Tag Archives: mumbai

वर्षा गायकवाड यांचा आरोप, अदानीच्या स्वार्थासाठी मित्रजीवी सरकारचा…. भाजपा शिंदे सरकारने अदानीचे एजेंट म्हणून काम करू नये; कोण आहे अदानी? सरकार त्याच्यासाठी पायघड्या घालते.

भाजपा युती सरकारने मुंबई अदानीला विकली असून सर्वसामान्य मुंबईकरांना विस्थापित करण्याचे पाप केले जात आहे. लाडका उद्योगपती योजनेखाली सरकार केवळ अदानीच्या स्वार्थासाठी काम करत आहे. आता हे मित्रजीवी सरकारने वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील बसेरा गृहनिर्माण सोसायटीमध्ये राहत असलेल्या कुटुंबांना उध्वस्त करायला निघाले आहे पण ही तानाशाही काँग्रेस सहन करणार नाही. …

Read More »

मुंबईसह उपनगरात २४ तास पावसाचा इशारा मुंबईसह महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर

मान्सूनच्या परतीचा पाऊस मुंबईसह राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात सुरु झाला आहे. काल रात्री पुणे, सोलापूर पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात पावसाने हजेरी लावल्यानंतर आज दुपारनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, संध्याकाळी सुरु झालेला पाऊस पुढील २४ तास मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघरसह मराठवाडा, विदर्भ आणि …

Read More »

मंगलप्रभात लोढा यांचा इशारा, धारावीमध्ये कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई सीसीटीव्ही फुटेज बघुन कारवाई करणार

आज मुंबई महापालिकेद्वारे सायन धारावी परिसरातील एका प्रार्थनास्थळाचा अनधिकृत भाग तोडण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली होती. सकाळी महापालिकेच्या जी नॉर्थ प्रभागाचे अधिकारी या रस्त्यावर पोहोचले. यावेळी काही कट्टरपंथीयांनी प्रशासनाच्या कामात अडथळा आणण्यास सुरुवात केली. पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दगडफेक सुद्धा करण्यात आली. यामध्ये महापालिकेच्या बसेसचे नुकसान देखील झाले. सदर तणावपूर्ण …

Read More »

जुहू किनाऱ्यावर राज्यपाल राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री शिंदे यांची स्वच्छता मोहीम आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिनानिमित्त जुहू किनाऱ्यावर स्वच्छता अभियान

प्रत्येक मोठ्या कार्याची सुरुवात लहान लहान बाबींनी होत असते. सागरी किनारा स्वच्छतेसाठी आज जनजागृतीचा दिवस असून किनारा स्वच्छतेची ही सुरुवात मोठे रूप धारण करून ‘स्वच्छ भारत, महान भारत’ संकल्पनेला आकार देईल, असे प्रतिपादन राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी केले. तर, समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. …

Read More »

विधानसभा निवडणुकीसाठी बृहन्मुंबई क्षेत्रात १० हजार १११ मतदान केंद्रे प्रत्येक केंद्रावर सरासरी १२०० मतदार

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-२०२४ च्या पार्श्वभूमीवर, भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे, या दृष्ट‍िकोनातून बृहन्मुंबई क्षेत्रातील (मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हे) मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. या सुसूत्रीकरण कार्यक्रमामुळे बृहन्मुंबई क्षेत्रातील मतदान केंद्रांची संख्या १० हजार १११ झाली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या तुलनेत मतदान …

Read More »

मुंबईतील मेट्रो-३ चे उद्घाटन, पंतप्रधान मोदी येणार मेट्रोच्या उद्घाटनानंतर विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता

मुंबईतील आतुरतेने वाट पाहण्यात येत असलेल्या भूमिगत मेट्रो ३ चे कॉरिडॉर बीकेसी BKC आणि आरे दरम्यानच्या आंशिक मार्गाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती पुढे येत आहे. या मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑक्टोंबर महिन्याच्या सुरुवातीलाच करण्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून त्यानंतर विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता राज्यात लागू होईल …

Read More »

इमर्जन्सी चित्रपटाला भाजपाच रोखतेय, उच्च न्यायालय म्हणाले की, सत्ताधारी पक्षच.. सीबीएफसी बोर्डाने धाडस दाखवावे आम्ही कौतुक करू- न्यायमुर्ती कुलाबावाला

वादग्रस्त चित्रपट इमर्जन्सी चित्रपटाला अद्याप सीबीएफसी बोर्डाकडून अद्याप कोणतीही परवानगी दिलेली नसल्याने त्या विरोधात चित्रपटाच्या सह निर्मात्या कंगणा राणौत आमि निर्माते झी स्टुडिओजने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी आज कंगणा राणौतच्या वकीलांनी चित्रपटाच्या प्रदर्शनास भाजपाकडूनच विरोध केला जात असल्याचा आरोप केला. तसेच यासदंर्भात भाजपाच्या नेत्यांचीच हरयाणा राज्यातील निवडणूका पार पडेपर्यंत चित्रपट …

Read More »

अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाची निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रशासनाला दिले. यामुळे आता अभ्युदय नगर म्हाडा वसाहत पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. विधानपरिषद सदस्य प्रविण दरेकर यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक घेतली होती. त्यावेळी हे …

Read More »

भाजपा व धमकी देणारा आमदार मारवा विरोधात काँग्रेसचे आंदोलन DRPPL कडून माटुंग्यात छुप्या पद्धतीने धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे भूमिपूजन

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भाजपाच्या एका माजी आमदाराने जीवे मारण्याची उघड धमकी दिली असतानाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह गप्प बसले आहेत. काँग्रेस पक्ष अशा धमक्यांना घाबरत नाही पण सत्तेच्या मस्तीत जर भाजपाचे नेते अशा धमक्या देत असतील तर त्या खपवून घेतल्या जाणार नाहीत. मोदी …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा सवाल, एमपीसीबी काय साध्य करू इच्छिते… फडणवीस प्रत्येक गोष्ट शुगर कोटिंग करून सांगतात

‘आधीच महाराष्ट्रातून मोठमोठे उद्योग बाहेर जात असताना, जे उद्योग इथे वर्षानुवर्षे आहेत. ज्यांच्यामुळे हजारो-लाखो तरुणांना रोजगार मिळाले आहेत, त्या उद्योगांना त्रास देऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ काय साध्य करू इच्छित आहे’ असा संतप्त सवाल आदित्य ठाकरे यांनी सरकारला केला. मर्सिडीज बेन्ज प्रकल्पावर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने नुकतीच धाड टाकली. तसेच …

Read More »