Tag Archives: ncp

नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ पीएमएलए न्यायालयाने दिला निकाल

राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना दिलेल्या कोठडीची मुदत संपत आल्याने नवाब मलिक यांना पीएमएलए न्यायालयात आज ईडीने हजर केले असता मलिक यांना १८ एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. ईडीने केलेल्या कारवाईवर आक्षेप घेत त्या विरोधात मलिक यांनी हेबॅबिस कॉर्पस याचिकेच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. परंतु न्यायालयाने …

Read More »

शरद पवार म्हणाले, गुजरातमध्ये भयाण हिंसा झाली, पण तेव्हाचे राज्य प्रमुख पुढे… काश्मीर फाईल्स, वाढती महागाईवरून पवारांचा पुन्हा केंद्रावर निशाणा

महागाई कमी करण्याऐवजी सामाजिक ऐक्य धोक्यात येईल अशी वक्तव्ये केली जात असून तशी भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतली असल्याचे दिसून येत आहे. जनमाणसात विषारी भावना वाढवण्यावर त्यांचा भर आहे. गुजरातमध्ये यापेक्षा भयाण हिंसा झाली होती, रेल्वेचे डबे पेटवले होते, शेकडो लोकं मृत्यूमुखी पडले होते. त्यावेळी त्या राज्याचे प्रमुख कधी पुढे आलेले आमच्या …

Read More »

मंत्री आव्हाडांचे राज ठाकरेंना निमंत्रण वजा आव्हान, सकाळी लवकर उठून या मुंब्राला मदरशावरून आव्हाडांचे आव्हान

गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मनसे मेळाव्यात राज ठाकरे यांनी मुंबईसह मुंब्र्यातील अनेक मदरशामध्ये एकदा जाऊन बघा तिथे फार गंभीर प्रकार सुरु आहेत. त्यांच्यावर धाडी घाला असे आवाहन करत. एकेक आवरता आवरता असा नाकीनऊ येवू शकेल असे सूचक वक्तव्य केल्याने एकच खळबळ उडाली. त्यावरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा मुंब्य्राचे आमदार जितेंद्र आव्हाड …

Read More »

मनसे प्रमुख राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा, पहिल्यांदा घरच्यांना सांग… शिवसेना आणि राष्ट्रवादीवर टीकास्त्र

ईडीची नोटीस आम्हालाही आली मग आम्हीही गेलोच ना, मग यांना मिळाली. त्यावर विधानसभेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ठणकावून सांगत होते माझ्या घरच्यांना हात लावाल तर खबरदार मला सर्वात आधी अटक करा, पहिल्यांदा घरच्यांना सांग मुंबई महापालिकेत जावू नको म्हणून असा थेट निशाणा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर …

Read More »

शरद पवारांचा मोदींवर निशाणा, दुर्दैवाने “त्यात” धन्यता मानणारे नेतृत्व पहायला मिळतेय… भाजपाचे माजी आमदार शिवाजीराव नाईक यांची पुन्हा घरवापसी

महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू ही त्या काळातली नेतृत्वाची पिढी होती. त्यांनी स्वातंत्र्यासाठी कष्ट केले. त्यानंतर देश उभा करण्यासाठी प्रचंड योगदान दिले. देशासाठी जे खपले, त्यांच्याबद्दलचा आदर, सन्मान ठेवण्याऐवजी त्यांच्यावर टीका-टिप्पणी करणे, यातच धन्यता मानणारे नेतृत्व आज दुर्दैवाने आपल्याला देशात पाहायला मिळतेय अशी उपरोधिक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी …

Read More »

आर्यन खान प्रकरणातील महत्वाचा साक्षीदार प्रभाकर साईलचा मृत्यू गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे चौकशीचे आदेश

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी कॉर्डीलिया क्रुझवर केलेल्या कारवाईत बॉलीवूड स्टार शाहरूख खान पुत्र आर्यन खान यास अटक केली. मात्र ही कारवाई बनावट असल्याची माहिती उघडकीस आणणारा आणि या प्रकरणातील महत्वाचा साक्षीदार प्रभाकर साईल याचा मृत्यू झाला. मात्र साईल याच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलिस …

Read More »

महाविकास आघाडीतील नाट्यावरून चंद्रकांत पाटील म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांना आधीच सांगितले मातोश्रीवरही कॅमेरे लागतील

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्री पदावरून सुरु झालेल्या शिवसेना विरूध्द राष्ट्रवादी काँग्रेस नाट्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत म्हणाले की, संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचे कमी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त आहेत. राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पे रोलवर काम करत असल्याची टीका …

Read More »

गृहमंत्र्यांच्या कामकाजशैलीवरून आक्रमक झालेल्या संजय राऊतांचे रात्री घुमजाव दिलीप वळसे-पाटलांची भेट आणि संजय राऊतांची माघार

नागपूरचे अॅड सतीश उके यांना ईडीने अटक केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर टीकेचा भडीमार केला. त्यानंतर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी थेट गृहमंत्री पद सांभाळणारे दिलीप वळसे-पाटील यांच्यावर निशाणा साधला. मात्र दिलीप वळसे-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची दोन वेळा भेट घेतल्यानंतर मात्र संजय राऊत यांची भूमिका म्यान झाल्याचे दिसून आले. …

Read More »

शिवसेनेचा काँग्रेस-राष्ट्रवादीला खोचक सवाल, ही सत्ता स्वप्नातरी बघितली होती का? उपनेते तानाजी सावंत यांनी डागली तोफ

आज आमचा निधी, आम्हाला जे अधिकारी हवेत ते मिळत नाहीत. आम्हाला त्यांच्याकडे बघावं लागते आणि ते गालातल्या गालात हसत आमच्या सर्व आमदारांची चेष्टा करतात. प्रचंड नाराजी आमची या दोन पक्षांवरती आहे हे मी जाहीरपणे सांगतो. ही सत्ता तुम्ही स्वप्नात तरी बघितली होती का? असा खोचक सवाल करत केवळ आमच्या पक्षप्रमुखांच्या …

Read More »

टोमणे पुरे झाले, आता कामाला लागा! भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्ला

सत्तेत आल्यावर गेली अडीच वर्षे टोमणे मारणे, कोट्या करणे यातच वाया घालवणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी राज्यासमोरचे गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून आतातरी कामाला लागावे, असा घणाघात प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केला. टोमणे ऐकत करमणूक करून घेण्याची महाराष्ट्राच्या जनतेची सहनशीलता आता संपली असून समस्यांना तोंड देताना जनता …

Read More »