Tag Archives: ncp

सामाजिक न्याया विभागाकडून पंचतारांकित शाळा सुरु करणारः विभागाचा निधी वाढवा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

राज्यात २०११ च्या जणगणनेनुसार जवळपास ११ टक्के मागासवर्गिय जनता विविध योजनांच्या लाभासाठी पात्र आहे. त्यामुळे सध्या असलेल्या आर्थिक निधीत वाढ करण्याची गरज असून यासंदर्भात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबत लवकरच बैठक घेणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी देत औरंगाबादेत ११ एकर जागेत पंचतारांकित शाळा सुरु करण्यात येणार असून …

Read More »

डिझेलच्या किंमतीत २५ रूपयाने वाढ: राष्ट्रवादीने पंतप्रधानांकडे केली “ही” मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी पाठविले पत्र

देशातील पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूकीनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यानुसार नुकतीच डिझेलच्या दरात २५ रूपयांने वाढ केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवित किमान या दरवाढीतून राज्य सरकार, महापालिका आणि परिवहन बसेसना तरी सूट द्या अशी मागणी …

Read More »

पत्रिकेत नाव छापलं नाही म्हणून पंकजा मुंडे झाल्या धनंजय मुंडेंवर नाराज त्यांनी मोठेपणा दाखवला नाही मात्र नक्की दाखवू

राज्यात मुंडे बहिण-भावातील राजकिय कुरघोडीमुळे बीड जिल्हा कायम चर्चेत असतो. कधी निवडणूकीच्या निमित्ताने तर कधी साध्या साध्या गोष्टींवरील वक्तव्यावरून. मागील काही दिवसांपासून बीडच्या बदनामीच्या मुद्यावरून मुंडे बहिण-भावात चांगलेच शाब्दीक युध्द रंगले असतानाच जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याच्या पत्रिकेवर नाव छापलं नाही म्हणून नाराज झालेल्या भाजपा नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या …

Read More »

एमआयएमच्या प्रस्तावावर राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेस म्हणाली, तर आमचे… आघाडीचा कोणताही प्रस्ताव नाही: अतुल लोंढे

भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी एमआयएम महाविकास आघाडी सोबत युती करायला तयार आहे. असे वक्तव्य एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे. पण त्यांच्या पक्षाच्या गेल्या काही वर्षांच्या वाटचालीतून मात्र तसे दिसले नाही. त्यामुळे त्यांनी आपण भाजपविरोधी असल्याचे सिद्ध केले पाहिजे आणि मगच युती आणि आघाडीच्या बाबत चर्चा …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, भाजपाचेच आमदार फोन करून सांगतायत आम्ही खुष केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यावर जयंत पाटील यांचा टोला

राज्यातील महाविकास आघाडीचे २५ आमदार अधिवेशनावर बहिष्कार घालण्याच्या तयारीत होते असा गौप्यस्फोट केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल धुळवड खेळताना केला. त्या वक्तव्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, भाजपाचेच आमदार आम्हाला फोन करून सांगतायत की फडणवीसांनी जेवढा विकास निधी …

Read More »

पवार पावसात भिजले आणि निमोनिया भाजपला झाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांचा पडळकरांना टोला

काही दिवसांपूर्वी भाजपाचे गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीका करताना म्हणाले की, पवारांनी भर पावसात भाषण केले. पण संख्या ५४ जणच निवडूण आले. मागील २० वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री का नाही बसावला असा सवाल करत कितीही केले तरी राष्ट्रवादीची ताकद ५४ च्या पुढे जात नसल्याची टीका केली. या टीकेला राष्ट्रवादी …

Read More »

एमआयएमच्या प्रस्तावावर राष्ट्रवादीचे जयंत पाटील म्हणाले, त्यांनी सिध्द करावे… भाजपाची बी टीम नसल्याचे सिध्द करावे

देशातील सार्वत्रिक आणि विधानसभा निवडणूकीला अद्याप अवकाश असला तरी राज्यात निवडणूक आघाड्यांच्या चर्चांना आतापासूनच सुरुवात झाली आहे. एमआयएमने आज राष्ट्रवादी आणि काँग्रेसला युतीचा प्रस्ताव दिल्यानंतर शिवसेनेने या युतीसंदर्भात झिडकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अंत्यत सावध भूमिका मांडली असून याप्रश्नी बोलताना ते म्हणाले की, एमआयएमने आधी ते भाजपाची बी …

Read More »

एमआयएम खासदार जलिल म्हणाले, मते हवीत ना? मग या युती करा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दिला प्रस्ताव

२०१४ सालापासून एमआयएमकडून देशभरातील अनेक राज्यांमध्ये आपले उमेदवार उभे करून निवडणूकीत उतरत आहे. एमआयएमला मिळणाऱ्या मतांमुळे काँग्रेससह अनेक पक्षांना विशेषत: बिगर भाजपातेर पक्षांना फटका बसत आहे. त्यामुळे एमआयएम पक्षावर भाजपाची बी टीम म्हणून आरोप केला जात आहे. यापार्श्वभूमीवर एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, सगळं संपवायचेय ना? भाजपाला पराभूत …

Read More »

संजय राऊतांचा भाजपावर पलटवार, ज्यांचे आव्हान असते त्यांच्याच विरोधात बोंब… भाजपावाले रोज शिमगा करतायत

राज्यातील भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ मध्ये भाजपाच सत्तेवर येईल असे विश्वास व्यक्त केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपा पुन्हा सत्तेत येवू देणार नसल्याचे आश्वासन राष्ट्रवादीच्या तरूण आमदारांना दिले. या दोघांच्याही वक्तव्यावर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडत भाजपावर मात्र टीकास्त्र सोडले आहे. शऱद …

Read More »

राजू शेट्टींचा महाविकास आघाडीला “निरोप” तर भाजपाला “नमस्कार” चा संकेत ५ एप्रिलला घेणार अंतिम निर्णय

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे पूर्ण होत आलेली असताना भाजपाच्या राजकिय हल्ल्यामुळे आणि अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणामुळे पिछाडीवर पडत असलेल्या मविआला आता शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी “निरोपाचा” इशारा तर भाजपाला “नमस्कार” चे संकेत दिले असून ५ एप्रिल रोजी याबाबतचा अंतिम निर्णय घेतला आहे. गोवा विधानसभेवर भाजपाचा भगवा फडकाविल्यानंतर गोवा …

Read More »