Tag Archives: election commission of india

राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मतदारसंघात वसतिगृहातील विद्यार्थ्यानाच बनविले मतदार काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्याकडून विद्यार्थी मतदारांची मतदान केंद्रावरच तपासणी

विधानसभा निवडणूकीची घोषणा जाहिर झाल्यापासून अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघात विद्यमान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उमेदवारीची आणि त्यांच्या रणनीतीची चर्चा अहमदनगरसह संपूर्ण राज्यात सुरु झाली. त्यातच काँग्रेसकडून प्रभावती घोगरे यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. त्यामुळे काँग्रेसच्या प्रभावती घोगरे विरूद्ध राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यात सामना सुरुवातीला एककल्ली वाटत होता. मात्र आज …

Read More »

विधानसभा निवडणूकीसाठी राज्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.५३ टक्के मतदान अनेक जिल्ह्यात वाद, भांडणे आणि बोगस मतदानाच्या तक्रारी

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ४५.५३ टक्के मतदान झाले आहे. मात्र यंदाची विधानसभा मतदानाचा दिवस हा राज्याच्या विविध जिल्ह्यात दोन प्रतिस्पर्धी उमेदवारांची भांडणे, समर्थक आणि बोगस मतदानाच्या तक्रारीमुळे आज मतदानाचा दिवस थंडीच्या पाऱ्यातही चांगलाच गरम राहिला. तर …

Read More »

मतदानासाठी राज्यभरात २ लाखांपेक्षा अधिक पोलीस व सुरक्षा यंत्रणांचे कर्मचारी तैनात आचारसंहिता कालावधी दरम्यान राज्यभरात ५३२ एफ. आय. आर.

‘महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४’ अंतर्गत बुधवार २० नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यभरात मतदान होत आहे. ही सर्व प्रक्रिया शांततेत व खुल्या वातावरणात संपन्न व्हावी, यासाठी राज्यभरात २ लाखांपेक्षा अधिक पोलीस व सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलासोबत गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, राज्य सशस्त्र …

Read More »

सचिन सावंत यांचा सवाल,…निवडणूक आयोग काय झोपला आहे का? भाजपा युतीकडून साम-दाम-दंड-भेद नितीचा वापर, प्रचार संपल्यानंतरही भाजपा नेते विरारमध्ये काय करत होते

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील घटनांनी पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. लोकशाही व संविधानाचा गळा घोटून सत्ताधारी पक्ष साम-दाम-दंड-भेद नितीचा वापर खुलेआमपणे करत आहेत. सर्वात आश्चर्याची व गंभीर बाब म्हणजे हे सर्व घडत असताना पोलीस दल व निवडणूक आयोग काय झोपा काढत आहे का? असा सवाल करून भाजपा नेते विनोद …

Read More »

आधी हिंतेंद्र ठाकूरांचे विनोद तावडेंवर आरोप नंतर ठाकूरांनीच तावडेना बाहेर काढले विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर यांची पत्रकार परिषद रद्द

विधानसभा निवडणूकीच्या मतदानासाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिलेला असताना भाजपाचे केंद्रीय महासचिव विनोद तावडे हे विरारमधील विवांता हॉटेलमध्ये ५ कोटी रूपये वाटत असल्याचे प्रकरण बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार क्षितीज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर यांनीच उघडकीस आणले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यानंतर विनोद तावडे भाजपामधील एका बड्या नेत्याच्या …

Read More »

राजकिय पक्षांच्या प्रचार तोफा थंडावल्या, निवडणूक आयोगाने जारी केला महत्वाचा आदेश राजकीय प्रचार, प्रसारावर बंदी नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई

राज्यातील विधानसभा निवडणूकांच्या निमित्ताने सुरु असलेल्या सर्वपक्षिय प्रचाराच्या तोफा थंडावल्या. मागील २० ते २५ दिवसापासून राज्यातील सर्वच राजकिय पक्षांकडून सातत्याने आपपाल्या प्रतिस्पर्धी पक्षावर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत होते. विधानसभा निवडणूकीत महायुतीच्या वतीने भाजपाच्या केंद्रीय नेत्यांनी पुन्हा एकदा धार्मिक आधारावर मते मागण्याचा अजेंडा निश्चित करण्याचा प्रयत्न केला. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपाचा …

Read More »

मुंबई शहर जिल्ह्यातील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांकरिता मोफत वाहन व्यवस्था • समन्वय अधिकारी व रूट प्लानची माहिती मिळण्यासाठी क्युआर कोडची निर्मिती

विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात बुधवार, २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०७.०० ते सायंकाळी ०६.०० या वेळेत मतदान होणार आहे. ‘एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये’ (No voters to be left behind) या निवडणूक आयोगाच्या घोषणेप्रमाणे मतदानाच्या दिवशी दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांची मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी …

Read More »

रमेश चेन्नीथला यांचा आरोप, सत्ताधा-याकडूंन पोलीस यंत्रणेचा गैरवापर… पोलीस दलाच्या माध्यमातून रसद पुरवून मतदारांना प्रभावीत करण्याचा प्रयत्न सुरु

२० नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीचा प्रचार आज संपत आहे. पण पराभव समोर दिसत असल्याने सत्ताधारी पक्षांकडून सत्ता, यंत्रणा आणि पैशाचा गैरवापर मोठ्या प्रमाणात सुरु असल्याच्या तक्रारी काँग्रेस पक्षाकडे येत आहेत. यात सर्वात जास्त पोलीस दलाचा वापर केला जात आहे. अत्यंत निष्पक्ष निवडणुका आणि लोकशाहीसाठी …

Read More »

निवडणूक आयोगाकडून आता दूरचित्रवाणी अर्थात टीव्हीवरील बातम्यांवर लक्ष दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविल्या जाणाऱ्या बातम्यांसाठी "इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर" दक्ष

महाराष्ट्रात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरू आहे. येत्या बुधवारी म्हणजे २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात महाराष्ट्रात मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत आणि निर्भय वातावरणात व्हावी, यासाठी भारत निवडणूक आयोग तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्याकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. भारत निवडणूक आयोगाकडून देशातील दूरचित्रवाणी वाहिन्यांवर निवडणुकांसंबंधित …

Read More »

निवडणूक काळात आयोगाकडून ५०० कोटींहून अधिक मालमत्ता जप्त वाहन तपासणीसाठी ६,००० पथके तैनात

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी राज्यभर स्थिर व भरारी सर्वेक्षण पथके तैनात केली आहेत. एकूण ६ हजार पथकांमार्फत वाहनांची तपासणी करून संशयास्पद वस्तू जप्त केल्या जात आहेत, ज्यात आतापर्यंत ५०० कोटी रुपयांहून अधिक बेकायदा मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. निवडणूक काळात लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेनुसार राजकीय पक्ष …

Read More »