष्ट्रीय मतदार दिनी आंदोलन लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या भाजपा व निवडणूक आयोगाचा निषेध करणार

भारतीय जनता पक्ष व निवडणूक आयोगाने विधान सभेच्या निवडणुकीत मतांवर दरोडा टाकून लोकशाहीचा गळा घोटला आहे. भाजपा व निवडणुक आयोगाची ही अभद्र युती लोकशाहीला कलंक लावणारी आहे. लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी तसेच मतदारांच्या हक्कासाठी काँग्रेस पक्ष शनिवारी २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनी राज्यभर जिल्हा व तालुका स्तरावर तीव्र आंदोलन करणार …

Read More »

दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या तारखा जाहिर ५ फेब्रुवारीला मतदान तर ८ फेब्रुवारीला निकाल

दिल्लीत ५ फेब्रुवारीला विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि तीन दिवसांनी अर्थात ८ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे, सत्ताधारी आम आदमी पार्टी (आप), त्याचा मुख्य प्रतिस्पर्धी भाजपा आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाची राजकिय प्रतिष्ठा धोक्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या दमदार कामगिरीनंतर आणि काही महिन्यांपूर्वी हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा …

Read More »

निवडणूक नियमात बदल काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव नागरिकांचे अधिकार कमी करण्यासाठीच हा बदल केल्याचा काँग्रेसचा आरोप

काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारने निवडणूक घेण्याविषयीचा नियम, १९६१ मधील नुकत्याच केलेल्या सुधारणांना आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ज्याद्वारे निवडणूक संबंधित नोंदींमध्ये प्रवेश करण्याचे नागरिकांचे अधिकार कमी केले गेले आहेत असा आरोपही यावेळी काँग्रेसने केंद्र सरकारवर केला. याचिकेनुसार, निवडणूक आयोग, जी एक संवैधानिक संस्था आहे, ज्यावर मुक्त आणि निष्पक्ष …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा सवाल, राज्यात ७५ लाख मते कशी वाढली? वंचितने पाठवलेल्या पत्राला आरओकडून सरकारी उत्तर

ईव्हीएम EVM संदर्भात आम्ही सर्व राजकीय पक्षांशी बोलणार आहोत आणि ईव्हीएम EVM संदर्भात एक बैठक बोलवणार आहोत. आम्ही मुख्य निवडणूक आयुक्तांशी आणि आर. ओ. यांच्याशी पत्रव्यवहार केला. परंतु, मुख्य निवडणूक आयुक्तांनी अद्याप आम्हाला उत्तर दिलेलं नाही. काही आर. ओ यांनी सरकारी उत्तरे दिली आहेत. पण ७५ लाख मते कशी वाढली …

Read More »