बुलढाणा : प्रतिनिधी देशात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे सरकार बहुमताने सत्तेवर आल्यावर शेतकर्यांचा प्रश्न जसा तातडीने सोडवणार आहोत तसाच या राफेलची सखोल चौकशी करून यातील सत्य सर्वांसमोर आणल्याशिवाय राहणार नसल्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी येथील जाहीर सभेत दिले. आम्ही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार …
Read More »मोदीजी, तुम्ही आमच्या राष्ट्रवादाला तर घाबरता राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादावर टिका करणाऱ्या मोदींवर मलिकांचा पलटवार
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रवाद काढता परंतु मोदीजी याच राष्ट्रवादाला तर तुम्ही घाबरत आहात अशी जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. तुमचा राष्ट्रवाद हा हेडगेवार, गोळवळकर गुरुजींचा सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे. यामध्ये एका विशेष वर्गाला, विशेष जातीच्या लोकांना स्थान आहे. इतर लोकांना स्थान नाही असे सांगतानाच …
Read More »कमी मतदानाच्या टक्केवारीने सत्ताधारी-विरोधक काळजीत ५ टप्प्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान
मुंबईः प्रतिनिधी लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील ९१ लोकसभा जागांकरीता गुरूवारी मतदान पार पडले. या ९१ पैकी महाराष्ट्रातील ७ जागांकरीताही मतदान झाले. मात्र या पहिल्या टप्प्यात ५५.९७ टक्के मतदान झाल्याने या कमी मतदानाचा फटका सत्ताधारी की विरोधकांना बसणार या चिंतेने महायुती आणि महाआघाडीतील राजकिय पक्षांना ग्रासले असल्याने पुढील ५ टप्प्यातील मतदानावेळी मतांची …
Read More »या सरकारचं आता फार झालं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची टीका
नाशिकः प्रतिनिधी या सरकारला शेतकऱ्यांच्या कष्टाची किंमत नाही … मुलाबाळांच्या भवितव्याचा विचार नाही. बळीराजाला सन्मानाने जगण्याची संधी भाजप सरकार देत नाही.या सरकारचं आता फार झालं… अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारबद्दल संताप व्यक्त केला. महाआघाडीचे नाशिकचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ त्यावेळी ते बोलत होते. या …
Read More »पवार यांच्या मनात पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा आहे का ? भाजप नेते विनोद तावडे यांचा सवाल
मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मनात पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा आहे का? असा सवाल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना केला. एका वृत्त वाहिनीवर मुलाखतीत शरद पवार म्हणाले की, २००४ ला मनमोहनसिंग पंतप्रधान होतील. हे कोणाला वाटले नव्हते, कारण त्यांनी लोकसभा निवडणूक लढविली नव्हती. मनमोहन …
Read More »मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचा महाआघाडीला जाहीर पाठिंबा राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांची घोषणा
मुंबईः प्रतिनिधी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचा महाआघाडी ला जाहीर पाठिंबा असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांनी घोषणा केली. यावेळी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष गुफरान अन्सारी, राष्ट्रीय प्रवक्ते मिरझा अब्दुल कय्युम नदवी, प्रदेशाध्यक्ष मुसा मुर्षद, महाराष्ट्र युवा …
Read More »कुणी कळ काढली तर जागा दाखवल्याशिवाय राहत नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा भाजपला इशारा
उस्मानाबाद – उमरगा: प्रतिनिधी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीतून आलो आहोत. कुणाची कळ काढत नाही परंतु कुणी कळ काढली तर जागा दाखवल्याशिवाय राहत नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांना दिला. उस्मानाबादचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत शरद पवार यांनी मोदींवर …
Read More »होर्डींग्जसाठी ५ लाखांचा हप्ता घेणारा ‘अविचारी’ खासदार कोण? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांचा सवाल
ठाणे : प्रतिनिधी काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील होर्डिंग धोकादायक स्थितीत असून ते एका बाजूला कलले आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाच्या कोणत्याही निर्देशांचे पालन न केल्यामुळे हे होर्डींग्ज बेकायदेशीर असल्याचे सिद्ध झालेले आहे. मात्र, ठाण्यातील चार खासदारांपैकी एका खासदाराने या होर्डींग्जच्या उभारणीसाठी पाच लाखांचा हप्ता घेतला आहे. ठाणेकरांच्या …
Read More »सोशल मिडीया बनले प्रचाराचे अड्डे ट्वीटर, फेसबुकवर फोटो आणि व्हीडीओंचा पाऊस
मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराला रंगत येण्यास सुरुवात झाली आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि वंचित आघाडी या पक्षांकडून सोशल मिडीयावरील ट्वीटर, फेसबुक आणि व्हॉट्सअँपवरूनच एकमेकांवरोधात टीका टिपण्णी करत असल्याने सोशल मिडीयाच प्रचाराचे अड्डे होताना दिसत आहे. त्यामुळे जनताही या टीका टीपण्णीतून मनोरंजन करताना दिसत आहे. सद्यपरिस्थितीत तंत्रज्ञानातील क्रांतीचा लाभ …
Read More »युपीएचं सरकार आल्यावर २००९ सालासारखी कर्जमाफी देवू उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खा. सुप्रिया सुळेंचे आश्वासन
बारामतीः प्रतिनिधी आमचं युपीएचं सरकार आल्यावर २००९ मध्ये जशी कर्जमाफी केली तशी या देशातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याचे आश्वासन खा. सुप्रियाताई सुळे यांनी दिले. बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आणि पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. या सभेत …
Read More »
Marathi e-Batmya